शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

एस.टी.मुळे विद्यार्थ्यांना भुर्दंड

By admin | Updated: December 16, 2014 00:19 IST

गलथान कारभार : पालकांमध्ये नाराजी

नांदगाव : देवगड-रत्नागिरी या सकाळच्या एस.टी.च्या गलथानपणामुळे साळिस्ते व वारगावच्या अनेक मुलांना शैक्षणिक नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. शनिवारी सकाळीच असणाऱ्या शाळा व कॉलेजच्या मुलांना अनेकवेळा या एस.टी.मुळे विलंब होत असल्याने मुलांसह पालकांमध्येही चीड निर्माण झाली आहे. अशाप्रकारे मुलांच्या होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण, असाही सवाल पालकांमधून उपस्थित केला जात आहे. याबाबत माहिती अशी की, देवगड रत्नागिरी ही एस.टी. बस सकाळी ६.३० वाजता साळिस्ते येथे येते. साळिस्ते तसेच वारगावमधील अनेक विद्यार्थी खारेपाटण येथील महाविद्यालयात शिक्षणासाठी जातात. खारेपाटण महाविद्यालय सकाळी ७.१० वाजता, तर वारगाव माध्यमिक विद्यालय सकाळी ७.३० वाजता असते. साळिस्ते येथे सुमारे १५ विद्यार्थी-विद्यार्थिनी वारगावला माध्यमिक शाळेत, तर खारेपाटणला महाविद्यालयात शिक्षणासाठी जातात. विशेष म्हणजे शनिवारी अनेकवेळा ही गाडी थांबवली जात नाही आणि थांबलीच तर एस.टी. थांब्यापासून खूप अंतरावर थांबवली जाते. यामुळे काही विद्यार्थी जातात, तर काही एस.टी. बसपर्यंत धावत जाईपर्यंत गाडी निघून जाते.वारंवार अशा घडणाऱ्या प्रकारामुळे विद्यार्थी नाराज असून, पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या एस.टी.नंतर सात वाजता कणकवली-रत्नागिरी एस.टी. आहे आणि त्यानंतर निमआराम एस.टी. असल्याने पासही चालत नाही. त्यामुळे नाहक भुर्दंड भरत विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतोच, शिवाय शाळा, महाविद्यालयात उशिरा पोहोचले जातात. याबाबत विद्यार्थी नाराज असून एस. टी. महामंडळाकडून योग्य दखल घेण्यात यावी, अशी मागणी आहे.याबाबत विद्यार्थ्यांशी संपर्क साधला असता असे समजले की, अनेकवेळा या बसला महिला वाहक असते. त्यामुळे एस.टी. बसस्टॉप सोडून पुढे का थांबवली अथवा काही विचारले जात नाही. मात्र, तसे कोणी विचारलेच तर उलट उत्तराशिवाय काहीच मिळत नाही. यामुळे सकाळची देवगड-रत्नागिरी बस नाही मिळाली तर मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होतेच, तर अनेकवेळा विद्यार्थी पास असूनही आर्थिक भुर्दंड भरावा लागतो. ग्रामीण भागातून विद्यार्थी शिक्षणासाठी प्रवास करतात. अशा मुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे. (वार्ताहर)प्रशासनाने दखल घ्यावीदेवगड-रत्नागिरी या सकाळच्या बसला नेहमी महिला वाहक असते. त्यामुळे एस.टी. बस स्टॉप सोडून पुढे का थांबवली अथवा काही विचारले जात नाही. मात्र, तसे कोणी विचारलेच तर उलट उत्तराशिवाय काहीच मिळत नाही. यामुळे सकाळची देवगड-रत्नागिरी बस नाही मिळाली तर मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत एस. टी. प्रशासनाने दखल घ्यावी. या मार्गावरील विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.