शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

नर्सिंग नोकरभरतीबाबत राज्य शासनाचा दुजाभाव

By admin | Updated: October 9, 2015 23:32 IST

आडमुठे धोरण : खासगी स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी, मात्र शासकीय स्कूलच्या विद्यार्थ्यांची सरळ भरती

कुडाळ : महाराष्ट्र राज्यात खासगी नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी ५० मार्कांची सी. ई. टी. व ५० मार्कांची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याचा निर्णय तसेच शासकीय नर्सिंग स्कूलमधून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सरळ भरती प्रक्रिया असा निर्णय घेतला जातो. हा खासगी नर्सिंग स्कूलच्या विद्यार्र्थिनींवर अन्याय असून या निर्णयाच्या विरोधात वेळ पडल्यास दाद मागण्यासाठी व शासनाच्या आडमुठ्या धोरणाविरुद्ध आवाज उठवू, असा इशारा बॅ. नाथ पै शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिला. महाराष्ट्रातील सर्व खासगी व शासकीय नर्सिंग स्कूल महाराष्ट्र परिचर्या परिषदेच्या मान्यतेने सुरू आहेत. खासगी व शासकीय नर्सिंग स्कूलचे प्रवेश, विद्यार्थ्यांच्या परीक्षा व निकाल, त्या त्या पदविकांचे अभ्यासक्रम महाराष्ट्र परिचर्या परिषद घेतात. खासगी व शासकीय दोन्ही नर्सिंग स्कूलमधून शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थिनींना पदविका प्रमाणपत्र व त्यांची नोंदणी महाराष्ट्र परिचर्या परिषद करते व ते भारतीय परिचर्या परिषदेच्या निकषानुसारच असते. मग जर एकाच परिषदेचे खासगी व शासकीय नर्सिंग स्कूलवर नियंत्रण असेल तर शासकीय दर्जा बरा आणि खासगीचा संशयास्पद कसा असू शकतो. ज्या खासगी नर्सिंग स्कूलमध्ये शिक्षणासाठी आवश्यक सुविधा नसतील तर त्यांना कारणे दाखवा नोटीसद्वारे विचारणा करावी व त्या स्कूलचा दर्जा वाढविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणे अपेक्षित आहे. सन २०१३ मध्ये महाराष्ट्र राज्याचे नर्सिंग आणि पॅरॅमेडिकल बोर्ड बनविण्यासाठी निर्माण केलेला कायदा व महाराष्ट्र परिचर्या परिषदेने त्या विरोधात घेतलेला न्यायालयातील पवित्रा यामुळे सरकारची झालेली गळचेपी यातून ‘वड्याचे तेल वांग्याला’ याप्रमाणे परिचर्या परिषदेने दिलेल्या मान्यता हा मूळ मुद्दा पण विद्यार्थ्यांवर अन्याय व त्यांचा शैक्षणिक गुणवत्तेवर संशय घेणे अयोग्य आहे. वेळ पडल्यास दाद मागण्यासाठी व शासनाच्या आडमुठ्या धोरणाविरुद्ध आवाज उठवू, असा इशारा प्रसिद्धीपत्रकातून गाळवणकर यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)जनहित याचिका दाखल करणार : गाळवणकरजर ५० मार्कांची सी. ई. टी. व ५० मार्कांची प्रात्यक्षिक घ्यावयाची असेल तर खासगी नर्सिंग स्कूलमध्ये शिकणारा व शासकीय नर्सिंग स्कूलमधून शिकणारा असा भेदभाव न करता आरएएनएम व आरजीएनएम अभ्यासक्रम पूर्ण करणारी कोणतीही व्यक्ती असू दे त्यांनी ती अट सक्तीची करावी. म्हणजे आपल्या राज्यात समान न्याय, समान हक्क व समता असून आमचा महाराष्ट्र शिक्षणात दुजाभाव करत नाही, असे म्हणता येईल, अन्यथा आम्ही विद्यार्थ्यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करू. तसेच तपासण्या करण्यासाठी पथक पाठवू.