शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

सिंधु महोत्सवाची उधळपट्टी थांबवा

By admin | Updated: December 23, 2014 23:42 IST

मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : ‘तो’ निधी शेतकऱ्यांना द्या

सिंधुदुर्गनगरी : प्रशासनामार्फत मालवण येथे जानेवारी महिन्यात सिंधु महोत्सव आयोजित करण्यात आला असून यासाठी १ कोटी रूपये खर्च होणार आहे. ही कोटीची होणारी उधळपट्टी थांबवावी व हा निधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना द्यावा, अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांच्याकडे भेटीदरम्यान केली.निवेदनात म्हटले आहे की, प्रशासनामार्फत मालवण येथे सिंधु महोत्सव होत असून त्यासाठी एक कोटी रूपये खर्च येण्याची शक्यता आहे. या निधीची उधळपट्टी करण्यापेक्षा तो शेतकऱ्यांच्या मदतीला द्या, अशी मागणी यावेळी केली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बागायती व शेतीचे हत्तीने नुकसान केली. या नुकसानीतून मिळणारी अल्प मदतही शेतकऱ्यांना मिळालेली नसून त्याचा सुमारे ३५ लाखाचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील शेतकरी या नुकसानीमुळे हवालदिल झालेले आहेत. तसेच विदर्भ, मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस व वेगवेगळ््या हवामानाच्या कारणाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन सुमारे ५ हजारपेक्षा जास्त गावे शासनास दुष्काळग्रस्त घोषित करीत असताना सुमारे ७०० हून अधिक आत्महत्याही विदर्भ, मराठवाड्यात झाल्याच्या नोंदी आहेत. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील नागरिकांनी महोत्सव साजरे करून परजिल्ह्यातून येणारे मंडप, लाईट, साऊंड यांचे ठेकेदार तसेच वेगवेगळ््या क्षेत्रातील कलाकारांच्या नाचगाण्यांवर पैशाची उधळपट्टी करणे उचित वाटत नाही. कोट्यवधी निधीचा वापर शेतकऱ्यांना मदत स्वरूपात करावा, अशी मागणी केली आहे. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष नारायण कुबल, तात्या पवार, समीर आचरेकर, शैलेश वेरकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)