शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2016 01:00 IST

दोडामार्ग बाजारपेठेत मारहाणीचे पडसाद : दोषींवर कडक कारवाईसाठी ग्रामस्थ आक्रमक

दोडामार्ग : गोव्यातील तरूणांकडून दोडामार्ग बाजारपेठेतील स्थानिकांना झालेल्या मारहाणीचे तीव्र पडसाद शहरात उमटल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी उपविभागीय पोलीस अधिकारी पी. सी. चिंचाळकर यांनी दोडामार्गला भेट देत घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर पोलीस ठाण्यात ग्रामस्थांशी त्यांनी यासंदर्भात चर्चा केली. यावेळी उपस्थित नागरिकांनी पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण होऊन देखील मारहाण करणाऱ्या गोव्यातील गुंडांवर गुन्हा दाखल का केला नाही? असा सवाल उपस्थित करीत दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी लावून धरली. रात्री उशिरापर्यंत ही चर्चा सुरू होती.बुधवारी सायंकाळी कलंगुट गोवा येथील चौघा तरूणांकडून दोडामार्ग पंचायत समितीचे उपसभापती आनंद रेडकर व त्यांचे भाऊ नाना रेडकर यांना मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत दोघेही रेडकर बंधू गंभीर जखमी झाले होते. ज्यावेळी मारहाणीची घटना घडली, तेव्हा त्यांना सोडवायला गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सुध्दा मारहाण झाली होती. स्थानिक ग्रामस्थांनी मारहाण करणाऱ्या तिघांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. तर चौथा तरूण पळाला होता. पोलिसांनी या तिघांना अटक केल्यानंतर त्यांची दुसऱ्या दिवशी जामिनावर मुक्तता झाली. त्या तिघाही तरूणांना जामीन मिळायला पोलिसांनी मदत केली. त्यांच्या कमकुवत कारवाईमुळेच न्यायालयाने जामीन मंजूर केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. तसेच पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ दोडामार्ग बाजारपेठ पूर्णत: बंद ठेवून कडकडीत बंद पाळत सर्वपक्षीय बैठकीत पोलीस निरीक्षक जे. बी. सूर्यवंशी व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांच्या बदलीची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांना याबाबत निवेदन देण्यात आले होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी सायंकाळी उशिरा उपविभागीय पोलीस अधिकारी पी. सी. चिंंचाळकर यांनी दोडामार्गला भेट दिली. पोलीस निरीक्षक जे. बी. सूर्यवंशी यांच्यासोबत त्यांनी बाजारपेठेतील घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर पोलीस ठाण्यात नागरिकांशी यासंदर्भात चर्चा केली. यावेळी सेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव धुरी, भाजपचे तालुकाप्रमुख संदीप नाईक, संदेश बोर्डेकर, चेतन चव्हाण, संदेश नाईक, संदीप रेडकर, आनंद रेडकर, संदीप गवस, आनंद तांबुळकर, लवू मिरकर, गोविंद शिरोडकर, यशवंत आठलेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)ग्रामस्थांशी चर्चा : अधिकाऱ्यांना धरले धारेवर४या बैठकीत नागरिकांनी पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण होऊनसुध्दा मारहाण करणाऱ्या गोव्यातील तरूणांवर गुन्हा दाखला का केला नाही, असा प्रश्न उपस्थित करीत त्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत याच गोष्टीवर चर्चा सुरू होती. जामीन नामंजूर करून आरोपींना पोलीस कोठडी मिळावी, यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात रिव्हिजन अर्ज दाखल केला असल्याचे चिंचाळकर म्हणाले. रात्री उशिरापर्यंत चिंचाळकर आणि ग्रामस्थ यांच्यात चर्चा सुरू होती.