शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

पुढची आमसभा पोलीस ठाण्यात घ्या

By admin | Updated: June 13, 2015 00:20 IST

नीतेश राणे : पालकमंत्र्यांवर टीका, आमसभेत आवाज दाबण्याचा प्रयत्न

दोडामार्ग : आमसभेत सर्वसामान्याचे प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडविणे अपेक्षित असते, पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी दोडामार्गची आमसभा पोलीस फौजफाट्यात आयोजित केली. आपण सांगतो तेच खरे, असे सांगून आमसभेत लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे केसरकरांनी पुढची आमसभा थेट पोलीस ठाण्यातच घ्यावी. मग जनतेच्या प्रश्नांचा सवाल येणार नाही. आम्ही तिथे येऊन प्रश्न विचारू, अशी टीका राष्ट्रीय काँग्रेसचे युवा नेते आमदार नीतेश राणे यांनी केली.दोडामार्ग येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आमदार राणे दोडामार्ग दौऱ्यावर आले होते. यांनतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, आमसभा ही जनतेसाठी असते, हा मतदार संघ पालकमंत्र्यांचा आहे, याठिकाणी आमसभा होत असताना केसरकर यांनी जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. कोणताही प्रश्न विचारल्यावर यासंबंधी मुंबईला बैठक लावतो, मी मंत्री आहे खाली बसा, मला हवे तेच उत्तर देईन, अशी उत्तरे देणे आणि आमसभा घेणे हीच लोकशाही का? असा सवाल राणे यांनी उपस्थित केला. दोडामार्गात अनेक प्रश्न आहेत. आरोग्याचा प्रश्न तर अगदी महत्त्वाचा आहे. दोडामार्ग रुग्णालयाला डॉक्टर मिळत नाही. मात्र, सावंतवाडीत बारापैकी बारा डॉक्टर मिळतात. लोकांनी काय पाप केले म्हणून हे पालकमंत्री पालकांसारखे का वागत नाहीत, असा संतप्त सवालही आमदार नीतेश राणे यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)हत्तीप्रश्नी १६ जूनला पाहणीदोडामार्ग तालुक्यातील हेवाळे गावातील हत्ती प्रश्न गंभीर असून त्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस दोडामार्गचे पदाधिकारी १६ जूनला परिस्थितीची पाहणी करून पुढील दिशा ठरविणार असल्याचे आमदार राणे यांनी सांगितले. ... स्वतंत्र ‘टोलबुथ’गोवा सरकारने सिंधुदुर्गच्या वाहनांना ‘टोल’ तूर्त स्थगित केला आहे. मात्र, भविष्यात हिंमत केल्यास राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने सिंधुदुर्गात ‘स्वतंत्र टोलबुथ’ उभारून गोव्यातील वाहनांना टोल लावण्यात येईल. यातून मिळणारी रक्कम जिल्हाधिकारी यांच्याकडे किंवा समाज कार्यासाठी वापरण्यात येईल, असे राणे यांनी टोलप्रश्नाबाबत बोलताना सांगितले.यापुढे भक्कम पक्षबांधणीआमसभेत काँग्रेसच्यावतीने बऱ्यापैकी आमदारांना जाब विचारण्यात आला. काही अंशी पदाधिकारी कमी पडले. पण यापुढे पक्षबांधणी मजबूत करून वेगवेगळे कार्यक्रम हाती घेतले जातील, असे नीतेश राणे यांनी सांगितले.