शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी.मुळे विद्यार्थ्यांना भुर्दंड

By admin | Updated: December 16, 2014 00:19 IST

गलथान कारभार : पालकांमध्ये नाराजी

नांदगाव : देवगड-रत्नागिरी या सकाळच्या एस.टी.च्या गलथानपणामुळे साळिस्ते व वारगावच्या अनेक मुलांना शैक्षणिक नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. शनिवारी सकाळीच असणाऱ्या शाळा व कॉलेजच्या मुलांना अनेकवेळा या एस.टी.मुळे विलंब होत असल्याने मुलांसह पालकांमध्येही चीड निर्माण झाली आहे. अशाप्रकारे मुलांच्या होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण, असाही सवाल पालकांमधून उपस्थित केला जात आहे. याबाबत माहिती अशी की, देवगड रत्नागिरी ही एस.टी. बस सकाळी ६.३० वाजता साळिस्ते येथे येते. साळिस्ते तसेच वारगावमधील अनेक विद्यार्थी खारेपाटण येथील महाविद्यालयात शिक्षणासाठी जातात. खारेपाटण महाविद्यालय सकाळी ७.१० वाजता, तर वारगाव माध्यमिक विद्यालय सकाळी ७.३० वाजता असते. साळिस्ते येथे सुमारे १५ विद्यार्थी-विद्यार्थिनी वारगावला माध्यमिक शाळेत, तर खारेपाटणला महाविद्यालयात शिक्षणासाठी जातात. विशेष म्हणजे शनिवारी अनेकवेळा ही गाडी थांबवली जात नाही आणि थांबलीच तर एस.टी. थांब्यापासून खूप अंतरावर थांबवली जाते. यामुळे काही विद्यार्थी जातात, तर काही एस.टी. बसपर्यंत धावत जाईपर्यंत गाडी निघून जाते.वारंवार अशा घडणाऱ्या प्रकारामुळे विद्यार्थी नाराज असून, पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या एस.टी.नंतर सात वाजता कणकवली-रत्नागिरी एस.टी. आहे आणि त्यानंतर निमआराम एस.टी. असल्याने पासही चालत नाही. त्यामुळे नाहक भुर्दंड भरत विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतोच, शिवाय शाळा, महाविद्यालयात उशिरा पोहोचले जातात. याबाबत विद्यार्थी नाराज असून एस. टी. महामंडळाकडून योग्य दखल घेण्यात यावी, अशी मागणी आहे.याबाबत विद्यार्थ्यांशी संपर्क साधला असता असे समजले की, अनेकवेळा या बसला महिला वाहक असते. त्यामुळे एस.टी. बसस्टॉप सोडून पुढे का थांबवली अथवा काही विचारले जात नाही. मात्र, तसे कोणी विचारलेच तर उलट उत्तराशिवाय काहीच मिळत नाही. यामुळे सकाळची देवगड-रत्नागिरी बस नाही मिळाली तर मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होतेच, तर अनेकवेळा विद्यार्थी पास असूनही आर्थिक भुर्दंड भरावा लागतो. ग्रामीण भागातून विद्यार्थी शिक्षणासाठी प्रवास करतात. अशा मुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे. (वार्ताहर)प्रशासनाने दखल घ्यावीदेवगड-रत्नागिरी या सकाळच्या बसला नेहमी महिला वाहक असते. त्यामुळे एस.टी. बस स्टॉप सोडून पुढे का थांबवली अथवा काही विचारले जात नाही. मात्र, तसे कोणी विचारलेच तर उलट उत्तराशिवाय काहीच मिळत नाही. यामुळे सकाळची देवगड-रत्नागिरी बस नाही मिळाली तर मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत एस. टी. प्रशासनाने दखल घ्यावी. या मार्गावरील विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.