शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

चोरद नदीतील दूषित पाण्याचा गावांना पुरवठा ?

By admin | Updated: January 7, 2015 23:53 IST

पाणीपुरवठा सालाबादप्रमाणे यावर्षीही संवेदनशील होणार आहे

श्रीकांत चाळके -खेड तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना व वाड्यांना करण्यात येत असलेला पाणीपुरवठा सालाबादप्रमाणे यावर्षीही संवेदनशील होणार आहे. गेले काही वर्षे टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत भर पडत आहे. ज्या चोरद नदीतून पाणीपुवठा केला जातो, त्याच नदीतील पाणी दूषित झाल्याने संबंध टंचाईग्रस्त गावांमध्ये खळबळ उडाली आहे. हेच दूषित पाणी सध्या टंचाईग्रस्त गावांना व वाड्यांना पुरवण्यात येणार असल्याने यानिमित्ताने आरोग्याचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला आहे.़ तहसीलदार तसेच संबंधित यंत्रणांनी याबाबत योग्य ती दक्षता घेणे आवश्यक असून, दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे़खेड तालुक्यातील नातूवाडी येथील धरणातून पाणी सोडले जात आहे़ हे पाणी सुकिवलीमार्गे खेड शहराला पुरविले जात आहे.़ धरणातील या पाण्यामुळे सुकिवली येथील चोरद नदीला वर्षभर पाणी असते़ याच पाण्यामुळे खेड शहरातील नागरिकांची पाण्याची सोय होत आहे. तालुक्यातील याच नदीतील पाण्यामुळे टंचाईग्रस्तांचीदेखील तहान भागविली जात आहे़ वर्षानुवर्षे हेच पाणी पिण्यासाठी वापरले जात आहे. मात्र, गेले काही वर्षे जानेवारी ते जून महिन्यादरम्यान विविध कारणांनी या नदीतील पाणी दूषित आहे़ तात्पुरता उपाय शोधण्याखेरीज प्रशासनाने आणि संबंधित ग्रामपंचायतीने आजपर्यंत काहीही केलेले नाही़ या नदीत कपडे धुणे, आंघोळ करणे, जनावरे धुणे आदी प्रकार नित्याचेच होत आहेत़ आजही असे प्रकार सुरू आहेत़ विविध प्रकारची वाहने धुतली जात असल्याने या नदीतील पाणी दूषित झाले आहे़ वाहने धुतल्याने वाहनातील आॅईल पाण्यावर तरंगत असते़ याच नदीकिनारी परप्रांतीय कामगारांची वस्ती आहे. हे सर्व कामगार याच पाण्यात आंघोळ करीत आहेत़ यामुळे पाणी दूषित होत आहे. हेच दूषित पाणी खेड शहराला प्यावे लागत आहे़ यावर्षीही तालुक्यातील खवटी, तुळशी आणि दिवाणखवटी या ३ गावांना पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरविले जात आहे़ खासगी टँकरद्वारे पैसे घेऊन पाणी पुरवले जात असल्याचे समोर आले आहे़काही लीटर पाण्याचा उपसा करण्याचा परवाना असूनही परवान्याच्या शंभर पट दूषित पाणी खासगी टँकरद्वारे उपसले जात आहे.़ सुकिवली आणि भरणे ग्रामपंचायतींनी याबाबत प्रतिवर्षी उपाययोजना करूनही हे पाणी दूषित करण्यात येत आहे. तहसीलदारांकडून कारवाईचे फलक लावण्यात आले आहेत. मात्र, या फलकांवरील आदेशांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत़ आता तहसीलदारांनी देखील याबाबत सत्वर पावले उचलणे आवश्यक झाले आहे़ तालुक्यात पाण्याचे ४६ नमुने दूषित असल्याचा अहवाल सादर करण्यात आल्यानंतर देखील या पाण्याच्या शुध्दिकरणाकडे डोळेझाक का केली जात आहे़ तहसीलदार किंवा संबंधित ग्रामपंचायतीने या नदीकिनारी कायमस्वरूपी सुरक्षारक्षकाची नियुक्ती करणे आवश्यक आहे. नातूनगर येथील धरणातून होणारा हा पाणीपुरवठा एप्रिलपर्यंत सुरू राहणार असल्याने पुढे काय, असा प्रश्न विचारला जात आहे.