शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

सुपारी बागायतदार आर्थिक संकटात

By admin | Updated: November 25, 2015 23:17 IST

पावसामुळे भातपिक गेले : बुरशी रोगाने सुपारी पिक नेले, शासनाने मदत करण्याची मागणी

वैभव साळकर ल्ल दोडामार्ग चालूवषी आॅक्टोबर अखेरपर्यंत कोसळणाऱ्या अवकाळी पावसाच्या कहरामुळे दोडामार्ग तालुक्यात ‘बळीराजा’ बरोबरच सुपारी बागायतदारही पुरता कोलमडून गेला आहे. आॅक्टोबर अखेरपर्यंत अविरत कोसळणाऱ्या पावसाने बळीराजाचे ‘भातपिक’ धुळीस मिळविले. तर लांबलेल्या पावसामुळे सुपारीवर ‘बुरशी जन्य’ रोगाने थैमान घातल्याने सुपारी पिकही वाया गेले आहे. त्यामुळे सर्वस्वी शेतीवरच अवलंबून असलेला दोडामार्ग तालुक्यातील बळीराजा आणि बागायतदार वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्याला सावरण्यासाठी शासनाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योग-धंद्याच्या बाबतीत मागासलेला तालुका म्हणजे दोडामार्ग होय. अर्थात उद्योग-धंद्यात जरी हा तालुका मागे असला तरी याच तालुक्यात भातशेती आणि सुपारी पिक सर्वाधिक घेतले जाते. दोडामार्ग तालुक्याचा खऱ्या अर्थाने आर्थिक कणा ‘शेती-बागायती’ राहिला आहे. मात्र चालूवर्षी पावसाच्या लहरीपणामुळे हा कणाच कोलमडल्याचे चित्र आहे. लांबलेल्या आणि अवकाळी पावसाने दोडामार्गमधील बळीराजाला आणि बागायतदाराला पुरते हैराण केले आहे. लांबलेल्या पावसाने चालूवर्षी प्रचंड प्रमाणात दर्जेदार भातशेती करूनही येथील शेतकऱ्यांच्या हाती काहीही राहिलेले नाही. दोडामार्ग तालुक्यात आॅक्टोबरच्या सुरवातीपासूनच दरवर्षी भातकापणीला सुरवात होते. जून ते जलै महिन्यात दरवर्षी पेरणी व लावणी झाल्यानंतर अवघ्या तीन ते साडेतीन महिन्याची भातपिके सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात परिपक्व होतात. त्याच अंदाजाने तालुक्यात पारंपरीक पद्धतीने मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अलिकडच्या काही वर्षात दर्जेदार भातशेती केली जाते. चालूवर्षी तर शासनाने १०० टक्के अनुदानावर भात बियाणांचे वाटप केल्याने तालुक्यात भातशेती क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली होती. तर दर्जेदार संकरीत भात बियाण्यांमुळे आणि सुरवातीपासूनच सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे भातशेतीही चांगली झाली होती. त्यामुळे यावर्षी विक्रमी उत्पादन घेण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न होता. मात्र, हा शेतकऱ्यांचा प्रयत्न पावसाने हाणून पाडत शेतकऱ्यांवर चक्क उपासमारीची वेळ आणली. आॅक्टोबर सुरुवातीपासून पिकलेल्या भाताची आॅक्टोबरअखेर पर्यंत पाऊस पडल्याने भात कापणी झाली नाही. त्यामुळे सुरवातीला भातशेतीचे नुकसान झाले. तर त्यानंतर नोव्हेंबरपासून पावसाने उसंत घेतल्याने भात कापणी सुरू झाली. मात्र, अधुन-मधून पाऊस कोसळल्याने काही ठिकाणी कापणी केलेली भातशेती जाग्यावरच कुजली, नव्हे तर चक्क कापणी केलेल्या भात पिकाच्या आडवांना कोंब आले. शिवाय भात कापणी लांबल्याने उरले-सुरले भातपिकही जाग्यावरच गळून पडले. एकूणच येथील बळीराजाच्या हाती आता नुसत्या गवतापलिकडे काहीही राहीलेले नाही. त्यामुळे शासन स्तरावर त्याचा गांभिर्याने विचार होणे आवश्यक आहे.