शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

कोकणात काजू पिकासाठी सुयोग्य स्थिती

By admin | Updated: November 28, 2014 23:52 IST

व्यंकटेश हुबळी : वेंगुर्लेत राज्यस्तरीय काजूपीक कार्यशाळा

वेंगुर्ले : कोकणात काजू लावगडीसाठी योग्य जमीन आहे. एक हेक्टरला ३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याने त्याचा फायदा येथील शेतकऱ्यांना होऊ शकतो. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी भरपूर प्रमाणात काजू पीक घ्यावे, असे आवाहन व्यंकटेश हुबळी यांनी वेंगुर्ले येथे केले. यावेळी काजू पीक कार्यशाळेचे औचित्य साधून काजू लागवड तंत्रज्ञान या शेतकऱ्यांना उपयुक्त अशा पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले.काजू व कोको विकास संचालनालय, कोची आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले येथे राज्यस्तरीय काजू पीक कार्यशाळेचे आयोजन केले होते. याचे उद्घाटन कोची येथील काजू व कोको विकास संचालनालयाचे संचालक कोची येथील व्यंकटेश हुबळी यांच्या हस्ते झाले. शेतकऱ्यांना काजू पिकाला लागणारी किडे, खते व अन्य समस्यांबाबत माहिती व्हावी, यासाठी या राज्यस्तरीय काजू पीक लागवडीसाठी आयोजन केले होते. यावेळी प्रास्ताविकात प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्लेचे संचालक डॉ. बी. आर. साळवी यांनी काजू लागवडीच्या क्षेत्राबाबत व उत्पादनाबाबत माहिती सांगून व्हिएतनाममध्ये व वेंगुर्ले तालुक्यात काजूचे उत्पादन घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी बदलत्या काळानुसार शास्त्रीय दृष्टीकोन ठेवून शेती करावी. पाणी व खत याचा योग्य प्रमाणात वापर केल्यास चांगल्याप्रकारे काजू पीक घेता येईल, असे प्रतिपादन संशोधन संचालक डॉ. उत्तम महाडकर यांनी केले. यावेळी हुबळी यांचा डॉ. बी. आर. साळवी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संशोधन संचालक डॉ. उत्तम महाडकर, डॉ. बी. एन. सावंत व अन्य मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार डॉ. बी. एन. सावंत यांनी मानले. मृदशास्त्रज्ञ डॉ. व्ही. जी. साळवी यांनी काजू खते व्यवस्थापन, किटकशास्त्रज्ञ व्ही. के. झोटे यांनी काजूवरील ढोकण्या व इतर महत्त्वाच्या किडी व त्यांची नियंत्रण, ए. वाय. मुंज यांनी काजूवरील खोड व मूळ पोखरणारी कीड व त्यांचे नियंत्रण, वनस्पती विकृतीशास्त्रज्ञ डॉ. पी. डी. पाटील यांनी काजूवरील रोग व त्यांचे नियंत्रण आदींवर मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला. (प्रतिनिधी).शेतकऱ्यांची पाठराज्यस्तरीय काजू पीक कार्यशाळेला राज्यातील शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. जिल्ह्यातीलही मोजकेच शेतकरी उपस्थित होते. केंद्रातीलच कर्मचाऱ्यांची उपस्थिती जास्त होती.