शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
2
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
4
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
5
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
6
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
7
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
8
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
9
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
10
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
11
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
12
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
13
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
14
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
15
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
16
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
17
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
18
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
19
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
20
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!

अवकाळीची नुकसान भरपाई परत जाणार

By admin | Updated: March 25, 2016 00:02 IST

संजय सामंत : स्थानिक प्रशासनावर जबाबदारी

सावंतवाडी : अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याचे आदेश शासनाने दिलेले असतानाही सावंतवाडी तालुक्यातील चार हजार शेतकरी अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईपासून वंचित राहिले आहेत. याला सर्वस्वी तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी जबाबदार आहेत. त्यांच्यावर जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी भावई शेतकरी मंडळ झारापचे अध्यक्ष संजय सामंत यांनी केली आहे. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शेतकरी यशवंत प्रभूतेंडोलकर, अमेय प्रभूतेंडोलकर, निरवडे गावचे सरपंच उत्तम पांढरे, आदी उपस्थित होते.यावेळी सामंत म्हणाले, जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या समस्या आहेत; पण त्यांचे निराकरण होत नाही. सावंतवाडीत तब्बल चार हजार शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित आहेत. यामुळे शासनाकडून आलेले सुमारे अडीच कोटी रुपये मागे जाऊ शकतात. ही नुकसान भरपाई मार्चपूर्वी देणे अपेक्षित असल्याचे सामंत यांनी सांगितले. वेंगुर्ले तालुक्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा सरसकट पंचनामा करण्यात आला. पण, सावंतवाडी तालुक्यात मात्र या उलट झाले आहे. ३० टक्के क्षेत्राचाच पंचनामा करण्यात आला आहे.त्यामुळे ही नुकसान भरपाई फक्त ३० टक्केच मिळणार आहे. शासनाने सामाईक खातेदाराबाबत नवीन शासन निर्णय जाहीर केला आहे. तसेच या निर्देषानुसारच ही नुकसान भरपाई द्या, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. तरीही अद्याप ६० टक्के नुकसान भरपाई शेतकऱ्यांना पोहोचली नाही. हे दुर्दैव आहे. याबाबत आम्ही जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांची भेट घेऊन सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातला. त्यांनी आमची बैठकही घेतली. त्या बैठकीत स्थानिक प्रशासन म्हणजेच तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार यांच्या चुकीच्या धोरणामुळेच ही नुकसान भरपाई मिळाली नाही. यावर बैठकीत शिक्कामोर्तब झाले असतानाही अद्यापपर्यंत हा अन्याय दूर करण्यात आला नाही.सावंतवाडी तालुक्यातील ४२६८ शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित असल्याने त्यावर तातडीने निर्णय व्हावा. याबाबत पालकमंत्री दीपक केसरकर यांचे आम्ही लक्ष वेधणार असून त्यांच्याकडे तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार यांच्यावर कारवाईची मागणी करणार असल्याचे यावेळी सामंत यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)