शहरं
Join us  
Trending Stories
1
आता इस्लामिक देश कतारवरच इराणचा हल्ला, येथेच आहे अमेरिकेचा सर्वात मोठा एअरबेस; सहा क्षेपणास्त्रे डागली
2
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
3
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
4
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
5
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
6
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
7
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
8
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
11
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
12
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
13
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
14
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
15
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
16
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
17
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

कोकणात काजू पिकासाठी सुयोग्य स्थिती

By admin | Updated: November 28, 2014 23:52 IST

व्यंकटेश हुबळी : वेंगुर्लेत राज्यस्तरीय काजूपीक कार्यशाळा

वेंगुर्ले : कोकणात काजू लावगडीसाठी योग्य जमीन आहे. एक हेक्टरला ३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याने त्याचा फायदा येथील शेतकऱ्यांना होऊ शकतो. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी भरपूर प्रमाणात काजू पीक घ्यावे, असे आवाहन व्यंकटेश हुबळी यांनी वेंगुर्ले येथे केले. यावेळी काजू पीक कार्यशाळेचे औचित्य साधून काजू लागवड तंत्रज्ञान या शेतकऱ्यांना उपयुक्त अशा पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले.काजू व कोको विकास संचालनालय, कोची आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले येथे राज्यस्तरीय काजू पीक कार्यशाळेचे आयोजन केले होते. याचे उद्घाटन कोची येथील काजू व कोको विकास संचालनालयाचे संचालक कोची येथील व्यंकटेश हुबळी यांच्या हस्ते झाले. शेतकऱ्यांना काजू पिकाला लागणारी किडे, खते व अन्य समस्यांबाबत माहिती व्हावी, यासाठी या राज्यस्तरीय काजू पीक लागवडीसाठी आयोजन केले होते. यावेळी प्रास्ताविकात प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्लेचे संचालक डॉ. बी. आर. साळवी यांनी काजू लागवडीच्या क्षेत्राबाबत व उत्पादनाबाबत माहिती सांगून व्हिएतनाममध्ये व वेंगुर्ले तालुक्यात काजूचे उत्पादन घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी बदलत्या काळानुसार शास्त्रीय दृष्टीकोन ठेवून शेती करावी. पाणी व खत याचा योग्य प्रमाणात वापर केल्यास चांगल्याप्रकारे काजू पीक घेता येईल, असे प्रतिपादन संशोधन संचालक डॉ. उत्तम महाडकर यांनी केले. यावेळी हुबळी यांचा डॉ. बी. आर. साळवी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संशोधन संचालक डॉ. उत्तम महाडकर, डॉ. बी. एन. सावंत व अन्य मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार डॉ. बी. एन. सावंत यांनी मानले. मृदशास्त्रज्ञ डॉ. व्ही. जी. साळवी यांनी काजू खते व्यवस्थापन, किटकशास्त्रज्ञ व्ही. के. झोटे यांनी काजूवरील ढोकण्या व इतर महत्त्वाच्या किडी व त्यांची नियंत्रण, ए. वाय. मुंज यांनी काजूवरील खोड व मूळ पोखरणारी कीड व त्यांचे नियंत्रण, वनस्पती विकृतीशास्त्रज्ञ डॉ. पी. डी. पाटील यांनी काजूवरील रोग व त्यांचे नियंत्रण आदींवर मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला. (प्रतिनिधी).शेतकऱ्यांची पाठराज्यस्तरीय काजू पीक कार्यशाळेला राज्यातील शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. जिल्ह्यातीलही मोजकेच शेतकरी उपस्थित होते. केंद्रातीलच कर्मचाऱ्यांची उपस्थिती जास्त होती.