शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

यंत्रणा अद्ययावत हवी

By admin | Updated: July 8, 2014 00:42 IST

ई. रविंद्रन : आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक

ओरोस : आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा प्रशासनाची सर्व यंत्रणा उपलब्ध असली तरी ती अद्ययावत असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे सर्व यंत्रणा कार्यान्वित असणेही गरजेचे आहे. शासनाच्या विभागानी समन्वयाने काम करावे. जिल्ह्यातील यंत्रणांचे संवादाची सर्व यादी, माहिती अद्ययावत करण्यात यावी या कामामध्ये कोणत्याही प्रकारच्या चुका होऊ नयेत याची खबरदारी सर्व यंत्रणांनी घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरण अंतर्गत आढावा बैठकीत जिल्हाधिकारी ई. रविंद्रन बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, उपविभागीय अधिकारी संतोष भिसे (कणकवली), रविंद्र बोंबले (कुडाळ), जिल्हास्तरीय सर्व खात्यांचे विभागप्रमुख या बैठकीला उपस्थित होते.जिल्हाधिकारी ई. रविंद्रन म्हणाले, सर्व विभागानी आपत्ती व्यवस्थापनची कार्यवाही काटेकोरपणे करावी. जिल्हा परिषद अखत्यारीतील रस्ते, साकव दुरुस्ती करून घेण्यात यावी. आपत्ती काळात निवाऱ्यासाठी निवडलेल्या शाळांबाबत सद्यस्थिती माहिती अद्ययावत करण्यात यावी, मुख्याधिकारी नगरपालिका यांनी नगरपालिका क्षेत्र नाले साफसफाई, पूर नियोजन, धोकादायक इमारतींबाबत योग्य ती उपाययोजना करावी. पाटबंधारे विभागांनी धरणातील पाणी साठ्याचे नियोजन व विसर्गाचे नियोजन करून ठेवावे. पूर प्रतिबंधक आराखडा अद्ययावत करावा, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी बैठकीत दिले.जिल्हाधिकारी म्हणाले की, सध्या जिल्ह्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहेत. पर्यटनासाठी होडीमधून प्रवास केला जातो. तसेच सिंधुदुर्ग किल्ल्याकडेही मोठ्या प्रमाणात पर्यटक जात असतात. प्रवासी वाहतूक करणाऱ्या संबंधित पर्यटक होडीमध्ये लाईफ जॅकेटच उपलब्ध नसल्याचे आढळून आलेले आहे. तरी ही बाब गंभीर असून अशाप्रकारे प्रवासी वाहतूक सुरु आहे. बंदर अधिकाऱ्यांनी तातडीने सिंधुदुर्ग किल्ला किंवा पर्यटक वाहतूक करीत असलेल्या बोटीत लाईफ जॅकेट उपलब्ध करून देऊन त्याचा तात्काळ अहवाल कळवावा. तसेच आपत्कालीन कालावधीतील उपाययोजना व माहितीचा अहवाल तात्काळ कळवावा.जिल्हाधिकारी म्हणाले, कृषी विभागाने पूरप्रवण क्षेत्रातील झालेले नुकसान स्थानिक प्रशासनाकडून माहिती प्राप्त करून त्याचा अहवाल साद करावा. वन विभागाने वन विभागाच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करावी. यावेळी प्रत्येक विभागाने माहिती अद्ययावत असून जिल्हास्तरीय आपत्ती यंत्रणेकडे देण्यात आली असल्याचे बैठकीत सांगितले. (वार्ताहर)