शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कोकण राज्यासाठी २९ नोव्हेंबरला रास्ता रोको

By admin | Updated: October 27, 2016 23:27 IST

महामार्गावर उतरणार कोकणी जनता : लाखोंच्या संख्येने सहभागाचे नाटेकर यांचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी : स्वतंत्र कोकण राज्य निर्मितीसाठी मुंबई-गोवा महामार्गावरील मुंबई ते गोवा या महामार्गावर २७ नोव्हेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार आहे. यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई या सहा जिल्ह्यातील कोकणी नागरिकांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती संघटना अध्यक्ष महेंद्र नाटेकर यांनी केले आहे. आर्थिक मागास असलेल्या कोकणात पूर्वी शासकीय, निमशासकीय ८० टक्के नोकऱ्या स्थानिकांना दिल्या जात होत्या. परंतु आता कोकण शैक्षणिक, औद्योगिक, शेती, बागायती आदींमध्ये मागास असूनही ९० टक्के घाटमाथ्यावरील बेरोजगारांना नोकऱ्या दिल्या जातात. १०० टक्के अधिकारीवर्ग घाटमाथ्यावरचाच आहे. लाखो रुपयांनी नोकऱ्यांची खरेदी-विक्री होते. त्यामुळे कोकणी तरुण देशोधडीला लागला आहे. नोकरी मिळेल तिकडे तो पळतो. परिणामी आईवडील, आजी-आजोबा निराधार होतात. हजारोंनी एकर जमीन ओस पडत आहे. ९० टक्के नोकऱ्या व १०० टक्के अधिकारीवर्ग घाटमाथ्यावरचा असल्याने कोकणावर अन्याय होत आहे. त्यामुळेच स्वतंत्र कोकण निर्मितीसाठी स्वतंत्र कोकण राज्यनिर्मिती संघटनेने ‘रास्ता रोको’चा पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्र शासनाने रिझर्व्ह बँक, जागतिक बँक, नाबार्डकडून तीन लाख ४० हजार कोटींचे कर्ज घेतले आहे. हे सर्व कर्ज त्यांनी कोकण वगळता अन्य महाराष्ट्रावर खर्च केले. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक माणसावर ३६ हजार रुपयांचे कर्ज आहे. ते विविध वस्तूंच्या माध्यमातून कर लावून वसूल केले जात आहे. परंतु हा खर्च कोकणावर न करताच कोकणातील माणसाकडून वसूल केला जात आहे. ज्यावेळी राज्य शासन अन्याय करते तेव्हा राज्य शासनाविरुद्ध दंड थोपटून केंद्रशासनाने वेगळी मागणी करणे अपरिहार्य ठरते. महामार्ग चौपदरीकरण, उद्योगधंदे, पर्यटन विकास, रेल्वे किनारपट्टीवरून गेली. सर्व प्रकारच्या शिक्षण संस्था आल्या तरी यामध्ये अन्य राज्यातील लोकांना नोकरी मिळाली तर कोकणला उपयोग काय? असा प्रश्न करीत प्रा. नाटेकर यांनी केला. (प्रतिनिधी)