शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

विकासाकडे दुर्लक्ष केल्यास संघर्ष!

By admin | Updated: December 29, 2016 21:20 IST

मोहनराव केळुसकर : कोकण विकास आघाडीमुळे अनेक योजनांना चालना

कणकवली : कोकणासाठी स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ नसल्याने कोकणचे सुमारे १० हजार कोटी रुपयांचे नुकसान पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण्यांनी केले आहे. शासनाने कोकणच्या आर्थिक विकासाला प्राधान्य देण्यासाठी अनुशेषाच्या स्वरूपात निधी उपलब्ध करून द्यावा. मात्र, शासनाने आणि कोकणच्या लोकप्रतिनिधींनी कोकणच्या आर्थिक विकासासाठी हा निधी उपलब्ध करून न दिल्यास आम्हा कोकणवासीयांना त्यासाठी संघर्ष करावा लागेल, असा इशारा कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहनराव केळुसकर यांनी दादर-मुंबई येथे दिला.आम्ही गेली ३८ वर्षे कोकणातील विविध प्रकल्पांच्या जनजागृतीसाठी संघर्ष करीत आहोत. त्यामुळेच अनेक राज्ये आणि राष्ट्रीय प्रकल्पांना चालना मिळाली, असेही केळुसकर यांनी नमूद केले. कोकण विकास आघाडीचे ३७ वे अधिवेशन दादर-शिवाजी पार्क येथील हरी महादेव वैद्य सभागृहात पार पडले. त्यावेळी केळुसकर हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. विक्रोळी येथील ओम विद्यासंस्कार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकर नार्वेकर हे स्वागताध्यक्ष होते. यावेळी बळिराम परब, सरचिटणीस सूर्यकांत पावसकर, रमाकांत जाधव, मनोहर डोंगरे, चंद्रकांत आंब्रे, मुंबईचे माजी नगरसेवक विजयकुमार दळवी, आदी उपस्थित होते.यावेळी झालेल्या चर्चेमध्ये नारायण पाटील, मुकुंद वाजे, शांताराम राणे, रमेश आग्रे, गोकुळ जाधव, सुरेंद्र नेमळेकर, गणपत चव्हाण, विलास गांगण, प्रा. सूर्यकांत आजगावकर, रघुनाथ जाधव, एकनाथ राणे, नरेंद्र म्हात्रे, डॉ. मंगेश देशमुख, डॉ. संजय देशमुख, महेश वैद्य, राजेंद्र केळुसकर, विनायक मालोंडकर, आदींनी सहभाग घेतला. स्मरणिकेचे प्रकाशन मोहन केळुसकर, मधुकर नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले. सूर्यकांत पावसकर यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)९ ठराव मंजूर : शासनास सादर करणारकोकण विकास आघाडीच्या १९७८ च्या स्थापनेपासून आम्ही कोकणच्या विकासाच्या प्रश्नी सातत्याने जनजागृतीसह संघर्ष करीत आहोत. त्यामुळेच गावपातळीवरील वीज, शिक्षण, आरोग्य, रस्ते, एसटी वाहतूक, आदी मूलभूत विकासकामांना चालना मिळाली, असे स्पष्ट करून केळुसकर म्हणाले की, कोकण रेल्वे, मुंबई-कोकण-गोवा, पश्चिम किनारी सागरी महामार्ग बोट वाहतूक, पाटबंधारे प्रकल्प, पर्यटन विकास, फलोद्यान, आदींना चालना मिळाली. मात्र, या प्रकल्पांना तातडीने गती मिळणे आवश्यक आहे. तसेच केरळ राज्याच्या धर्तीवर कोकणातील आंबा, काजू, कोकम, नारळ, आदी फळपिकांसह माशांनाही हमीभाव मिळायला हवा. यावेळी कोकणच्या विकासाच्या अनुषंगाने शासनास सादर करण्यासाठी एकूण ९ ठराव मंजूर करण्यात आले.कोकणचे खासदार, आमदारांसह अन्य लोकप्रतिनिधी विकासासाठी संघटितरित्या प्रयत्न करताना दिसत नाहीत. यापूर्वी काँग्रेस आघाडीचे शासनकर्ते होते, तर आता भाजप-शिवसेना युतीचे शासनकर्ते आहेत. मात्र, त्यांच्याही मनोवृत्तीत आणि कामकाजामध्ये बदल झाल्याचे दिसून येत नाही.-मोहनराव केळुसकरकोकण विकास आघाडी अध्यक्ष