शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

मालवणात पॅनकार्डधारकांचा ठिय्या

By admin | Updated: October 27, 2016 23:22 IST

ठेवीदार आक्रमक : परतावा मिळेपर्यंत आंदोलनाचा इशारा, कंपनीच्या हॉटेलमध्ये पर्यटकांना रोखले

मालवण : पॅनकार्ड क्लब्ज लिमिटेड या कंपनीत जिल्ह्यातील ठेवीदारांची परतावा मुदत संपली असतानाही परतावा न देण्यात आल्याने आक्रमक बनलेल्या मालवणातील ठेवीदारांनी गुरुवारी सकाळपासून हॉटेल सागर किनारा येथे बेमुदत ठिय्या आंदोलन छेडले आहे. या आंदोलनात ठेवीदार व मार्केटींग एजंटही सहभागी झाले आहेत. जोपर्यंत ‘पॅनकार्ड’कडून रक्कम परतावा स्वरुपात दिली जाणार नाही, तोपर्यंत बेमुदत ठिय्या सुरूच राहील, असा एकमुखी निर्धार ठेवीदारांनी केला आहे. ठेवीदारांनी पॅनकार्डविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आम्हांला तारखा नको, जमा केलेली रक्कम मिळाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. ठेवीदारांनीनी कंपनीच्या दोन्ही हॉटेलमध्ये ठाण मांडले. यावेळी हॉटेलमध्ये दाखल होणाऱ्या पर्यटक व ग्राहकांना प्रवेश करण्यास अटकाव केला जात होता. सायंकाळी उशिरापर्यंत कंपनीकडून ठोस भूमिका न घेतल्याने आंदोलन सुरुच होते. पॅनकार्डने ठोस भूमिका घेतल्यास व परतावा न दिल्यास पैसे मिळेपर्यंत दरदिवशी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे ठेवीदारांनी स्पष्ट केले. दोन महिन्यांपूर्वी सावंतवाडीतील ठेवीदारांनी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्त्वाखाली सावंतवाडी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला होता. या प्रकरणात कंपनीच्या संचालकांवरही गुन्हे दाखल झाले होते. त्यात काही ठेवीदारांना आपली रक्कमही मिळाली होती. त्यामुळे पॅनकार्डच्या विरोधात आता सर्वच जिल्हावासीय आक्रमक होताना आढळत आहेत. (प्रतिनिधी) ४00 ठेवीदार सहभागी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीस हजारांहून अधिक ठेवीदारांच्या सुमारे ४० कोटींच्या ठेवी आहेत. मात्र गेल्या दीड वर्षापासून कंपनीचे सर्व व्यवहार व परतावा रक्कम बंद झाल्याने ठेवीदारांसह मार्केटींग एजंट हवालदिल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी सावंतवाडी तालुक्यात ठेवीदारांनी तीव्र आंदोलन केले होते. ४0 कोटींहून अधिकची गुंतवणूक यावेळी अवधूत चव्हाण, राजा गावकर, नाना कुमठेकर, प्रमोद नाईक, मेघा गावकर, आशू परब, एम. एस. कडू, डी. के. चव्हाण. ए. एम. तळवडेकर यांनी ठिय्या आंदोलनामागची भूमिका स्पष्ट केली. गेली काही वर्षे पॅनकार्ड समूहाच्या माध्यमातून मार्केटींग एजंटद्वारे जिल्ह्यातील सुमारे ६० ते ७० टक्के ग्राहकांनी ४० कोटींहून अधिकची गुंतवणूक केली आहे. अनेक ठेवीदारांची ठेव मुदत तारीख उलटून गेली तरी ठेवीच्या रकमा गेल्या दीड वर्षापासून मिळत नाहीत. कोट्यवधी रकमेचा परतावा मिळत नसल्याने ग्राहकांचा संताप वाढत गेला. कंपनीतील वरिष्ठांशी संपर्क होत नसल्याने संतप्त ठेवीदारांनी आंदोलन छेडले आहे, असे सांगितले.