शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
2
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
3
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
4
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
5
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
6
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
7
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
8
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
9
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
10
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
11
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
12
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
13
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
14
सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली
15
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)
16
Divya Tanwar : कडक सॅल्यूट! आधी IPS आणि नंतर IAS; आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं
17
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
18
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
19
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
20
'दशावतार २' येणार? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, "भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी..."

सुपारी बागायतदार आर्थिक संकटात

By admin | Updated: November 25, 2015 23:17 IST

पावसामुळे भातपिक गेले : बुरशी रोगाने सुपारी पिक नेले, शासनाने मदत करण्याची मागणी

वैभव साळकर ल्ल दोडामार्ग चालूवषी आॅक्टोबर अखेरपर्यंत कोसळणाऱ्या अवकाळी पावसाच्या कहरामुळे दोडामार्ग तालुक्यात ‘बळीराजा’ बरोबरच सुपारी बागायतदारही पुरता कोलमडून गेला आहे. आॅक्टोबर अखेरपर्यंत अविरत कोसळणाऱ्या पावसाने बळीराजाचे ‘भातपिक’ धुळीस मिळविले. तर लांबलेल्या पावसामुळे सुपारीवर ‘बुरशी जन्य’ रोगाने थैमान घातल्याने सुपारी पिकही वाया गेले आहे. त्यामुळे सर्वस्वी शेतीवरच अवलंबून असलेला दोडामार्ग तालुक्यातील बळीराजा आणि बागायतदार वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्याला सावरण्यासाठी शासनाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योग-धंद्याच्या बाबतीत मागासलेला तालुका म्हणजे दोडामार्ग होय. अर्थात उद्योग-धंद्यात जरी हा तालुका मागे असला तरी याच तालुक्यात भातशेती आणि सुपारी पिक सर्वाधिक घेतले जाते. दोडामार्ग तालुक्याचा खऱ्या अर्थाने आर्थिक कणा ‘शेती-बागायती’ राहिला आहे. मात्र चालूवर्षी पावसाच्या लहरीपणामुळे हा कणाच कोलमडल्याचे चित्र आहे. लांबलेल्या आणि अवकाळी पावसाने दोडामार्गमधील बळीराजाला आणि बागायतदाराला पुरते हैराण केले आहे. लांबलेल्या पावसाने चालूवर्षी प्रचंड प्रमाणात दर्जेदार भातशेती करूनही येथील शेतकऱ्यांच्या हाती काहीही राहिलेले नाही. दोडामार्ग तालुक्यात आॅक्टोबरच्या सुरवातीपासूनच दरवर्षी भातकापणीला सुरवात होते. जून ते जलै महिन्यात दरवर्षी पेरणी व लावणी झाल्यानंतर अवघ्या तीन ते साडेतीन महिन्याची भातपिके सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात परिपक्व होतात. त्याच अंदाजाने तालुक्यात पारंपरीक पद्धतीने मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अलिकडच्या काही वर्षात दर्जेदार भातशेती केली जाते. चालूवर्षी तर शासनाने १०० टक्के अनुदानावर भात बियाणांचे वाटप केल्याने तालुक्यात भातशेती क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली होती. तर दर्जेदार संकरीत भात बियाण्यांमुळे आणि सुरवातीपासूनच सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे भातशेतीही चांगली झाली होती. त्यामुळे यावर्षी विक्रमी उत्पादन घेण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न होता. मात्र, हा शेतकऱ्यांचा प्रयत्न पावसाने हाणून पाडत शेतकऱ्यांवर चक्क उपासमारीची वेळ आणली. आॅक्टोबर सुरुवातीपासून पिकलेल्या भाताची आॅक्टोबरअखेर पर्यंत पाऊस पडल्याने भात कापणी झाली नाही. त्यामुळे सुरवातीला भातशेतीचे नुकसान झाले. तर त्यानंतर नोव्हेंबरपासून पावसाने उसंत घेतल्याने भात कापणी सुरू झाली. मात्र, अधुन-मधून पाऊस कोसळल्याने काही ठिकाणी कापणी केलेली भातशेती जाग्यावरच कुजली, नव्हे तर चक्क कापणी केलेल्या भात पिकाच्या आडवांना कोंब आले. शिवाय भात कापणी लांबल्याने उरले-सुरले भातपिकही जाग्यावरच गळून पडले. एकूणच येथील बळीराजाच्या हाती आता नुसत्या गवतापलिकडे काहीही राहीलेले नाही. त्यामुळे शासन स्तरावर त्याचा गांभिर्याने विचार होणे आवश्यक आहे.