शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2016 01:00 IST

दोडामार्ग बाजारपेठेत मारहाणीचे पडसाद : दोषींवर कडक कारवाईसाठी ग्रामस्थ आक्रमक

दोडामार्ग : गोव्यातील तरूणांकडून दोडामार्ग बाजारपेठेतील स्थानिकांना झालेल्या मारहाणीचे तीव्र पडसाद शहरात उमटल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी उपविभागीय पोलीस अधिकारी पी. सी. चिंचाळकर यांनी दोडामार्गला भेट देत घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर पोलीस ठाण्यात ग्रामस्थांशी त्यांनी यासंदर्भात चर्चा केली. यावेळी उपस्थित नागरिकांनी पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण होऊन देखील मारहाण करणाऱ्या गोव्यातील गुंडांवर गुन्हा दाखल का केला नाही? असा सवाल उपस्थित करीत दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी लावून धरली. रात्री उशिरापर्यंत ही चर्चा सुरू होती.बुधवारी सायंकाळी कलंगुट गोवा येथील चौघा तरूणांकडून दोडामार्ग पंचायत समितीचे उपसभापती आनंद रेडकर व त्यांचे भाऊ नाना रेडकर यांना मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत दोघेही रेडकर बंधू गंभीर जखमी झाले होते. ज्यावेळी मारहाणीची घटना घडली, तेव्हा त्यांना सोडवायला गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सुध्दा मारहाण झाली होती. स्थानिक ग्रामस्थांनी मारहाण करणाऱ्या तिघांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. तर चौथा तरूण पळाला होता. पोलिसांनी या तिघांना अटक केल्यानंतर त्यांची दुसऱ्या दिवशी जामिनावर मुक्तता झाली. त्या तिघाही तरूणांना जामीन मिळायला पोलिसांनी मदत केली. त्यांच्या कमकुवत कारवाईमुळेच न्यायालयाने जामीन मंजूर केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. तसेच पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ दोडामार्ग बाजारपेठ पूर्णत: बंद ठेवून कडकडीत बंद पाळत सर्वपक्षीय बैठकीत पोलीस निरीक्षक जे. बी. सूर्यवंशी व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांच्या बदलीची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांना याबाबत निवेदन देण्यात आले होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी सायंकाळी उशिरा उपविभागीय पोलीस अधिकारी पी. सी. चिंंचाळकर यांनी दोडामार्गला भेट दिली. पोलीस निरीक्षक जे. बी. सूर्यवंशी यांच्यासोबत त्यांनी बाजारपेठेतील घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर पोलीस ठाण्यात नागरिकांशी यासंदर्भात चर्चा केली. यावेळी सेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव धुरी, भाजपचे तालुकाप्रमुख संदीप नाईक, संदेश बोर्डेकर, चेतन चव्हाण, संदेश नाईक, संदीप रेडकर, आनंद रेडकर, संदीप गवस, आनंद तांबुळकर, लवू मिरकर, गोविंद शिरोडकर, यशवंत आठलेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)ग्रामस्थांशी चर्चा : अधिकाऱ्यांना धरले धारेवर४या बैठकीत नागरिकांनी पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण होऊनसुध्दा मारहाण करणाऱ्या गोव्यातील तरूणांवर गुन्हा दाखला का केला नाही, असा प्रश्न उपस्थित करीत त्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत याच गोष्टीवर चर्चा सुरू होती. जामीन नामंजूर करून आरोपींना पोलीस कोठडी मिळावी, यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात रिव्हिजन अर्ज दाखल केला असल्याचे चिंचाळकर म्हणाले. रात्री उशिरापर्यंत चिंचाळकर आणि ग्रामस्थ यांच्यात चर्चा सुरू होती.