शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत भरतीला स्थगिती : धाकोरकर

By admin | Updated: December 4, 2014 23:49 IST

जिल्ह्यात अनेक उपशिक्षकांची पदे रिक्त आहेत तर नवीन कायद्यानुसार मुख्याध्यापकांची अनेक पदे अतिरिक्त ठरत आहेत.

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शाळांतील शिक्षकांच्या रिक्त पदांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षक नियुक्तीसाठी आंदोलने होऊ लागली आहेत. याकडे सदस्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले असता जोपर्यंत रिक्त पदे भरण्याबाबत न्यायालयाचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही काहीही करू शकत नसल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी रत्नाकर धाकोरकर यांनी सभेत स्पष्ट केले.जिल्हा परिषद शिक्षण समितीची सभा सभापती गुरुनाथ पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडली. यावेळी सदस्या सुकन्या नरसुले, सुषमा कोदे, संजय बगळे, संतोष पाताडे, समिती सचिव तथा प्राथमिकचे शिक्षणाधिकारी रत्नाकर धाकोरकर आदींसह खातेप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.जिल्ह्यात अनेक उपशिक्षकांची पदे रिक्त आहेत तर नवीन कायद्यानुसार मुख्याध्यापकांची अनेक पदे अतिरिक्त ठरत आहेत. याबाबत उपशिक्षकांची रिक्त असलेली पदे अतिरिक्त मुख्याध्यापकांना पदावनत करून भरण्यात येणार होती. मात्र याबाबत मुख्याध्यापकांनी न्यायालयात धाव घेतल्याने आणि न्यायालयाने ‘जैसे थे’चे आदेश दिल्याने रिक्त पदे भरण्यास अडचण निर्माण झाली आहे. शिक्षण विभागाला जिल्ह्यातील शाळांमध्ये शिक्षकांचा समतोल राखणे म्हणजे तारेवरची कसरत बनली आहे. यातच गावोगावी ग्रामस्थांची शिक्षक नियुक्तीसाठी आंदोलने होत आहेत. याकडे सदस्यांनी लक्ष वेधले असता जोपर्यंत न्यायालयाकडून निर्णय येत नाही तोपर्यंत शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत काहीही करू शकत नसल्याचे शिक्षणाधिकारी धाकोरकर यांनी सभागृहात स्पष्ट केले. मात्र, जेथे शक्य आहे तेथे शिक्षकाला कामगिरीवर काढून पर्यायी व्यवस्था करण्यात येईल असेही सांगितले.जिल्ह्यातील तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे नियोजन केले असून त्यासाठी तालुकानिहाय आवश्यक निधी वितरीत करण्यात येत आहे. देवगड १७ हजार रुपये, दोडामार्ग १२ हजार रुपये, कणकवली १७ हजार रुपये, कुडाळ १७ हजार रुपये, मालवण १५ हजार रुपये, सावंतवाडी १८ हजार रुपये, वैभववाडी १२ हजार रुपये, वेंगुर्ला १२ हजार रुपये एवढा निधी वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती सभेत दिली.जिल्ह्यात शालेय क्रीडा स्पर्धा डिसेंबरमध्ये घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, शालेय स्पर्धांमध्ये काहीवेळा क्रमांक काढण्यावरून वाद होतात. यामुळे प्रशासनाची आणि शाळेचीही बदनामी होते. तरी प्रत्येक शाळेने आपला संघ या क्रीडा स्पर्धेमध्ये उतरविताना खिलाडूवृत्तीने उतरला पाहिजे. पंचांचे निर्णय अंतिम मानले पाहिजेत आणि स्पर्धेत उतरताना पराभव झाला तरी तो पचविण्याची मानसिकता प्रत्येकाची असली पाहिजे. तरी यापुढे शालेय स्पर्धेमध्ये तक्रारी येवू नयेत याबाबतची प्रत्येक शाळेने दक्षता घ्यावी अशा सूचना सभापती गुरूनाथ पेडणेकर यांनी दिल्या. (प्रतिनिधी)