शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
3
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
4
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

‘झोपा काढो, टोप्या घालो’

By admin | Updated: January 21, 2016 00:25 IST

बंद नळपाणी योजना : अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी आंदोलन

रत्नागिरी : जिल्ह्यातील जवळपास १९० गावे आणि ४१८ वाड्यांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अशावेळी लाखो रुपये खर्च करून सुरू केलेल्या अनेक नळपाणी योजना बंद आहेत. मात्र, यात दोषी असणाऱ्यांवर प्रशासन ठोस कारवाई करत नसल्याने जनतेचे हाल होत आहेत. निद्रिस्त असलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी येत्या २६ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेसमोर पांढऱ्या टोप्या परिधान करून अनोख्या पद्धतीने ‘झोपा काढो टोप्या घालो’ आंदोलन दिवसभर करण्यात येणार असल्याची माहिती गाव विकास समितीतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली.जिल्ह्यात अनेक गावे व वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. महागड्या नळपाणी योजना मंजूर करताना तत्परता दाखवली जाते. मात्र, योजना सुरु झाल्यानंतर ती बंद होण्याबाबत, त्यातील गैरव्यवहाराच्या तक्रारींबाबत तेवढेच दुर्लक्ष केले जाते. याचाच निषेध करण्यासाठी गाव विकास समितीने २६ जानेवारी रोजी ‘झोपा काढो, टोप्या घालो’ आंदोलन पुकारले आहे. त्यानंतर २७ रोजी एक दिवस लाक्षणिक निषेध उपोषण करण्याचा निर्णयही घेतला आहे. याबाबतची माहिती गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड, सल्लागार सुहास खंडागळे, सरचिटणीस बाबुराव खेडेकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.संगमेश्वर तालुक्यात जवळपास ९ नळपाणी योजना बंद आहेत. हरपुडे, साडवली, चाफवलीतील भोयवाडी, फणसेवाडी, लांबेवाडी, गुरववाडी, ओझरखोल, निलगेवाडी, तळवडे खंडागळेवाडी आदी योजना या गैरव्यवहारांमुुळे बंद आहेत. लाखो रुपये खर्च करून सुरू झालेल्या या योजनांमध्ये ग्रामस्थांना आठ दिवसही पाणी मिळालेले नाही. यामध्ये ६५ लाखांच्या कनकाडी (गोताडवाडी) योजनेचाही समावेश आहे. या ठिकाणी दुरूस्ती न करताच येथे चक्क तीन नव्या योजना राबवण्यात आल्या आहेत. या सर्व अंदाधुंद कारभाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गाव विकास समितीतर्फे करण्यात आला आहे. जिल्ह्यातील बंद नळपाणी योजना व बोगस नळपाणी योजनांच्या विरोधात गेल्या तीन वर्षांपासून गाव विकास समिती संघर्ष करत असून, जिल्हा परिषद प्रशासनाकडे याबाबत दाद मागत आहे. मात्र, याकडे जिल्हा परिषदेकडून दुर्लक्ष करण्यात येत असून, दोषींवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घातले जात आहे. त्यामुळे गेली तीन वर्षे या गैरव्यवहाराबाबत कोणतीही कारवाई न करता प्रशासन झोपेचे सोंग घेऊन गप्प आहे. त्यामुळेच आता गाव विकास समितीने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. (प्रतिनिधी)प्रातिनिधीक आंदोलन : २३ रोजी प्रत्येक तहसीलसमोर होणारया आंदोलनानंतरही दोषींवर कारवाई करण्यास दिरंगाई झाली तर जिल्हाभर जनजागृती करण्यासाठी २३ रोजी निवडक सदस्यांसह ‘झोपा काढो टोप्या घालो’ आंदोलन प्रत्येक तहसील कार्यालयासमोर प्रातिनिधीक स्वरूपात करण्यात येणार आहे.