शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

उन्हाळी पर्यटन हंगामाने आंबोली बहरली

By admin | Updated: May 19, 2016 23:59 IST

मधुर धुक्याची चादर : पर्यटकांचा मुक्काम वाढला

आंबोली : आंबोलीत सद्या उन्हाळी पर्यटन हंगामानिमित्त पर्यटकांची रेलचेल वाढली असून अधूनमधून पडणाऱ्या सरीमुळे हा हंगाम आणखीनच बहरला आहे. तर शहरावर ओढली जाणारी धुक्याची चादर पर्यटकांना आकर्षक करत आहे. शहरातील वाढत्या उखाड्यापासून आणि धकाधकीपासून आपली सुटका करून घेण्यासाठी मुंबई पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यटक आंबोलीत आपला मुक्काम वाढवत येथील थंड हवेच्या ठिकाणांना भेटी देताना दिसत आहेत. आंबोलीत साधारणत: एप्रिल महिन्यापासून पर्यटक येण्यास सुरूवात होते. परंतु गेल्या काही वर्षातील स्पर्धा परीक्षा, करिअरच्यादृष्टीने अती जागरूक झालेले पालक आपल्या पाल्यांना विविध खाजगी शिकविण्यामध्ये भरती करत असल्याने त्याचा परिणाम इथल्या पर्यटनावर दिसू लागला आहे. आता पर्यटक तब्बल २५ दिवस उशिराने म्हणजे १० मे च्या दरम्यान आंबोलीत येत असल्याचे दिसत आहे. शिवाय येथील पर्यटनस्थळांची संख्या मर्यादित असल्याने आंबोली अवघ्या एका दिवसात पाहून लोक निघत आहेत. आंबोलीत पंधरा ते सोळा निवासी व्यवस्था असलेले हॉटेल्स आणि पस्तीसच्या आसपास भोजनालये आहेत. सद्यस्थितीत या सर्वच्या सर्व हॉटेल्सची आरक्षणे पूर्ण होत आली असून हा पर्यटन हंगाम १० जूनपर्यंत चालणार आहे. पर्यटक मोठ्या संख्येने सद्या सुट्टीची मजा लुटताना आढळत आहेत. (वार्ताहर)