शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

बागायतींवर बदलत्या वातावरणाची तलवार

By admin | Updated: March 18, 2016 23:58 IST

ऐन हंगामात भीतीचे सावट : शेतकरी धास्तावले

कडावल : पाऊस व पाऊससदृश वातावरण, प्रचंड उकाडा, थंडी अशा सतत बदलत्या वातावरणाचा आंबा, काजू बागायतींवर अनिष्ट परिणाम होत आहे. पावसाअभावी आधीच भातशेती हातची गेलेली असताना आता निसर्गाच्या फटक्याने बागायतीही धोक्यात येऊ लागल्या आहेते. ऐन हंगामातच बदलत्या वातावरणाची टांगती तलवार असलेल्या बागायती शेतकरी धास्तावले असून, भातशेती गेली आता बागातरी वाचणार का? अशी भीती व्यक्त होत आहे. यंदा पावसाअभावी खरीप भात हंगाम तोट्यात गेला. भातशेती तोट्यात गेली. निदान बागायतींपासून तरी चांगले उत्पन्न मिळेल, या आशेवर असलेला शेतकरी बागायतीवर लक्ष देत अविरत कष्ट करीत राहिला. त्यामुळे शेतकऱ्यांची भिस्त बागायती पिकांवर होती. मोहरधारणा काळात थंडीचे प्रमाण चांगले राहिल्यामुळे परिसरातील आंबा, काजूच्या वृक्षांना चांगला मोहोर आला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. यंदा फलधारणा चांगली होणार, या आशेने शेतकरी सुखी होता; पण ऐन हंगामातच निसर्गाने पुन्हा मेटाकुटीला आणले आहे. क्षणाक्षणाला बदलणाऱ्या वातावरणामुळे बागायतीवर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे चांगली फलधारणा होण्याच्या शेतकऱ्यांच्या आशेवर विरजण पडले आहे.दिवसभरात वातावरण व तापमानात अनेकवेळा बदल होत आहे. मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत थंडी असते. सकाळनंतर उष्णतामान वाढण्यास सुरुवात होते. दुपारच्यावेळी तर उकाड्यामुळे अंगाची लाही-लाही होते. दिवसा वातावरण ढगाळ व पाऊससदृश असते. काही भागात पावसाच्या हलक्या सरीही बरसल्या आहेत. बदलत्या वातावरणाचा परिणाम येथील आंबा, काजू व सुपारी बागायतींवर होत आहे.परिसरातील कडावल, हिर्लोक, किनळोस, डिगस, वेताळबांबार्डे, रांगणातुळसुली, आवळेगाव, आदी गावांतील शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन बागायती उभ्या केल्या आहेत. बागायती धोक्यात आल्यामुळे शेतकरी धास्तावले असून, भवितव्याबाबत त्यांच्यासमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. (वार्ताहर)