शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
5
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
6
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
7
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
8
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
9
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
10
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
11
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
12
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
13
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
14
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
15
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
16
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
17
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
18
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
19
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
20
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)

पाणी अडवून हिवाळी शेती करा : अण्णा हजारे

By admin | Updated: January 2, 2015 00:07 IST

कोरडवाहू शेती अभियानासाठी देवडे गावातील सुमारे ५० शेतकऱ्यांनी राळेगणसिद्धी गावाचा अभ्यास दौरा केला

मार्लेश्वर : कोकणात पडणाऱ्या पावसाचे पाणी अडवून त्याचे योग्य नियोजन केले तर त्याचा आधुनिक शेतीसाठी वापर करता येणे शक्य आहे, असा सल्ला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी संगमेश्वर तालुक्यातील देवडे गावच्या शेतकऱ्यांना दिला. कोरडवाहू शेती अभियानासाठी देवडे गावाची निवड करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत गावातील सुमारे ५० शेतकऱ्यांनी नुकताच राळेगणसिद्धी गावाचा अभ्यास दौरा केला. या दौऱ्याच्या वेळी हजारे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.गावाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर दारुबंदी, हुंडाबंदी, वृक्षतोडबंदी, श्रमदान व चराई बंदीची पाच तत्वे सर्वांनी अंगिकारली पाहिजेत, असे अण्णांनी सांगितले. कोकणात दोन दिवस पडणारा पाऊस हा मराठवाड्यातील वर्षभरात पडणाऱ्या पावसाएवढा असतो. त्यामुळे कोकणात मोठ्या प्रमाणावर पडणाऱ्या पावसाचा सदुपयोग हिवाळी शेतीसाठी केला पाहिजे. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची हानी होते, असे हिवरे बाजाराचे सरपंच पोपट पवार यांनी सांगितले. देवडे गावातील शेतकऱ्यांनी दौऱ्याची सुरुवात फलटण येथील कृषी उद्यान केंद्र व भाजीपाला संशोधन केंद्राला भेट देऊन केली. यानंतर राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील ग्रीन हाऊसमधील जरबेरा व कार्निशन या दुर्मीळ व शोभिवंत फुलांची पाहणी केली. त्यानंतर राळेगणसिद्धी गावाला भेट देऊन पाणलोटअंतर्गत सुरु असलेल्या कामांची पाहणी केली.या अभ्यास दौऱ्यात संगमेश्वर तालुका कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक दत्ताराम परब, सुनील जगदाळे, देवडे गावचे प्रगतशील शेतकरी बंधू बेर्डे, धोंडू लाड, सखाराम धुमक, सुभाष कांबळे, महेश धुमक, दीपक मांडवकर, सोमा तळेकर, सुरेश माईन, विजय वड्ये, जयवंत जाधव, दिलीप बेर्डे, अरुण कांबळे, विकास सुवरे, सुहास धुमक, संतोष मांडवकर, दिनेश बड्ये, चंद्रकांत बड्ये आदींसह शेतकरी सहभागी झाले होते. (वार्ताहर)