शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

नर्सिंग नोकरभरतीबाबत राज्य शासनाचा दुजाभाव

By admin | Updated: October 9, 2015 23:32 IST

आडमुठे धोरण : खासगी स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी, मात्र शासकीय स्कूलच्या विद्यार्थ्यांची सरळ भरती

कुडाळ : महाराष्ट्र राज्यात खासगी नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी ५० मार्कांची सी. ई. टी. व ५० मार्कांची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याचा निर्णय तसेच शासकीय नर्सिंग स्कूलमधून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सरळ भरती प्रक्रिया असा निर्णय घेतला जातो. हा खासगी नर्सिंग स्कूलच्या विद्यार्र्थिनींवर अन्याय असून या निर्णयाच्या विरोधात वेळ पडल्यास दाद मागण्यासाठी व शासनाच्या आडमुठ्या धोरणाविरुद्ध आवाज उठवू, असा इशारा बॅ. नाथ पै शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिला. महाराष्ट्रातील सर्व खासगी व शासकीय नर्सिंग स्कूल महाराष्ट्र परिचर्या परिषदेच्या मान्यतेने सुरू आहेत. खासगी व शासकीय नर्सिंग स्कूलचे प्रवेश, विद्यार्थ्यांच्या परीक्षा व निकाल, त्या त्या पदविकांचे अभ्यासक्रम महाराष्ट्र परिचर्या परिषद घेतात. खासगी व शासकीय दोन्ही नर्सिंग स्कूलमधून शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थिनींना पदविका प्रमाणपत्र व त्यांची नोंदणी महाराष्ट्र परिचर्या परिषद करते व ते भारतीय परिचर्या परिषदेच्या निकषानुसारच असते. मग जर एकाच परिषदेचे खासगी व शासकीय नर्सिंग स्कूलवर नियंत्रण असेल तर शासकीय दर्जा बरा आणि खासगीचा संशयास्पद कसा असू शकतो. ज्या खासगी नर्सिंग स्कूलमध्ये शिक्षणासाठी आवश्यक सुविधा नसतील तर त्यांना कारणे दाखवा नोटीसद्वारे विचारणा करावी व त्या स्कूलचा दर्जा वाढविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणे अपेक्षित आहे. सन २०१३ मध्ये महाराष्ट्र राज्याचे नर्सिंग आणि पॅरॅमेडिकल बोर्ड बनविण्यासाठी निर्माण केलेला कायदा व महाराष्ट्र परिचर्या परिषदेने त्या विरोधात घेतलेला न्यायालयातील पवित्रा यामुळे सरकारची झालेली गळचेपी यातून ‘वड्याचे तेल वांग्याला’ याप्रमाणे परिचर्या परिषदेने दिलेल्या मान्यता हा मूळ मुद्दा पण विद्यार्थ्यांवर अन्याय व त्यांचा शैक्षणिक गुणवत्तेवर संशय घेणे अयोग्य आहे. वेळ पडल्यास दाद मागण्यासाठी व शासनाच्या आडमुठ्या धोरणाविरुद्ध आवाज उठवू, असा इशारा प्रसिद्धीपत्रकातून गाळवणकर यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)जनहित याचिका दाखल करणार : गाळवणकरजर ५० मार्कांची सी. ई. टी. व ५० मार्कांची प्रात्यक्षिक घ्यावयाची असेल तर खासगी नर्सिंग स्कूलमध्ये शिकणारा व शासकीय नर्सिंग स्कूलमधून शिकणारा असा भेदभाव न करता आरएएनएम व आरजीएनएम अभ्यासक्रम पूर्ण करणारी कोणतीही व्यक्ती असू दे त्यांनी ती अट सक्तीची करावी. म्हणजे आपल्या राज्यात समान न्याय, समान हक्क व समता असून आमचा महाराष्ट्र शिक्षणात दुजाभाव करत नाही, असे म्हणता येईल, अन्यथा आम्ही विद्यार्थ्यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करू. तसेच तपासण्या करण्यासाठी पथक पाठवू.