शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या तस्करीप्रकरणी तपास थांबवला

By admin | Updated: November 14, 2014 23:07 IST

त्याची १८ नखे गायब झाली होती. ८ दिवसांनंतर त्यापैकी १५ नखे त्याच जंगलात आढळून आली होती.

श्रीकांत चाळके-खेड --खेड तालुक्यातील कोतवली-सोनगाव येथील जंगलमय भागात गतवर्षी मृत झालेला बिबट्या आढळून आला. त्याची १८ नखे गायब झाली होती. ८ दिवसांनंतर त्यापैकी १५ नखे त्याच जंगलात आढळून आली होती. त्यामुळे येथील जंगलात या नखांची तस्करी होत असल्याचे समोर आले़ मात्र, ३ नखांचा पत्ता लागला नाही़ तीन महिने उलटून गेल्यानंतरही या तस्करीप्रकरणी तपास करण्यात वनविभागाला अपयश आले. त्यामुळे वनअधिकारी सुतार यांनी आपला अहवाल गुरूवारी वन विभागाला सादर केला असून, तसे खेड पोलिसांनाही पत्र दिल्याची माहिती सुतार यांनी दिली.खेड तालुक्यातील कोतवली -सोनगाव ही जंगलमय भागाशेजारी असलेली गावे. मात्र, येथील जंगलात बिबट्याची शिकार झालेली तशी ऐकीवात नाही़ शिवाय येथील जंगलात बिबट्याच्या अस्तित्त्वाबाबत विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत़ तरीही गतवर्षी आॅक्टोबर महिन्यात बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याने या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबट्याची सर्व १८ नखे कापून घेण्यात आली होती. यावरून बिबट्याच्या नखांची तस्करी करणाऱ्या टोळीचा यामध्ये हात असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी येथील वन अधिकारी वारंवार या जंगलात फिरत होते. मात्र, आठ दिवसांनंतर त्याच ठिकाणी वनअधिकाऱ्यांना १५ नखे आढळून आली होती, तर ३ नखांचा तपास करता करता वनअधिकाऱ्यांच्या नाकीनऊ आले. तीन महिन्यांच्या आत हा तपास करणे आवश्यक होते. मात्र, यामध्ये वन अधिकाऱ्यांना अपयश आल्याने तसा अहवाल त्यांनी गुरूवारी वरिष्ठांना सादर केला. खेड पोलिसांकडे पुढील तपासाच्या चाव्या सुपूर्द केल्याचे सांगण्यात आले आहे़ खेड तालुक्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वडगाव, कळंबणी, विहाळी, चकदेव आणि कांदोशी येथील जंगलात अद्याप बिबट्याचा संचार असल्याच्या शक्यतेला वन अधिकाऱ्यांकडून पुष्टी मिळाली आहे. मात्र, तेथील जंगलात वाघाची शिकार झालेली आठवत नाही़ यामुळे कोतवली - सोनगाव येथील घनदाट जंगलात मृतावस्थेत आढळलेल्या बिबट्याविषयी खुद्द वन अधिकाऱ्यांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. चार वर्षांपूर्वी खेड बसस्थानकावर बिबट्याचे चामडे बाळगलेल्या दोघांना पोलिसांनी रंगेहात पकडले होते. याप्रकरणी संबंधितांची चौकशी केली असता कोल्हापूर येथून हे चामडे आणल्याची माहिती त्यांनी दिली होती. यामुळे वन अधिकारी गोंधळून गेले आहेत. आता या प्रकरणाच्या मुळापर्यंत तपास करणे आवश्यक आहे. शासकीय नियमानुसार तीन महिन्यामध्ये (९० दिवसांमध्ये) अशा घटनांचा तपास न लागल्यास हा तपास बंद करावा लागतो. यापुढील तपास आता खेड पोलिसांनी करावा, अशी विनंती वन अधिकाऱ्यांनी पत्राद्वारे केल्याचे सुतार यांनी सांगितले़