शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

चोरद नदीतील दूषित पाण्याचा गावांना पुरवठा ?

By admin | Updated: January 7, 2015 23:53 IST

पाणीपुरवठा सालाबादप्रमाणे यावर्षीही संवेदनशील होणार आहे

श्रीकांत चाळके -खेड तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना व वाड्यांना करण्यात येत असलेला पाणीपुरवठा सालाबादप्रमाणे यावर्षीही संवेदनशील होणार आहे. गेले काही वर्षे टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत भर पडत आहे. ज्या चोरद नदीतून पाणीपुवठा केला जातो, त्याच नदीतील पाणी दूषित झाल्याने संबंध टंचाईग्रस्त गावांमध्ये खळबळ उडाली आहे. हेच दूषित पाणी सध्या टंचाईग्रस्त गावांना व वाड्यांना पुरवण्यात येणार असल्याने यानिमित्ताने आरोग्याचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला आहे.़ तहसीलदार तसेच संबंधित यंत्रणांनी याबाबत योग्य ती दक्षता घेणे आवश्यक असून, दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे़खेड तालुक्यातील नातूवाडी येथील धरणातून पाणी सोडले जात आहे़ हे पाणी सुकिवलीमार्गे खेड शहराला पुरविले जात आहे.़ धरणातील या पाण्यामुळे सुकिवली येथील चोरद नदीला वर्षभर पाणी असते़ याच पाण्यामुळे खेड शहरातील नागरिकांची पाण्याची सोय होत आहे. तालुक्यातील याच नदीतील पाण्यामुळे टंचाईग्रस्तांचीदेखील तहान भागविली जात आहे़ वर्षानुवर्षे हेच पाणी पिण्यासाठी वापरले जात आहे. मात्र, गेले काही वर्षे जानेवारी ते जून महिन्यादरम्यान विविध कारणांनी या नदीतील पाणी दूषित आहे़ तात्पुरता उपाय शोधण्याखेरीज प्रशासनाने आणि संबंधित ग्रामपंचायतीने आजपर्यंत काहीही केलेले नाही़ या नदीत कपडे धुणे, आंघोळ करणे, जनावरे धुणे आदी प्रकार नित्याचेच होत आहेत़ आजही असे प्रकार सुरू आहेत़ विविध प्रकारची वाहने धुतली जात असल्याने या नदीतील पाणी दूषित झाले आहे़ वाहने धुतल्याने वाहनातील आॅईल पाण्यावर तरंगत असते़ याच नदीकिनारी परप्रांतीय कामगारांची वस्ती आहे. हे सर्व कामगार याच पाण्यात आंघोळ करीत आहेत़ यामुळे पाणी दूषित होत आहे. हेच दूषित पाणी खेड शहराला प्यावे लागत आहे़ यावर्षीही तालुक्यातील खवटी, तुळशी आणि दिवाणखवटी या ३ गावांना पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरविले जात आहे़ खासगी टँकरद्वारे पैसे घेऊन पाणी पुरवले जात असल्याचे समोर आले आहे़काही लीटर पाण्याचा उपसा करण्याचा परवाना असूनही परवान्याच्या शंभर पट दूषित पाणी खासगी टँकरद्वारे उपसले जात आहे.़ सुकिवली आणि भरणे ग्रामपंचायतींनी याबाबत प्रतिवर्षी उपाययोजना करूनही हे पाणी दूषित करण्यात येत आहे. तहसीलदारांकडून कारवाईचे फलक लावण्यात आले आहेत. मात्र, या फलकांवरील आदेशांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत़ आता तहसीलदारांनी देखील याबाबत सत्वर पावले उचलणे आवश्यक झाले आहे़ तालुक्यात पाण्याचे ४६ नमुने दूषित असल्याचा अहवाल सादर करण्यात आल्यानंतर देखील या पाण्याच्या शुध्दिकरणाकडे डोळेझाक का केली जात आहे़ तहसीलदार किंवा संबंधित ग्रामपंचायतीने या नदीकिनारी कायमस्वरूपी सुरक्षारक्षकाची नियुक्ती करणे आवश्यक आहे. नातूनगर येथील धरणातून होणारा हा पाणीपुरवठा एप्रिलपर्यंत सुरू राहणार असल्याने पुढे काय, असा प्रश्न विचारला जात आहे.