शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

निलंबनाची कारवाई होणार

By admin | Updated: October 27, 2015 00:13 IST

तळवडेतील तांदूळ घोटाळा प्रकरण : संस्था पदाधिकाऱ्यांच्या पत्रानंतर उपोषण मागे

तळवडे : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या जनता विद्यालयातील शालेय पोषण आहारातील तांदुळ घोटाळ्याप्रकरणी मुख्याध्यापकांवर कारवाई व्हावी, यासाठी सोमवारी तक्रारदार बाळा जाधव, नवसाजी परब यांनी विद्यालयासमोर आमरण उपोषण केले. संस्था पदाधिकाऱ्यांनी ३० आॅक्टोबरला मुख्याध्यापकांचे निलंबन करण्याचे आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी पाच वाजता उपोषण मागे घेण्यात आले. दरम्यान या घटनेला लागलेल्या राजकीय रंगामुळे विद्यालयाच्या परिसरात दिवसभर तणावपूर्ण वातावरण राहिले. तळवडे शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री जनता विद्यालयात पोषण आहारामध्ये अफरातफर झाली असून पोषण आहारात घोटाळा झाल्याची तक्रार तळवडे गावातील सामाजिक कार्यकर्ते बाळा जाधव व नवसाजी परब यांनी केली होती. त्यानुसार संबंधित शाळेत जिल्हा परिषद शिक्षण सभापती, शैक्षणिक अधिकारी, पंचायत समिती अधिकारी यांनी भेट दिली होती. यावेळी शाळेत रजिस्टर नोंदीनुसार अतिरिक्त पोषण आहार सापडला, असे अधिकारी व संबंधित अधिकारी यांच्या निदर्शनास आले होते. त्यानुसार संबंधित शाळेचे मुख्याध्यापक श्यामसुंदर मालवणकर यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश माध्यमिक विभागाचे जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षणाधिकारी यांनी तळवडे शिक्षण प्रसारक मंडळाला दिले होते. पण प्रत्यक्षात संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई झाली नव्हती. त्यामुळे तक्रारदार बाळा जाधव व नवसाजी परब यांनी तळवडे श्री जनता विद्यालयाकडे आमरण उपोषण सोमवारी सकाळपासून सुरू केले होते. त्यानुसार जनता विद्यालयाकडचा परिसर तंग बनला होता. तळवडे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विष्णू जयराम पेडणेकर व इतर संचालक यांनी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकावर ३० आॅक्टोबरपर्यंत कारवाई करतो, असे तळवडे शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने लेखी पत्र उपोषणकर्त्यांना दिल्यांनंतर हे आमरण उपोषण सोडण्यात आले. त्यावेळी तळवडे सरपंच पंकज पेडणेकर शिक्षण प्रसारक मंडळाचे बाळा पेडणेकर, भालचंद्र कांडरकर, जिल्हा परिषद सदस्या निकीता जाधव, उत्तम परब, जालींदर परब, बाळू साळगावकर, विजय रेडकर, रामचंद्र गावडे आदी उपस्थित होते. या उपोषणावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब, प्रमोद गावडे, यांनी भेट दिली. निरवडे पोलीस पाटील अजित वैद्य, सावंतवाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी, जिल्हा पोलीस कार्यालयातील पोलीस अधिकारी यांनी अनुचित प्रकार घडू नये, याची दक्षता घेतली होती. (प्रतिनिधी)मुख्याध्यापक निर्दोष : प्रकाश परबशाळेचे मुख्याध्यापक मालवणकर हे पोषण आहारात दोषी नसून त्यांनी कोणत्याही प्रकारची अफरातफर केली नाही. राजकीय प्राबल्याचा वापर करून निर्दोष प्रामाणिक शिक्षकास या प्रकरणात गुंतविण्याचे काम उपोषणकर्ते बाळा जाधव व सहकारी करीत आहेत, असे मत प्रकाश परब यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी शासन निर्देशानुसार १०० व १५० ग्रॅम प्रत्येक मुलास पोषण आहार शासन नियमानुसार पटसंख्येनुसार मिळतो. पण सर्व मुले तेवढे पोषण आहार सेवन करत नाही. अतिरिक्त तांदुळ राहिल्यास त्याच प्रशालेतील मुलांना देण्यात येतो. राजकीय स्टंटबाजी करून त्यांना गोवण्यात येत आहे.- प्रकाश परब, संस्था संचालकगुरूनाथ पेडणेकर : संस्थेस कारवाईचा अधिकार शालेय पोषण आहारात तळवडे श्री जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक दोषी आहेत काय? या संदर्भात जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती गुरूनाथ पेडणेकर यांनी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, शासनाच्या नियमानुसार संबंधित शाळेचे मुख्याध्यापक दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई तळवडे शिक्षण प्रसारक मंडळ करू शकते. त्यानुसार प्रशासन स्तरावर तळवडे शिक्षण प्रसारक मंडळास लेखी पत्र दिले आहे. त्यामुळे यासंदर्भात कारवाईचे अधिकार शिक्षण संस्थेस आहेत, असे स्पष्ट केले .