शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

सिंधु महोत्सवाची उधळपट्टी थांबवा

By admin | Updated: December 23, 2014 23:42 IST

मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : ‘तो’ निधी शेतकऱ्यांना द्या

सिंधुदुर्गनगरी : प्रशासनामार्फत मालवण येथे जानेवारी महिन्यात सिंधु महोत्सव आयोजित करण्यात आला असून यासाठी १ कोटी रूपये खर्च होणार आहे. ही कोटीची होणारी उधळपट्टी थांबवावी व हा निधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना द्यावा, अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांच्याकडे भेटीदरम्यान केली.निवेदनात म्हटले आहे की, प्रशासनामार्फत मालवण येथे सिंधु महोत्सव होत असून त्यासाठी एक कोटी रूपये खर्च येण्याची शक्यता आहे. या निधीची उधळपट्टी करण्यापेक्षा तो शेतकऱ्यांच्या मदतीला द्या, अशी मागणी यावेळी केली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बागायती व शेतीचे हत्तीने नुकसान केली. या नुकसानीतून मिळणारी अल्प मदतही शेतकऱ्यांना मिळालेली नसून त्याचा सुमारे ३५ लाखाचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील शेतकरी या नुकसानीमुळे हवालदिल झालेले आहेत. तसेच विदर्भ, मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस व वेगवेगळ््या हवामानाच्या कारणाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन सुमारे ५ हजारपेक्षा जास्त गावे शासनास दुष्काळग्रस्त घोषित करीत असताना सुमारे ७०० हून अधिक आत्महत्याही विदर्भ, मराठवाड्यात झाल्याच्या नोंदी आहेत. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील नागरिकांनी महोत्सव साजरे करून परजिल्ह्यातून येणारे मंडप, लाईट, साऊंड यांचे ठेकेदार तसेच वेगवेगळ््या क्षेत्रातील कलाकारांच्या नाचगाण्यांवर पैशाची उधळपट्टी करणे उचित वाटत नाही. कोट्यवधी निधीचा वापर शेतकऱ्यांना मदत स्वरूपात करावा, अशी मागणी केली आहे. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष नारायण कुबल, तात्या पवार, समीर आचरेकर, शैलेश वेरकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)