शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

यंत्रणा अद्ययावत हवी

By admin | Updated: July 8, 2014 00:42 IST

ई. रविंद्रन : आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक

ओरोस : आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा प्रशासनाची सर्व यंत्रणा उपलब्ध असली तरी ती अद्ययावत असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे सर्व यंत्रणा कार्यान्वित असणेही गरजेचे आहे. शासनाच्या विभागानी समन्वयाने काम करावे. जिल्ह्यातील यंत्रणांचे संवादाची सर्व यादी, माहिती अद्ययावत करण्यात यावी या कामामध्ये कोणत्याही प्रकारच्या चुका होऊ नयेत याची खबरदारी सर्व यंत्रणांनी घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरण अंतर्गत आढावा बैठकीत जिल्हाधिकारी ई. रविंद्रन बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, उपविभागीय अधिकारी संतोष भिसे (कणकवली), रविंद्र बोंबले (कुडाळ), जिल्हास्तरीय सर्व खात्यांचे विभागप्रमुख या बैठकीला उपस्थित होते.जिल्हाधिकारी ई. रविंद्रन म्हणाले, सर्व विभागानी आपत्ती व्यवस्थापनची कार्यवाही काटेकोरपणे करावी. जिल्हा परिषद अखत्यारीतील रस्ते, साकव दुरुस्ती करून घेण्यात यावी. आपत्ती काळात निवाऱ्यासाठी निवडलेल्या शाळांबाबत सद्यस्थिती माहिती अद्ययावत करण्यात यावी, मुख्याधिकारी नगरपालिका यांनी नगरपालिका क्षेत्र नाले साफसफाई, पूर नियोजन, धोकादायक इमारतींबाबत योग्य ती उपाययोजना करावी. पाटबंधारे विभागांनी धरणातील पाणी साठ्याचे नियोजन व विसर्गाचे नियोजन करून ठेवावे. पूर प्रतिबंधक आराखडा अद्ययावत करावा, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी बैठकीत दिले.जिल्हाधिकारी म्हणाले की, सध्या जिल्ह्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहेत. पर्यटनासाठी होडीमधून प्रवास केला जातो. तसेच सिंधुदुर्ग किल्ल्याकडेही मोठ्या प्रमाणात पर्यटक जात असतात. प्रवासी वाहतूक करणाऱ्या संबंधित पर्यटक होडीमध्ये लाईफ जॅकेटच उपलब्ध नसल्याचे आढळून आलेले आहे. तरी ही बाब गंभीर असून अशाप्रकारे प्रवासी वाहतूक सुरु आहे. बंदर अधिकाऱ्यांनी तातडीने सिंधुदुर्ग किल्ला किंवा पर्यटक वाहतूक करीत असलेल्या बोटीत लाईफ जॅकेट उपलब्ध करून देऊन त्याचा तात्काळ अहवाल कळवावा. तसेच आपत्कालीन कालावधीतील उपाययोजना व माहितीचा अहवाल तात्काळ कळवावा.जिल्हाधिकारी म्हणाले, कृषी विभागाने पूरप्रवण क्षेत्रातील झालेले नुकसान स्थानिक प्रशासनाकडून माहिती प्राप्त करून त्याचा अहवाल साद करावा. वन विभागाने वन विभागाच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करावी. यावेळी प्रत्येक विभागाने माहिती अद्ययावत असून जिल्हास्तरीय आपत्ती यंत्रणेकडे देण्यात आली असल्याचे बैठकीत सांगितले. (वार्ताहर)