शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

शासनाकडून धोरणाला हरताळ

By admin | Updated: February 26, 2017 23:58 IST

सहा तंत्रनिकेतन होणार बंद : प्रत्येक जिल्ह्यात शासकीय तंत्रनिकेतनचे धोरण बारगळले?

शोभना कांबळे ल्ल रत्नागिरीप्रत्येक जिल्ह्यात शासकीय तंत्रनिकेतन असावे, असा असे शासन धोरण असतानाही त्याला हरताळ फासत शासनाने रत्नागिरीसह इतर पाच जिल्ह्यातील शासकीय तंत्रनिकेतन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सामान्य मुलांचे भवितव्य घडविणाऱ्या या संस्था राहाव्यात, यासाठी या तीनही जिल्ह्यांमधील शासकीय तंत्रनिकेतनच्या माजी विद्यार्थ्यांनी लढा सुरू ठेवला आहे. प्रसंगी न्यायिक लढ्याचीही तयारी ठेवली आहे.राज्यातील जालना, लातूर, यवतमाळ, धुळे, सोलापूर आणि रत्नागिरी या सहा शासकीय तंत्रनिकेतनांचे श्रेणीवर्धन करून नवीन अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये रूपांतरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे दहावीनंतर केवळ तीन वर्षात अभियंता होऊन कमावणाऱ्या सामान्य घरातील मुलांचे मोठेच नुकसान होणार आहे. दिवसेंदिवस रत्नागिरी जिल्ह्याचा विस्तार होत असल्याने अभियांत्रिकी महाविद्यालयाची गरज आहेच, पण त्याबरोबर गरीब मुलांना दहावीनंतर तीन वर्षात आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणाऱ्या शासकीय तंत्रनिकेतनचीही तितकीच आवश्यकता आहे.प्रत्येक जिल्ह्यात एक शासकीय तंत्रनिकेतन, प्रत्येक तालुक्याला औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि प्रत्येक विभागाला शासकीय पदवी महाविद्यालय, असे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार या संस्था उभ्या करण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय तंत्रनिकेतन आहे. पण, विभागाच्या ठिकाणी पदवी महाविद्यालय नसल्याने ते सुरू होणे गरजेचे होतेच.सध्याच्या शासनाने कौशल्य विकासावर आधारित अभ्यासक्रमांची निर्मिती करण्याचे धोरण राबवत असतानाच ज्यावर हे धोरण आधारित आहे, अशी सहा ठिकाणची तंत्रनिकेतन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने कार्यवाहीही सुरू झाली आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन, याच धोरणाला फाटा देण्याचे काम सध्याच्या शासनाकडून केले जात आहे. मात्र, हा निर्णय प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक मुलांवर अन्याय करणारा आहे. सांगलीसारख्या काही जिल्ह्यांमध्ये दोन शासकीय तंत्रनिकेतन आहेत. त्याचबरोबर शासकीय अनुदानित तंत्रनिकेतनही आहेत. मात्र, शासनाने ही केवळ सहा शासकीय तंत्रनिकेतन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकीही जालना, लातूर येथे शासनाची दोन तंत्रनिकेतन आहेत. त्यापैकी प्रत्येकी एक तंत्रनिकेतन बंद होणार आहे. मात्र, रत्नागिरी, धुळे आणि सोलापूर येथे जिल्ह्यासाठी एकच शासकीय तंत्रनिकेतन असल्याने ते आता बंद झाले तर इथल्या स्थानिक मुलांच्या ७० टक्के आरक्षणाचे काय, हा मोठा प्रश्न समोर उभा राहिला आहे.या शासकीय तंत्रनिकेतनमधून सामान्य घरातील अनेक अभियंता घडले आहेत. सध्या खासगी संस्थांमधून वारेमाप शुल्क आकारले जात असल्याने या संस्था बंद झाल्या तर सामान्य घरातील मुलांचे नुकसान होणार आहे. या संस्था वाचाव्यात, यासाठी या तीनही जिल्ह्यातून माजी विद्यार्थ्यांनी सध्या आंदोलनाला सुरूवात केली आहे. हे आंदोलन अधिक तीव्र करताना न्यायालयीन लढा देण्याची तयारीदेखील विद्यार्थ्यांनी केली आहे.