शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

टोल घ्या पण पारदर्शकता ठेवा

By admin | Updated: June 25, 2015 00:59 IST

राज ठाकरे : मनसे अध्यक्षांचे पदाधिकाऱ्यांकडून कणकवलीत स्वागत

कणकवली : कोणतेही काम फुकट होत नाही. चौपदरीकरणाला टोल आकारण्याला आमचा कोणताही विरोध नाही. परंतु टोल आकारणीत पारदर्शकता हवी, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केली. येथील शासकीय विश्रामगृहावर त्यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला. टोल घेण्याला आमचा कधीच विरोध नाही. तो ज्यापद्धतीने घेतला जातो त्याला आमचा विरोध आहे. टोल जगभरात सगळीकडे घेतला जातो. परंतु तेथील पद्धत वेगळी आहे. आपल्याकडे तशा पद्धतीने टोल घेतला जात नाही. रोख रकमेच्या स्वरूपात नाक्यावर टोल घेण्यामुळे सरकारला किती आणि कंत्राटदाराला किती पैसे जातात, याबाबत पारदर्शकता राहत नाही. कमी खर्चाच्या प्रकल्पांना टोलची गरज नाही. सिंधुदुर्गात पर्यटन स्थळांना भेटी देत असल्याबद्दल त्यांना छेडले असता राज ठाकरे म्हणाले की, जिल्ह्यात पर्यटनाला मोठा वाव आहे. परंतु छोटी-मोठी हॉटेल्स येऊन फक्त पर्यटन वाढणार नाही. त्यासाठी तीन-चार मोठे पर्यटन प्रकल्प उभारावे लागतील. त्यानंतर पर्यटनाला ऊर्जितावस्था येईल. सिंधुदुर्गातील गेल्या अनेक वर्षांपासूनचे प्रश्न तसेच आहेत. त्यावर आमच्या विकास आराखड्यात उत्तरे सापडतील. संघटनात्मक पातळीवर मनसेला ऊर्जितावस्था आणण्यासाठी आम्ही काय करणार आहोत, हे हळूहळू दिसून येईल, असे त्यांनी सांगितले. येथील मुख्य चौकात राज ठाकरे यांचे मनसे पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. त्यानंतर शासकीय विश्रामगृहावर कणकवली व वैभववाडी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक ठाकरे यांनी घेतली. (प्रतिनिधी)