शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

बागायतींवर बदलत्या वातावरणाची तलवार

By admin | Updated: March 18, 2016 23:58 IST

ऐन हंगामात भीतीचे सावट : शेतकरी धास्तावले

कडावल : पाऊस व पाऊससदृश वातावरण, प्रचंड उकाडा, थंडी अशा सतत बदलत्या वातावरणाचा आंबा, काजू बागायतींवर अनिष्ट परिणाम होत आहे. पावसाअभावी आधीच भातशेती हातची गेलेली असताना आता निसर्गाच्या फटक्याने बागायतीही धोक्यात येऊ लागल्या आहेते. ऐन हंगामातच बदलत्या वातावरणाची टांगती तलवार असलेल्या बागायती शेतकरी धास्तावले असून, भातशेती गेली आता बागातरी वाचणार का? अशी भीती व्यक्त होत आहे. यंदा पावसाअभावी खरीप भात हंगाम तोट्यात गेला. भातशेती तोट्यात गेली. निदान बागायतींपासून तरी चांगले उत्पन्न मिळेल, या आशेवर असलेला शेतकरी बागायतीवर लक्ष देत अविरत कष्ट करीत राहिला. त्यामुळे शेतकऱ्यांची भिस्त बागायती पिकांवर होती. मोहरधारणा काळात थंडीचे प्रमाण चांगले राहिल्यामुळे परिसरातील आंबा, काजूच्या वृक्षांना चांगला मोहोर आला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. यंदा फलधारणा चांगली होणार, या आशेने शेतकरी सुखी होता; पण ऐन हंगामातच निसर्गाने पुन्हा मेटाकुटीला आणले आहे. क्षणाक्षणाला बदलणाऱ्या वातावरणामुळे बागायतीवर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे चांगली फलधारणा होण्याच्या शेतकऱ्यांच्या आशेवर विरजण पडले आहे.दिवसभरात वातावरण व तापमानात अनेकवेळा बदल होत आहे. मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत थंडी असते. सकाळनंतर उष्णतामान वाढण्यास सुरुवात होते. दुपारच्यावेळी तर उकाड्यामुळे अंगाची लाही-लाही होते. दिवसा वातावरण ढगाळ व पाऊससदृश असते. काही भागात पावसाच्या हलक्या सरीही बरसल्या आहेत. बदलत्या वातावरणाचा परिणाम येथील आंबा, काजू व सुपारी बागायतींवर होत आहे.परिसरातील कडावल, हिर्लोक, किनळोस, डिगस, वेताळबांबार्डे, रांगणातुळसुली, आवळेगाव, आदी गावांतील शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन बागायती उभ्या केल्या आहेत. बागायती धोक्यात आल्यामुळे शेतकरी धास्तावले असून, भवितव्याबाबत त्यांच्यासमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. (वार्ताहर)