शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करा

By admin | Updated: March 29, 2016 00:33 IST

सदाशिव ओगले यांची मागणी : जिल्हा परिषद बांधकाम समिती सभा

सिंधुुदुर्गनगरी : देवगड तालुक्यातून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून गुरांचे गोठे बांधण्यासाठीचे शेतकऱ्यांमार्फत ३00 प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. मात्र, त्यापैकी केवळ तीनच गोठ्यांना देवगड गटविकास अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. प्रस्ताव परिपूर्ण असतानाही जाणूनबुजून गटविकास अधिकारी प्रस्ताव मंजुरीसाठी टाळाटाळ करत असल्याचा आरोप सदस्य सदाशिव ओगले यांनी करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.जिल्हा परिषद बांधकाम समितीची सभा सभापती दिलीप रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली बॅ. नाथ पै सभागृहात झाली. यावेळी सदस्य संदेश सावंत, सदाशिव ओगले, रूक्मिणी कांदळगावकर, दिपलक्ष्मी पडते, समिती सचिव तथा बांधकामचे कार्यकारी अभियंता सुनील साळोखे, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या सभेत आढावा घेण्यात आला. सन २0१५-१६ मध्ये जिल्ह्याला ९ कोटी ५५ लाख, ४५ हजाराचे उद्दिष्ट्य देण्यात आले होते. त्याची पूर्तता करताना १0 कोटी ४२ लाख रूपयांचे काम या योजनेअंतर्गत झाले आहे. २ लाख ९८ हजार मनुष्य दिनाच्या अनुषंगाने २ लाख ९४ हजार मनुष्य दिन भरलेले आहेत, अशी माहिती सभागृहात देत असतानाच सदाशिव ओगले यांनी गुरांच्या गोठ्या संदर्भातील माहिती मागविली. यावेळी देवगड तालुक्यात ३00 गोठ्यांचे प्रस्ताव आले असून यापैकी तीन कामांना मान्यता देण्यात आली आहे, असे सांगताच सदा ओगले आक्रमक झाले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत गोठ्यांच्या बांधकामाला मागणी असतानाही देवगड गटविकास अधिकारी हेतुपुरस्पर मान्यता देत नाहीत. अशा अधिकाऱ्यावर कारवाई होणे उचित असल्याचे त्यांनी सभागृहात सांगत तशी मागणी केली. यावेळी गटविकास अधिकाऱ्यांना या कामांचा तपशील घेऊन आपल्या दालनात उपस्थित राहण्याच्या सूचना सभापती दिलीप रावराणे यांनी दिल्या.बांधकाम समितीची आजच्या सभेवर मार्च एडिंगचा प्रभाव पदोपदी जाणवून येत होता. (प्रतिनिधी)शिक्षण विभागाचे २ कोटी मागे जाणार?शिक्षण विभागाला शाळांच्या दुरूस्तीसाठी सन २0१४-१५ मध्ये २ कोटी १२ लाख रूपये मंजूर झाले होते. हा निधी मार्च २0१६ पर्यंत खर्च करणे गरजेचे असतानादेखील अद्यापपर्यंत हा निधी अखर्चित राहिला असल्याचे सभागृहात उघड झाले. यावेळी सदस्य संदेश सावंत यांनी शिक्षणाधिकारी रत्नाकर धाकोरकर यांना धारेवर धरत हा निधी मार्च अखेरपर्यंत खर्च कसा होणार असा सवाल केला. यावर धाकोरकर म्हणाले, जास्तीत जास्त कामे ही तीन लाखाच्या आतील असल्याने निविदा प्रक्रिया मागवून पैसे खर्ची पाडू असे सांगितले. तर बांधकामचे कार्यकारी अभियंता साळोखे म्हणाले, या प्राप्त २ कोटी, १२ लाखांपैकी जेमतेम ५0 टक्के निधी खर्च होणार आहे. उर्वरीत निधी मागे जाण्याची दाट शक्यता निर्माण झाले आहे.जिल्ह्यात पाणीटंचाई लागली जाणवूजिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने पाणीटंचाई निवारण्याचे ४९ प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी केवळ दोनच प्रस्तावांना जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली, अशी माहिती या विभागाकडून देण्यात आली. पाणीटंचाईच्या कामांचे ४९ प्रस्ताव सादर झाल्याने जिल्ह्याला पाणीटंचाईची झळ बसायला सुरूवात झाली आहे.सुनील साळोखे यांचे केले कौतुकबांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील साळोखे हे ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज केले. आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांप्रमाणे इतरांनी काम करावे. याबद्दल संदेश सावंत, सदाशिव ओगले यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. सभापती दिलीप रावराणे यांनी त्यांचा सत्कार केला.