शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

कृ षी विद्यापीठावर विद्यार्थ्यांचा मोर्चा

By admin | Updated: May 13, 2016 23:48 IST

राष्ट्रवादी विद्यार्थी युवक काँग्रेसचे नेतृत्व : कृ षी पदविका विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी

दापोली : राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये कृषी पदविका शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर काही जाचक अटी सरकारने लादल्या आहेत. त्या दूर कराव्या यासाठी दापोलीचे आमदार संजय कदम, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील, उपाध्यक्ष विक्रांत जाधव, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेता अजय बिरवटकर यांचे नेतृत्वाखाली दापोली कृषी विद्यापीठावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.राष्ट्रवादी विद्यार्थी युवक काँग्रेसने कृ षी विद्यापीठ प्रशासनाकडे आपल्या मागण्या मांडल्या. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत पदविका अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना नवीन नियमानुसार कोणत्याही विषयाच्या लेखी अथवा प्रॅक्टिकल पेपरमध्ये प्रत्येकी २२ गुणांसह परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट घालण्यात आलेली आहे. या अटीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती अधिक आहे.कृषी पदविका अभ्यासक्रम हा कठीण असून, लेखी व प्रॅक्टिकल या दोन्ही परीक्षांचे गुण मिळून उत्तीर्ण होणे कठीण आहे. त्यामुळे हा निर्णय अन्यायकारक आहे. कृषी पदविका अभ्यासक्रमाचा निकाल लागण्यासाठीही ४५ दिवसांचा कालावधी लागतो. तो निकाल लवकर घोषीत करावा. कृषी तंत्रनिकेतन या ३ वर्षे मुदतीच्या अभ्यासक्रमाचा निकाल १६ टक्के लागला आहे. अनेक विद्यार्थी एका व अर्ध्या गुणांनी नापास झाले आहेत. या विद्यार्थ्यांचे एका गुणांनी नुकसान झाले आहे. त्यासाठी सप्लीमेंट परीक्षा घ्यावी. जेणेकरुन विद्यार्थ्यांचे १ वर्ष वाया जाणार नाही. विद्यार्थ्यांना इबीसी स्कॉलरशिप मिळालेली नाही ती तत्काळ मिळावी, आदी मागण्या यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी केल्या.स्पर्धा परीक्षेमध्ये कृषी अभ्यासक्रमाला विशेष प्राधान्य दिले जावे, तसेच कम्पार्टमेंट पासिंग सुरु करावे, विद्यापीठातील रिक्त जागा भरण्यात याव्या, नवीन सत्रात शैक्षणिक शुल्कासाठी सवलत देऊन सुलभ हप्त्यामध्ये शुल्क भरण्याची मुभा द्यावी, अशा विविध मागण्यांसाठी दापोली कृषी विद्यापीठावर हा मोर्चा काढण्यात आला होता.विद्यापीठावर काढलेल्या मोर्चावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष जयवंत जालगांवकर, विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रकाश शिगवण, शैलेश कदम, राजेंद्र चौगुले, विजय मुंगशे, आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)धोरण चुकीचे : कामगारांना न्याय देणारकृ षी विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर सरकार अन्याय करत आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही. विद्यापीठाने आमच्या मागण्यांचा विचार न केल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल. सरकारचे शैक्षणिक धोरण चुकीचे आहे.- संग्राम कोतेपाटील,प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस .दापोली कृ षी विद्यापीठातील अनेक पदे रिक्त आहेत. कृषी विद्यापीठातील रोजंदारी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटीबद्ध असून, रोजंदारांचा विषय शासन दरबारी मांडू. पहिल्या टप्प्यातील कामगारांना कायम करुन घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. आपण वेळोवेळी आवाज उठविल्यानेच रोजंदारी मजुरांना न्याय मिळाला.-संजय कदम, आमदारआमदार उतरले...विद्यापीठावर काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये आमदार संजय कदमही सहभागी झाले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह अधिक होता.