शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

सुरक्षेची हमी मिळेपर्यंत उत्पादन बंद

By admin | Updated: December 8, 2015 00:33 IST

सौरभ अरोरा : दीपक केमटेक्सप्रकरणी कामगारांचे भवितव्य अधांतरी

आवाशी : खेड तालुक्यातील लोटे - परशुराम औद्योगिक वसाहतीलगत आवाशी ग्रामपंचायत हद्दीतील दीपक केमटेक्स प्रा. लि. ही रंग उत्पादक कंपनी गेले दोन आठवडे बंद आहे. सोमवारी कंपनीचे मालक सौरभ अरोरा यांनी जोपर्यंत माझ्या कामगार व व्यवस्थापनाला सुरक्षेची हमी मिळत नाही, तोपर्यंत उत्पादन सुरु करणार नसल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.मागील २० वर्षापासून लोटे औद्योगिक वसाहतीत मात्र आवाशी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणारी दीपक केमटेक्स प्रा. लि. ही कंपनी रंग उत्पादनाचे काम करत आहे. एकूण चाळीस कामगार असणाऱ्या या कंपनीत दहा महिन्यांपूर्वी रुजू झालेले व्यवस्थापक जे. ए. महाडिक यांच्यामुळे कामगारांमध्ये भेदभाव निर्माण झाले आहेत.नेमकी येथेच ठिणगी पडली आणि धीरेधीरे कामगारांमध्ये फूट निर्माण झाली. मागील आठ वर्षापासून येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मान्यताप्राप्त युनियन कार्यरत आहे. या युनियनमधील सभासद असणाऱ्या तीन कामगारांना व्यवस्थापनाने तडकाफडकी कामावर येण्यास मज्जाव केला. याची दखल घेत मनसेच्यावतीने आलेले वैभव खेडेकर, राजेंद्र घाग, नाना चाळके व अन्य यांची व्यवस्थापक महाडिक यांच्याशी शाब्दीक बाचाबाची होऊन त्याचे पडसाद मारहाणीत उमटले. या घटनेच्या सहा दिवसानंतर महाडिक यांनी याबाबतची तक्रार लोटे पोलिसात दिली. मात्र, मारहाण झाली त्याचदिवशी रात्री महाडिक यांनी दहा हजार किलो माल रातोरात बाहेर काढून वीजपुरवठा बंद केला व ते उपचारासाठी निघून गेले. तेव्हापासून विविध चर्चांना पेव फुटले आहे. याबाबत कंपनी प्रशासनाचीही नेमकी भूमिका स्पष्ट होत नव्हती.यावर तोडगा निघावा म्हणून याच पंचक्रोशीत असणारे सर्व कामगार आवाशी ग्रामपंचायतीकडे कैफीयत मांडण्यासाठी गेले. ग्रामपंचायतीने त्यांना धीर देत मालक व व्यवस्थापकांना बोलावून काहीतरी योग्य तोडगा काढू, असे आश्वासन दिले. मात्र, आजपर्यंत कंपनी पूर्ववत सुरु झालेली नाही.या साऱ्या घडामोडींमध्ये कामगारांवर मात्र उपासमारीची वेळ आली आहे. आता या सर्व प्रकरणाला जबाबदार कोण? याचे उत्तर शोधणे गरजेचे असून, असे प्रकार वारंवार घडल्यास आधीच मंदीच्या गर्तेत असणारी औद्योगिक वसाहत आणखीनच अडचणीत येणार असल्याचे उद्योजकांकडून बोलले जात आहे. (वार्ताहर)आता आम्ही मनसेच्या संबंधित पदाधिकाऱ्यांना खेड येथे भेटण्यासाठी चाललो आहोत. त्यांच्याकडून वा कुठल्याही राजकीय पक्षाकडून आम्हाला सुरक्षेची हमी मिळाल्याखेरीज मी उत्पादन सुरु करणार नाही. मी कंपनी बंद केलेली नसून केवळ उत्पादन बंद केले आहे. माझे कामगार आत्ताही कंपनीत कामावर आहेत. जे येत नाहीत तो त्यांचा प्रश्न आहे. त्याचबरोबर आमची एमपीसीबीची कन्सेंट आॅक्टोबरमध्ये संपलेली असून, आम्ही लगेच त्यासाठी अर्ज केला आहे. त्याची रक्कमही भरणा केली आहे. लवकरच आम्हाला ते उपलब्ध होईल.- सौरभ अरोरा, कंपनी मालककामगार कायद्यान्वये शंभरावरील असणाऱ्या कामगार संख्येच्या कंपनी व्यवस्थापनाला कंपनी बंद करताना आमच्यासह सर्वच विभागांना लेखी कळविणे बंधनकारक असते. मात्र, दीपक केमटेक्सचे वृत्त वर्तमानपत्रात वाचल्यानंतर मी, मालक व व्यवस्थापक यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून तुमची जी काही अडचण आहे ती आमच्या कार्यालयाला तत्काळ लेखी स्वरुपात द्या. मात्र, आजपर्यंत त्याला कसलाही प्रतिसाद मिळालेला नाही. येत्या दोन दिवसात मी स्वत: प्रत्यक्ष भेट देऊन समस्या जाणून घेणार आहे.- अनिल दत्तात्रय गुरव,सहाय्यक कामगार आयुक्त, रत्नागिरीआता आम्ही मनसेच्या संबंधित पदाधिकाऱ्यांना खेड येथे भेटण्यासाठी चाललो आहोत. त्यांच्याकडून वा कुठल्याही राजकीय पक्षाकडून आम्हाला सुरक्षेची हमी मिळाल्याखेरीज मी उत्पादन सुरु करणार नाही. मी कंपनी बंद केलेली नसून केवळ उत्पादन बंद केले आहे. माझे कामगार आत्ताही कंपनीत कामावर आहेत. जे येत नाहीत तो त्यांचा प्रश्न आहे. त्याचबरोबर आमची एमपीसीबीची कन्सेंट आॅक्टोबरमध्ये संपलेली असून, आम्ही लगेच त्यासाठी अर्ज केला आहे. त्याची रक्कमही भरणा केली आहे. लवकरच आम्हाला ते उपलब्ध होईल.- सौरभ अरोरा, कंपनी मालकअशी प्रकरणेआमचे अखत्यारित येत नाहीत. परंतु, यातून काही अनर्थ घडू नये म्हणून त्यांनी आम्हाला कळविणे जरुरीचे आहे. त्याचबरोबर कंपनीचे सांडपाणी हे एमआयडीसीच्या पाईपलाईनद्वारे सीईटीपीला जाणे आवश्यक असून, खरेतर एमआयडीसीने त्याची दखल घ्यायला हवी. नाहीतर इतरही दीपक कंपनीसारखेच ईटीपीचे कनेक्शन बंद करुन टँकरने सीईटीपीत अथवा कुठेही घाण टाकतील. त्याचबरोबर त्यांच्या कन्सेंटचीही मुदत संपली असून, लवकरच कार्यवाही केली जाईल.- डी. ए. मोरे,प्रभारी उपप्रादेशिक अधिकारी