शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

गुहागरात कडव्या संघर्षाची लढत अटळ

By admin | Updated: September 23, 2014 23:52 IST

युतीकडून विनय नातू यांच्यासमोर भास्कर जाधव यांची होणारी लढत संघर्षमय होणार हे निश्चित आहे.

संकेत गोयथळे - गुहागर -मागील विधानसभा निवडणुकीमध्ये गुहागर मतदारसंघावरुन वाद झाल्याने युती असूनही डॉ. विनय नातू व रामदास कदम एकमेकांविरोधात लढले. यात युतीच्या मतांचे विभाजन झाल्याने राष्ट्रवादीचे भास्कर जाधव विजयी झाले. युतीच्या मतांची बेरीज करता जाधव यांना मिळालेल्या मतांपेक्षा तब्बल सतरा हजारांनी अधिक होते. मागील पाच वर्षात राज्यमंत्री, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व कामगारमंत्री या माध्यमातून सातत्याने मतदारसंघाशी असलेला संपर्क लक्षात घेता भास्कर जाधव विरोधात विनय नातू अशी थेट लढत कडव्या संघर्षाची होईल, असे चित्र आहे.कै. डॉ. तात्या नातू यांच्यानंतर तब्बल चार वेळा विनय नातू यांनी आमदारकी भूषविली. मतदारसंघाच्या फेररचनेत बदल झाल्याने तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम यांचा खेड मतदारसंघ गायब झाला. या मतदारसंघातील मोठा भाग गुहागर मतदारसंघाला जोडला गेला. ही जागा शिवसेनेकडे असल्याचे अखेरच्या क्षणी जाहीर केल्याने नाराज विनय नातूंनी श्रीधर सेनेच्या माध्यमातून बॅट या निशाणीवर निवडणूक लढवली.युतीच्या मतविभाजनामुळे निवडणूक निकाल नेहमीपेक्षा अनपेक्षित होता. पहिल्यांदाच या मतदारसंघातील शिवसेना व भाजपची नक्की मते किती हे स्पष्ट झाले. ऐनवेळी येऊन प्रचार यंत्रणा राबवणाऱ्या रामदास कदम यांनी ४० हजार मते घेऊन सर्वांना अचंबित केले. कारण वर्षानुवर्षे भाजपचा आमदार असल्याने शिवसेनेला नगण्य समजून दुजाभावाची वागणूक दिली जात होती. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. विनय नातू यांना ३० हजार, तर भास्कर जाधव यांना ५३ हजार मते मिळाली.यावेळी युतीबरोबर भास्कर जाधव यांना सामोरे जाताना मागील निवडणुकीमधील युतीच्या मतांची गोळाबेरीज करताना ७० हजार होते. जाधव यांना मिळालेल्या मतांपेक्षा १७ हजारांनी जास्त आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लक्षात घेता हे मताधिक्य तुटल्याचे लक्षात येते. एकमेव गुहागर मतदारसंघातून भास्कर जाधव यांनी सुनील तटकरेंना २५०० मतांचे मताधिक्य मिळवून दिले.विधानसभा निवडणुकीनंतर पराभवाने खचलेल्या नातू यांनी राजकीय संन्यास घेतल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. रामदास कदम यांनी तर मागील पाच वर्षांत दोनवेळा घेतलेल्या सभा वगळता पुन्हा फिरकलेच नाहीत. याउलट भास्कर जाधव यांनी नगरविकास राज्यमंत्री, पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद व कामगारमंत्री म्हणून मतदारसंघाशी सातत्यपूर्वक संपर्क ठेवला. गुहागर पंचायत समिती व त्यानंतर गुहागर नगरपंचायत ताब्यात घेऊन विजयी घोडदौड काम ठेवली आहे. आक्रमक शैलीमुळे भास्कर जाधवांवर काही राष्ट्रवादीचे जुने कार्यकर्ते नाराज आहेत. याचा फायदा भाजप-सेना किती घेईल, हा प्रश्न आहे. शिवसेनेमध्येही अनंत गीते व रामदास कदम असे दोन गट आहेत. मात्र, कदम गट नातू यांना मनापासून सहकार्य करेल, याबाबत त्यांना शंका आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे जिल्ह्याचे प्रचारक असलेले नीलेश राणे यांनी भास्कर जाधवांविरोधात सरळ सरळ दंड थोपटले आहेत. काँग्रेसची मते अन्य ठिकाणी फिरवण्यात त्यांना यश येईल का? जाधव यांचे अन्य कट्टर राजकीय विरोधक रमेश कदम यांना लोकसभेला गुहागरमधून आठ हजार मते मिळाली. ही मते कदम अन्य ठिकाणी वळवतील, असेही बोलले जात आहे.यातूनच भास्कर जाधव यांनी गेल्या पाच वर्षांत विविध पदांवरून विकासकामांच्या जोरावर युतीचे मताधिक्य तोडता येईल, एवढी ताकद निर्माण करताना अंतर्गत शत्रूही मोठ्या प्रमाणात निर्माण केले आहेत. अशा स्थितीत युतीकडून विनय नातू यांच्यासमोर भास्कर जाधव यांची होणारी लढत संघर्षमय होणार हे निश्चित आहे.