शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
3
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
4
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
5
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
6
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
7
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
8
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
9
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
10
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
11
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
12
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
13
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
14
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
16
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
17
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
18
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
19
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
20
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'

सुपारी बागायतदार आर्थिक संकटात

By admin | Updated: November 25, 2015 23:17 IST

पावसामुळे भातपिक गेले : बुरशी रोगाने सुपारी पिक नेले, शासनाने मदत करण्याची मागणी

वैभव साळकर ल्ल दोडामार्ग चालूवषी आॅक्टोबर अखेरपर्यंत कोसळणाऱ्या अवकाळी पावसाच्या कहरामुळे दोडामार्ग तालुक्यात ‘बळीराजा’ बरोबरच सुपारी बागायतदारही पुरता कोलमडून गेला आहे. आॅक्टोबर अखेरपर्यंत अविरत कोसळणाऱ्या पावसाने बळीराजाचे ‘भातपिक’ धुळीस मिळविले. तर लांबलेल्या पावसामुळे सुपारीवर ‘बुरशी जन्य’ रोगाने थैमान घातल्याने सुपारी पिकही वाया गेले आहे. त्यामुळे सर्वस्वी शेतीवरच अवलंबून असलेला दोडामार्ग तालुक्यातील बळीराजा आणि बागायतदार वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्याला सावरण्यासाठी शासनाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योग-धंद्याच्या बाबतीत मागासलेला तालुका म्हणजे दोडामार्ग होय. अर्थात उद्योग-धंद्यात जरी हा तालुका मागे असला तरी याच तालुक्यात भातशेती आणि सुपारी पिक सर्वाधिक घेतले जाते. दोडामार्ग तालुक्याचा खऱ्या अर्थाने आर्थिक कणा ‘शेती-बागायती’ राहिला आहे. मात्र चालूवर्षी पावसाच्या लहरीपणामुळे हा कणाच कोलमडल्याचे चित्र आहे. लांबलेल्या आणि अवकाळी पावसाने दोडामार्गमधील बळीराजाला आणि बागायतदाराला पुरते हैराण केले आहे. लांबलेल्या पावसाने चालूवर्षी प्रचंड प्रमाणात दर्जेदार भातशेती करूनही येथील शेतकऱ्यांच्या हाती काहीही राहिलेले नाही. दोडामार्ग तालुक्यात आॅक्टोबरच्या सुरवातीपासूनच दरवर्षी भातकापणीला सुरवात होते. जून ते जलै महिन्यात दरवर्षी पेरणी व लावणी झाल्यानंतर अवघ्या तीन ते साडेतीन महिन्याची भातपिके सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात परिपक्व होतात. त्याच अंदाजाने तालुक्यात पारंपरीक पद्धतीने मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अलिकडच्या काही वर्षात दर्जेदार भातशेती केली जाते. चालूवर्षी तर शासनाने १०० टक्के अनुदानावर भात बियाणांचे वाटप केल्याने तालुक्यात भातशेती क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली होती. तर दर्जेदार संकरीत भात बियाण्यांमुळे आणि सुरवातीपासूनच सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे भातशेतीही चांगली झाली होती. त्यामुळे यावर्षी विक्रमी उत्पादन घेण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न होता. मात्र, हा शेतकऱ्यांचा प्रयत्न पावसाने हाणून पाडत शेतकऱ्यांवर चक्क उपासमारीची वेळ आणली. आॅक्टोबर सुरुवातीपासून पिकलेल्या भाताची आॅक्टोबरअखेर पर्यंत पाऊस पडल्याने भात कापणी झाली नाही. त्यामुळे सुरवातीला भातशेतीचे नुकसान झाले. तर त्यानंतर नोव्हेंबरपासून पावसाने उसंत घेतल्याने भात कापणी सुरू झाली. मात्र, अधुन-मधून पाऊस कोसळल्याने काही ठिकाणी कापणी केलेली भातशेती जाग्यावरच कुजली, नव्हे तर चक्क कापणी केलेल्या भात पिकाच्या आडवांना कोंब आले. शिवाय भात कापणी लांबल्याने उरले-सुरले भातपिकही जाग्यावरच गळून पडले. एकूणच येथील बळीराजाच्या हाती आता नुसत्या गवतापलिकडे काहीही राहीलेले नाही. त्यामुळे शासन स्तरावर त्याचा गांभिर्याने विचार होणे आवश्यक आहे.