शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

कोकणात काजू पिकासाठी सुयोग्य स्थिती

By admin | Updated: November 28, 2014 23:52 IST

व्यंकटेश हुबळी : वेंगुर्लेत राज्यस्तरीय काजूपीक कार्यशाळा

वेंगुर्ले : कोकणात काजू लावगडीसाठी योग्य जमीन आहे. एक हेक्टरला ३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याने त्याचा फायदा येथील शेतकऱ्यांना होऊ शकतो. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी भरपूर प्रमाणात काजू पीक घ्यावे, असे आवाहन व्यंकटेश हुबळी यांनी वेंगुर्ले येथे केले. यावेळी काजू पीक कार्यशाळेचे औचित्य साधून काजू लागवड तंत्रज्ञान या शेतकऱ्यांना उपयुक्त अशा पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले.काजू व कोको विकास संचालनालय, कोची आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले येथे राज्यस्तरीय काजू पीक कार्यशाळेचे आयोजन केले होते. याचे उद्घाटन कोची येथील काजू व कोको विकास संचालनालयाचे संचालक कोची येथील व्यंकटेश हुबळी यांच्या हस्ते झाले. शेतकऱ्यांना काजू पिकाला लागणारी किडे, खते व अन्य समस्यांबाबत माहिती व्हावी, यासाठी या राज्यस्तरीय काजू पीक लागवडीसाठी आयोजन केले होते. यावेळी प्रास्ताविकात प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्लेचे संचालक डॉ. बी. आर. साळवी यांनी काजू लागवडीच्या क्षेत्राबाबत व उत्पादनाबाबत माहिती सांगून व्हिएतनाममध्ये व वेंगुर्ले तालुक्यात काजूचे उत्पादन घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी बदलत्या काळानुसार शास्त्रीय दृष्टीकोन ठेवून शेती करावी. पाणी व खत याचा योग्य प्रमाणात वापर केल्यास चांगल्याप्रकारे काजू पीक घेता येईल, असे प्रतिपादन संशोधन संचालक डॉ. उत्तम महाडकर यांनी केले. यावेळी हुबळी यांचा डॉ. बी. आर. साळवी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संशोधन संचालक डॉ. उत्तम महाडकर, डॉ. बी. एन. सावंत व अन्य मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार डॉ. बी. एन. सावंत यांनी मानले. मृदशास्त्रज्ञ डॉ. व्ही. जी. साळवी यांनी काजू खते व्यवस्थापन, किटकशास्त्रज्ञ व्ही. के. झोटे यांनी काजूवरील ढोकण्या व इतर महत्त्वाच्या किडी व त्यांची नियंत्रण, ए. वाय. मुंज यांनी काजूवरील खोड व मूळ पोखरणारी कीड व त्यांचे नियंत्रण, वनस्पती विकृतीशास्त्रज्ञ डॉ. पी. डी. पाटील यांनी काजूवरील रोग व त्यांचे नियंत्रण आदींवर मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला. (प्रतिनिधी).शेतकऱ्यांची पाठराज्यस्तरीय काजू पीक कार्यशाळेला राज्यातील शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. जिल्ह्यातीलही मोजकेच शेतकरी उपस्थित होते. केंद्रातीलच कर्मचाऱ्यांची उपस्थिती जास्त होती.