शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

अवकाळीची नुकसान भरपाई परत जाणार

By admin | Updated: March 25, 2016 00:02 IST

संजय सामंत : स्थानिक प्रशासनावर जबाबदारी

सावंतवाडी : अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याचे आदेश शासनाने दिलेले असतानाही सावंतवाडी तालुक्यातील चार हजार शेतकरी अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईपासून वंचित राहिले आहेत. याला सर्वस्वी तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी जबाबदार आहेत. त्यांच्यावर जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी भावई शेतकरी मंडळ झारापचे अध्यक्ष संजय सामंत यांनी केली आहे. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शेतकरी यशवंत प्रभूतेंडोलकर, अमेय प्रभूतेंडोलकर, निरवडे गावचे सरपंच उत्तम पांढरे, आदी उपस्थित होते.यावेळी सामंत म्हणाले, जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या समस्या आहेत; पण त्यांचे निराकरण होत नाही. सावंतवाडीत तब्बल चार हजार शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित आहेत. यामुळे शासनाकडून आलेले सुमारे अडीच कोटी रुपये मागे जाऊ शकतात. ही नुकसान भरपाई मार्चपूर्वी देणे अपेक्षित असल्याचे सामंत यांनी सांगितले. वेंगुर्ले तालुक्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा सरसकट पंचनामा करण्यात आला. पण, सावंतवाडी तालुक्यात मात्र या उलट झाले आहे. ३० टक्के क्षेत्राचाच पंचनामा करण्यात आला आहे.त्यामुळे ही नुकसान भरपाई फक्त ३० टक्केच मिळणार आहे. शासनाने सामाईक खातेदाराबाबत नवीन शासन निर्णय जाहीर केला आहे. तसेच या निर्देषानुसारच ही नुकसान भरपाई द्या, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. तरीही अद्याप ६० टक्के नुकसान भरपाई शेतकऱ्यांना पोहोचली नाही. हे दुर्दैव आहे. याबाबत आम्ही जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांची भेट घेऊन सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातला. त्यांनी आमची बैठकही घेतली. त्या बैठकीत स्थानिक प्रशासन म्हणजेच तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार यांच्या चुकीच्या धोरणामुळेच ही नुकसान भरपाई मिळाली नाही. यावर बैठकीत शिक्कामोर्तब झाले असतानाही अद्यापपर्यंत हा अन्याय दूर करण्यात आला नाही.सावंतवाडी तालुक्यातील ४२६८ शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित असल्याने त्यावर तातडीने निर्णय व्हावा. याबाबत पालकमंत्री दीपक केसरकर यांचे आम्ही लक्ष वेधणार असून त्यांच्याकडे तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार यांच्यावर कारवाईची मागणी करणार असल्याचे यावेळी सामंत यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)