शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘जिहे-कठापूर’च्या पाण्यासाठी खटाव ग्रामस्थांचा रास्ता रोको

By admin | Updated: July 21, 2014 23:20 IST

जनतेपर्यंत अद्याप पोहोचले नाही

खटाव : ‘जिहे-कठापूर’चे पाणी खटाव तालुक्यातील जनतेपर्यंत अद्याप पोहोचले नाही. गेल्या कित्येक पंचवार्षिक निवडणुका या पाणी प्रश्नावर लढविल्या गेल्या; परंतु आतापर्यंत काहीच नाही. त्याची स्थिती ‘ये रे माझ्या मागल्या’ अशीच असून, या गोष्टीचा जाहीर निषेध करण्यासाठी खटावमधील ग्रामस्थांनी रविवारी येथील शहाजीराजे महाविलयाजवळ रस्ता रोको आंदोलन केले. पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी १४ जून रोजी जिहे-क ठापूरचे पाणी नेर तलावात आणणार, अशी घोषणा केली होती, ती केवळ हवेतच गेली असल्यामुळे आतापर्यंत केवळ दिशाभूल करून निवडणुकीत मतांचा जोगवा मागणाऱ्या नेते मंडळींनी केवळ निवडणूक जवळ आली की खटाव माणच्या दुष्काळी जनतेच्या पाणी प्रश्नावर मोठी आश्वासने देऊन आतापर्यंत ही निवडणूक लढवून येथील जनतेची दिशाभूल करण्याचे काम केले आहे. आतापर्यंत कोणतेच ठोस असे काम उभे न केल्यामुळे कायम दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या येथील जनतेने आता भूलथापांना बळी न पडता पाणीप्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष करण्याचा निर्धार केला असून, त्याची सुरुवात आता पासूनच या रस्ता रोकोच्या माध्यमातून करण्यात आली आहे. जो पर्यंत आमच्या तालुक्याला हक्काचे पाणी मिळणार नाही, तोपर्यंत विविध मार्गांतून शांततेने आम्ही शेतकरीबांधव आंदोलन करणार असल्याचे यावेळी माजी पंचायत समिती सदस्य मधुकर पाटोळे यांनी सांगितले. इथून पुढे ‘आधी काम मगच मतदान,’ अशी भूमिका सर्वसामान्य जनतेची असेल, असाही इशारा याप्रसंगी राजेंद्र करळे यांनी दिला. खटावचे तहसीलदार विवेक साळुंखे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी तलाठी एच. जी. उराडे उपस्थित होते. पुसेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनात शेतकरी तसेच ग्रामस्थांचे वतीने मनोज देशमुख, दीपक विधाते, अशोक कुदळे, सनी पाटोळे, जगन्नाथ जगदाळे, मधुकर पाटोळे, डॉ. विजय भराडे, मोहन घाडगे आदींनी निवेदन दिले.यावेळी किसन मोरे,बंडा बागल, अण्णा शिंदे, रमेश शिंदे, लक्ष्मण कोकाटे ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित हाते. (वार्ताहर)