शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

अग्निशमन दलास आधुनिक यंत्रणेचे बळ

By admin | Updated: June 12, 2016 23:32 IST

आपत्तीशी लढण्यास सज्ज : पालिकेच्या सहाही विभागांना पावसाळ्यात सतर्क राहण्याच्या दिल्या सूचना

अझहर शेख  नाशिकपूर, भूकंप, इमारत, घर, वाडे कोसळणे, झाडे उन्मळून पडणे, शॉर्टसर्किट व अपघातांचे प्रमाण वाढणे अशा एक ना अनेक आपत्तींची भीती पावसाळ्यात अधिक वाढते. त्यामुळे पावसाळापूर्व कामांचा कृती आराखडा अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभागाने तयार केला असून, पालिकेच्या सहाही विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींशी दोन हात करण्यासाठी अग्निशमन विभागाचे अपुरे मनुष्यबळ अत्याधुनिक यंत्रणेच्या आधारावर सज्ज झाले आहे. ‘अग्निशमन’च्या ताफ्यात सिंहस्थ कुंभमेळ्यानंतर आलेला अत्याधुनिक ‘हॅजमॅट रेस्क्यू बंब’ हा अग्निशमन दलासाठी मोठा आधार आहे. शहर व परिसरातून गोदावरी, दारणा व नंदिनी (नासर्डी) या मुख्य नद्या वाहतात. पावसाळ्यात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होते. म्हणून नद्यांच्या पात्रात पाण्याचा विसर्ग केला जातो. त्यामुळे नद्यांचा जलस्तर वाढतो आणि पूरपरिस्थिती निर्माण होते. या पूरपरिस्थितीशी सामना करण्यासाठी महापालिकेचे अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाले आहे. महापालिकेच्या पूर्व, पंचवटी, पश्चिम, सातपूर, सिडको, नाशिकरोड अशा सहाही विभागांना पावसाळापूर्व उपाययोजना व कृती आराखडा अग्निशमन विभागाने पाठविला आहे. आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या आदेशान्वये अतिरिक्त आयुक्तांपासून तर थेट सर्वच विभागांच्या खातेनिहाय कामांचे वाटप करण्यात आले आहे. यानुसार महापालिकेच्या सहाही विभागांच्या विभागीय अधिकाऱ्यांनी भूयारी गटार, सार्वजनिक बांधकाम, अतिक्रमण निर्मूलन, उद्यान आदि विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामे निश्चित के ली आहेत. एकूणच आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन तयार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान अग्निशमन विभाग विविध यंत्रसामुग्रीने सज्ज झाला आहे. सिंहस्थाच्या निमित्ताने अग्निशमन दलाकडे अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध झाली आहे. संपूर्ण शहरात मुख्यालयासह उपकार्यालयांचे मिळून सात अधिकारी, ९८ फायरमन, लिडिंग फायरमन, २७ वाहनचालक असे मनुष्यबळ आहे. पाण्याच्या बंबांच्या संख्येनुसार वाहनचालकांची संख्याही कमी आहे. १९९९ सालापासून अग्निशमन विभागात वाहनचालक किंवा फायरमन पदासाठी भरती झाली नसल्यामुळे सध्या अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन जरी यंत्रसामुग्रीने सुसज्ज असले तरी मनुष्यबळाने अपुरे आहे.