शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत भरतीला स्थगिती : धाकोरकर

By admin | Updated: December 4, 2014 23:49 IST

जिल्ह्यात अनेक उपशिक्षकांची पदे रिक्त आहेत तर नवीन कायद्यानुसार मुख्याध्यापकांची अनेक पदे अतिरिक्त ठरत आहेत.

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शाळांतील शिक्षकांच्या रिक्त पदांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षक नियुक्तीसाठी आंदोलने होऊ लागली आहेत. याकडे सदस्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले असता जोपर्यंत रिक्त पदे भरण्याबाबत न्यायालयाचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही काहीही करू शकत नसल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी रत्नाकर धाकोरकर यांनी सभेत स्पष्ट केले.जिल्हा परिषद शिक्षण समितीची सभा सभापती गुरुनाथ पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडली. यावेळी सदस्या सुकन्या नरसुले, सुषमा कोदे, संजय बगळे, संतोष पाताडे, समिती सचिव तथा प्राथमिकचे शिक्षणाधिकारी रत्नाकर धाकोरकर आदींसह खातेप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.जिल्ह्यात अनेक उपशिक्षकांची पदे रिक्त आहेत तर नवीन कायद्यानुसार मुख्याध्यापकांची अनेक पदे अतिरिक्त ठरत आहेत. याबाबत उपशिक्षकांची रिक्त असलेली पदे अतिरिक्त मुख्याध्यापकांना पदावनत करून भरण्यात येणार होती. मात्र याबाबत मुख्याध्यापकांनी न्यायालयात धाव घेतल्याने आणि न्यायालयाने ‘जैसे थे’चे आदेश दिल्याने रिक्त पदे भरण्यास अडचण निर्माण झाली आहे. शिक्षण विभागाला जिल्ह्यातील शाळांमध्ये शिक्षकांचा समतोल राखणे म्हणजे तारेवरची कसरत बनली आहे. यातच गावोगावी ग्रामस्थांची शिक्षक नियुक्तीसाठी आंदोलने होत आहेत. याकडे सदस्यांनी लक्ष वेधले असता जोपर्यंत न्यायालयाकडून निर्णय येत नाही तोपर्यंत शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत काहीही करू शकत नसल्याचे शिक्षणाधिकारी धाकोरकर यांनी सभागृहात स्पष्ट केले. मात्र, जेथे शक्य आहे तेथे शिक्षकाला कामगिरीवर काढून पर्यायी व्यवस्था करण्यात येईल असेही सांगितले.जिल्ह्यातील तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे नियोजन केले असून त्यासाठी तालुकानिहाय आवश्यक निधी वितरीत करण्यात येत आहे. देवगड १७ हजार रुपये, दोडामार्ग १२ हजार रुपये, कणकवली १७ हजार रुपये, कुडाळ १७ हजार रुपये, मालवण १५ हजार रुपये, सावंतवाडी १८ हजार रुपये, वैभववाडी १२ हजार रुपये, वेंगुर्ला १२ हजार रुपये एवढा निधी वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती सभेत दिली.जिल्ह्यात शालेय क्रीडा स्पर्धा डिसेंबरमध्ये घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, शालेय स्पर्धांमध्ये काहीवेळा क्रमांक काढण्यावरून वाद होतात. यामुळे प्रशासनाची आणि शाळेचीही बदनामी होते. तरी प्रत्येक शाळेने आपला संघ या क्रीडा स्पर्धेमध्ये उतरविताना खिलाडूवृत्तीने उतरला पाहिजे. पंचांचे निर्णय अंतिम मानले पाहिजेत आणि स्पर्धेत उतरताना पराभव झाला तरी तो पचविण्याची मानसिकता प्रत्येकाची असली पाहिजे. तरी यापुढे शालेय स्पर्धेमध्ये तक्रारी येवू नयेत याबाबतची प्रत्येक शाळेने दक्षता घ्यावी अशा सूचना सभापती गुरूनाथ पेडणेकर यांनी दिल्या. (प्रतिनिधी)