शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नाधवडेतील तेलताड प्रकल्पाची चौकशी

By admin | Updated: September 11, 2016 00:26 IST

कृषी सहआयुक्त लोखंडे यांनी कृषी अधिकारी, शेतकरी भोगम यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.

वैभववाडी : नाधवडे येथील तेलताड प्रकल्पाच्या कथित गैरव्यवहाराची कृषी विभागाचे सहआयुक्त (ठाणे विभाग) अशोक लोखंडे यांनी शनिवारी चौकशी केली. सहआयुक्त लोखंडे यांनी शेतकरी व तालुका कृषी अधिकारी यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. या तेलताड प्रकल्पाच्या कथित गैरव्यवहाराची मनसेचे तालुकाध्यक्ष सचिन तावडे यांनी तक्रार केली होती. या प्रकरणाची विधानसभेत लक्षवेधीही झाली होती. नाधवडे येथील रामचंद्र भोगम या शेतकऱ्याने खासगी कंपनीच्या माध्यमातून तेलताड लागवड केली होती. त्यासाठी कृषी विभाग भोगम यांना अनुदान देणार होते. त्यामुळे कृषी विभागाच्या मंजुरीने २0१४-१५ मध्ये भोगम यांनी कोल्हापुरातील खासगी कंपनीमार्फत ६४ हजार रुपये किमतीची तेलताडाची रोपे खरेदी करून लागवड करण्यात आली. कृषी अधिकाऱ्यांनी मर्जीतील शेतकऱ्यांना हाताशी धरून बनावट दस्तऐवज (एम बी रेकॉर्ड) कृषी विभागाने तयार करून तेलताड प्रकल्पाच्या नावाखाली शासनाची फसवणूक केल्याची तक्रार मनसेचे सचिन तावडे यांनी केली होती.तावडे यांच्या तक्रारीनुसार विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या प्रकरणाची लक्षवेधी झाली होती. त्यामुळे तावडे यांच्या सहआयुक्त लोखंडे यांनी शनिवारी नाधवडेचा दौरा करून तेलताड प्रकल्पाच्या कथित गैरव्यवहाराची चौकशी सुरू केली. यावेळी तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे, पर्यवेक्षक दळवी, विवेकानंद नाईक, तक्रारदार मनसेचे तालुकाध्यक्ष सचिन तावडे, सरपंच दादा पावसकर, आदी उपस्थित होते. कृषी सहआयुक्त लोखंडे यांनी कृषी अधिकारी, शेतकरी भोगम यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. दरम्यान, कृषी सहआयुक्त लोखंडे यांनी शेतकरी व कृषी अधिकारी यांच्या नोंदवलेल्या जबाबात शेतकरी रामचंद्र भोगम यांनी तेलताड लागवड केली होती. परंतु, तेलताड प्रकल्पाची प्रेरक खासगी कंपनी किंबहुना कृषी विभागाने भोगम यांना एक रुपयाही अनुदान दिले नसल्यामुळे भोगम यांनी तेलताड लागवड केलेल्या जमिनीवर मशागत करून यावर्षी ऊस लागवड केली आहे. त्यामुळे तेलताड लागवड केली असे शेतकरी भोगम यांचे म्हणणे असले तरी प्रत्यक्ष आता त्या जमिनीवर आता ऊस दृष्टीस पडत आहे. त्यामुळे नाधवडेतील तेलताड प्रकल्पाच्या कथित गैरव्यवहारातून काय बाहेर पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)अधिकाऱ्यांवर हा आहे आरोपतेलताड प्रकल्पासाठी प्रेरक खासगी कंपनीच्या पुढाकारातून शासन शेतकऱ्याला अनुदान देणार होते. ते अनुदान रामचंद्र भोगम यांना मिळावे यासाठी कृषी विभागाने त्यांच्या कथित तेलताड लागवडीचे रेकॉर्ड केले होते. परंतु आजमितीस या शेतकऱ्याला शासनाचा एक रुपयासुद्धा मिळालेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. परंतु प्रकल्पाच्या त्या जमिनीवर तेलताडाऐवजी ऊस दिसत असल्याने कृषी अधिकाऱ्यांनी खोटे दस्तऐवज बनवून शासनाची फसवणूक केल्याचे सचिन तावडे यांचे म्हणणे आहे.