शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी.च्या खासगीकरणाचा डाव हाणून पाडू

By admin | Updated: July 25, 2016 00:28 IST

मोहन केळुसकर : कोकण विकास आघाडीच्या बैठकीत दिला इशारा

कणकवली : लांब पल्ल्याच्या गाड्या बंद करून तसेच मॅक्सीकॅबला परवानगी देऊन एस. टी. महामंडळाच्या खासगीकरणास वाव दिला जात आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस म्हणजे ग्रामीण भागातील जनतेच्या विकासाच्या धमण्या आहेत. एस. टी. च्या खासगीकरणाचा डाव हाणून पाडू, असा इशारा कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी दिला आहे. दादर-मुंबई येथील कार्यालयात या संदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सरचिटणीस सूर्यकांत पावसकर, उपाध्यक्ष भाऊसाहेब परब, प्रकाश तावडे, चंद्रकांत आंब्रे, रमाकांत जाधव, सुरेश गुडेकर, भिकाजी जाधव, गणपत चव्हाण, विलास गांगण आदी उपस्थित होते. केळुसकर म्हणाले की, राज्यातील सत्ताधारी पक्ष आणि अधिकारी ग्रामीण भागातील विकासाची ही धमणी खुडण्याचे काम करीत आहेत. मात्र ग्रामीण भागातील विकासाचा चेहरामोहरा असलेल्या एस. टी. महामंडळाच्या खासगीकरणाचे प्रयत्न यापुढे चालू राहिल्यास ग्रामीण भागातील मतदार सत्ताधीशांना पुढील निवडणुकीत पायउतार केल्याशिवाय राहणार नाहीत. राज्यातील एस. टी. महामंडळासह बेस्ट, पीएमटी, टीएमटी आदी महानगरपालिकांच्या हद्दीत चालविल्या जाणाऱ्या परिवहन सेवेच्या ठिकाणी मॅक्सीकॅबला परवानगी देण्याचे घाटत आहे. त्यामुळे एस. टी. चा तोटा आणखी वाढणार आहे. एकप्रकारे एस. टी. च्या खासगीकरणाची ही सुरुवात आहे. रस्ता तेथे एस. टी. हे बिरुद घेऊन गेल्या ६० वर्षांपेक्षा जास्त काळापासून एस. टी. च्या गाड्या खेडोपाडी धावत आहेत. शेतकरी एस. टी. द्वारेच भाजीपाला आणि आपला माल शहरात आणून आपली उपजिविका चालवित आहेत. खेड्यापाड्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनी शहरात येवून आपले उच्च शिक्षण पूर्ण करून नोकरी व्यवसायात आपले बस्तान बसवत आहेत. आजारी रुग्णांना व ज्येष्ठ नागरिकांना एस. टी. हेच प्रवासाचे, हक्काचे व्यासपीठ आहे. आज राज्यात ग्रामीण आणि शहरी भागातील जनतेच्या त्यागातून एस. टी. महामंडळाचा पसारा वाढला आहे. राज्यात मोक्याच्या ठिकाणी महामंडळाच्या मालकीच्या अशा प्रचंड किंमतीच्या मालमत्ता आहेत. या मालमत्तांवरच राजकीय नेत्यांची वक्रदृष्टी आहे. त्यामुळेच एस. टी. च्या खासगीकरणाचा डाव आखला जात आहे. (वार्ताहर) ..तर महामंडळ फायद्यात चालेल ४वास्तविक राज्य शासनाने महामंडळाची ३ हजार कोटी रुपयांची थकबाकी तातडीने दिल्यास हे महामंडळ पूर्वीप्रमाणे फायद्यात चालू शकेल यात शंका नाही.