शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
2
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
3
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
4
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
5
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
6
'नमस्कार फ्रॉम स्पेस; तुम्हीही या प्रवासाचा आनंद घ्या', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video
7
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
8
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
9
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
10
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
11
मित्रांसोबत इकडं जा... तिकडं जा खेळ रंगला अन् सराव कमी पडला! पृथ्वी शॉला चूक कळली, आता...
12
Video: धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
13
Viral Video: धापा टाकत रुग्णालयात पोहोचला, डॉक्टरांनी विचारताच उघडली बॅग, पाहून अनेकांची बोलती बंद!
14
"कॉम्प्रोमाइज कर तुला रोल देतो", टीव्ही अभिनेत्याला दिग्दर्शकाने दिलेली ऑफर, केला धक्कादायक खुलासा
15
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
16
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
17
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
18
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
19
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
20
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा

विकासाकडे दुर्लक्ष केल्यास संघर्ष!

By admin | Updated: December 29, 2016 21:20 IST

मोहनराव केळुसकर : कोकण विकास आघाडीमुळे अनेक योजनांना चालना

कणकवली : कोकणासाठी स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ नसल्याने कोकणचे सुमारे १० हजार कोटी रुपयांचे नुकसान पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण्यांनी केले आहे. शासनाने कोकणच्या आर्थिक विकासाला प्राधान्य देण्यासाठी अनुशेषाच्या स्वरूपात निधी उपलब्ध करून द्यावा. मात्र, शासनाने आणि कोकणच्या लोकप्रतिनिधींनी कोकणच्या आर्थिक विकासासाठी हा निधी उपलब्ध करून न दिल्यास आम्हा कोकणवासीयांना त्यासाठी संघर्ष करावा लागेल, असा इशारा कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहनराव केळुसकर यांनी दादर-मुंबई येथे दिला.आम्ही गेली ३८ वर्षे कोकणातील विविध प्रकल्पांच्या जनजागृतीसाठी संघर्ष करीत आहोत. त्यामुळेच अनेक राज्ये आणि राष्ट्रीय प्रकल्पांना चालना मिळाली, असेही केळुसकर यांनी नमूद केले. कोकण विकास आघाडीचे ३७ वे अधिवेशन दादर-शिवाजी पार्क येथील हरी महादेव वैद्य सभागृहात पार पडले. त्यावेळी केळुसकर हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. विक्रोळी येथील ओम विद्यासंस्कार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकर नार्वेकर हे स्वागताध्यक्ष होते. यावेळी बळिराम परब, सरचिटणीस सूर्यकांत पावसकर, रमाकांत जाधव, मनोहर डोंगरे, चंद्रकांत आंब्रे, मुंबईचे माजी नगरसेवक विजयकुमार दळवी, आदी उपस्थित होते.यावेळी झालेल्या चर्चेमध्ये नारायण पाटील, मुकुंद वाजे, शांताराम राणे, रमेश आग्रे, गोकुळ जाधव, सुरेंद्र नेमळेकर, गणपत चव्हाण, विलास गांगण, प्रा. सूर्यकांत आजगावकर, रघुनाथ जाधव, एकनाथ राणे, नरेंद्र म्हात्रे, डॉ. मंगेश देशमुख, डॉ. संजय देशमुख, महेश वैद्य, राजेंद्र केळुसकर, विनायक मालोंडकर, आदींनी सहभाग घेतला. स्मरणिकेचे प्रकाशन मोहन केळुसकर, मधुकर नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले. सूर्यकांत पावसकर यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)९ ठराव मंजूर : शासनास सादर करणारकोकण विकास आघाडीच्या १९७८ च्या स्थापनेपासून आम्ही कोकणच्या विकासाच्या प्रश्नी सातत्याने जनजागृतीसह संघर्ष करीत आहोत. त्यामुळेच गावपातळीवरील वीज, शिक्षण, आरोग्य, रस्ते, एसटी वाहतूक, आदी मूलभूत विकासकामांना चालना मिळाली, असे स्पष्ट करून केळुसकर म्हणाले की, कोकण रेल्वे, मुंबई-कोकण-गोवा, पश्चिम किनारी सागरी महामार्ग बोट वाहतूक, पाटबंधारे प्रकल्प, पर्यटन विकास, फलोद्यान, आदींना चालना मिळाली. मात्र, या प्रकल्पांना तातडीने गती मिळणे आवश्यक आहे. तसेच केरळ राज्याच्या धर्तीवर कोकणातील आंबा, काजू, कोकम, नारळ, आदी फळपिकांसह माशांनाही हमीभाव मिळायला हवा. यावेळी कोकणच्या विकासाच्या अनुषंगाने शासनास सादर करण्यासाठी एकूण ९ ठराव मंजूर करण्यात आले.कोकणचे खासदार, आमदारांसह अन्य लोकप्रतिनिधी विकासासाठी संघटितरित्या प्रयत्न करताना दिसत नाहीत. यापूर्वी काँग्रेस आघाडीचे शासनकर्ते होते, तर आता भाजप-शिवसेना युतीचे शासनकर्ते आहेत. मात्र, त्यांच्याही मनोवृत्तीत आणि कामकाजामध्ये बदल झाल्याचे दिसून येत नाही.-मोहनराव केळुसकरकोकण विकास आघाडी अध्यक्ष