शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

शासनाकडून धोरणाला हरताळ

By admin | Updated: February 26, 2017 23:58 IST

सहा तंत्रनिकेतन होणार बंद : प्रत्येक जिल्ह्यात शासकीय तंत्रनिकेतनचे धोरण बारगळले?

शोभना कांबळे ल्ल रत्नागिरीप्रत्येक जिल्ह्यात शासकीय तंत्रनिकेतन असावे, असा असे शासन धोरण असतानाही त्याला हरताळ फासत शासनाने रत्नागिरीसह इतर पाच जिल्ह्यातील शासकीय तंत्रनिकेतन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सामान्य मुलांचे भवितव्य घडविणाऱ्या या संस्था राहाव्यात, यासाठी या तीनही जिल्ह्यांमधील शासकीय तंत्रनिकेतनच्या माजी विद्यार्थ्यांनी लढा सुरू ठेवला आहे. प्रसंगी न्यायिक लढ्याचीही तयारी ठेवली आहे.राज्यातील जालना, लातूर, यवतमाळ, धुळे, सोलापूर आणि रत्नागिरी या सहा शासकीय तंत्रनिकेतनांचे श्रेणीवर्धन करून नवीन अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये रूपांतरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे दहावीनंतर केवळ तीन वर्षात अभियंता होऊन कमावणाऱ्या सामान्य घरातील मुलांचे मोठेच नुकसान होणार आहे. दिवसेंदिवस रत्नागिरी जिल्ह्याचा विस्तार होत असल्याने अभियांत्रिकी महाविद्यालयाची गरज आहेच, पण त्याबरोबर गरीब मुलांना दहावीनंतर तीन वर्षात आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणाऱ्या शासकीय तंत्रनिकेतनचीही तितकीच आवश्यकता आहे.प्रत्येक जिल्ह्यात एक शासकीय तंत्रनिकेतन, प्रत्येक तालुक्याला औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि प्रत्येक विभागाला शासकीय पदवी महाविद्यालय, असे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार या संस्था उभ्या करण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय तंत्रनिकेतन आहे. पण, विभागाच्या ठिकाणी पदवी महाविद्यालय नसल्याने ते सुरू होणे गरजेचे होतेच.सध्याच्या शासनाने कौशल्य विकासावर आधारित अभ्यासक्रमांची निर्मिती करण्याचे धोरण राबवत असतानाच ज्यावर हे धोरण आधारित आहे, अशी सहा ठिकाणची तंत्रनिकेतन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने कार्यवाहीही सुरू झाली आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन, याच धोरणाला फाटा देण्याचे काम सध्याच्या शासनाकडून केले जात आहे. मात्र, हा निर्णय प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक मुलांवर अन्याय करणारा आहे. सांगलीसारख्या काही जिल्ह्यांमध्ये दोन शासकीय तंत्रनिकेतन आहेत. त्याचबरोबर शासकीय अनुदानित तंत्रनिकेतनही आहेत. मात्र, शासनाने ही केवळ सहा शासकीय तंत्रनिकेतन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकीही जालना, लातूर येथे शासनाची दोन तंत्रनिकेतन आहेत. त्यापैकी प्रत्येकी एक तंत्रनिकेतन बंद होणार आहे. मात्र, रत्नागिरी, धुळे आणि सोलापूर येथे जिल्ह्यासाठी एकच शासकीय तंत्रनिकेतन असल्याने ते आता बंद झाले तर इथल्या स्थानिक मुलांच्या ७० टक्के आरक्षणाचे काय, हा मोठा प्रश्न समोर उभा राहिला आहे.या शासकीय तंत्रनिकेतनमधून सामान्य घरातील अनेक अभियंता घडले आहेत. सध्या खासगी संस्थांमधून वारेमाप शुल्क आकारले जात असल्याने या संस्था बंद झाल्या तर सामान्य घरातील मुलांचे नुकसान होणार आहे. या संस्था वाचाव्यात, यासाठी या तीनही जिल्ह्यातून माजी विद्यार्थ्यांनी सध्या आंदोलनाला सुरूवात केली आहे. हे आंदोलन अधिक तीव्र करताना न्यायालयीन लढा देण्याची तयारीदेखील विद्यार्थ्यांनी केली आहे.