शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी.मुळे विद्यार्थ्यांना भुर्दंड

By admin | Updated: December 16, 2014 00:19 IST

गलथान कारभार : पालकांमध्ये नाराजी

नांदगाव : देवगड-रत्नागिरी या सकाळच्या एस.टी.च्या गलथानपणामुळे साळिस्ते व वारगावच्या अनेक मुलांना शैक्षणिक नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. शनिवारी सकाळीच असणाऱ्या शाळा व कॉलेजच्या मुलांना अनेकवेळा या एस.टी.मुळे विलंब होत असल्याने मुलांसह पालकांमध्येही चीड निर्माण झाली आहे. अशाप्रकारे मुलांच्या होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण, असाही सवाल पालकांमधून उपस्थित केला जात आहे. याबाबत माहिती अशी की, देवगड रत्नागिरी ही एस.टी. बस सकाळी ६.३० वाजता साळिस्ते येथे येते. साळिस्ते तसेच वारगावमधील अनेक विद्यार्थी खारेपाटण येथील महाविद्यालयात शिक्षणासाठी जातात. खारेपाटण महाविद्यालय सकाळी ७.१० वाजता, तर वारगाव माध्यमिक विद्यालय सकाळी ७.३० वाजता असते. साळिस्ते येथे सुमारे १५ विद्यार्थी-विद्यार्थिनी वारगावला माध्यमिक शाळेत, तर खारेपाटणला महाविद्यालयात शिक्षणासाठी जातात. विशेष म्हणजे शनिवारी अनेकवेळा ही गाडी थांबवली जात नाही आणि थांबलीच तर एस.टी. थांब्यापासून खूप अंतरावर थांबवली जाते. यामुळे काही विद्यार्थी जातात, तर काही एस.टी. बसपर्यंत धावत जाईपर्यंत गाडी निघून जाते.वारंवार अशा घडणाऱ्या प्रकारामुळे विद्यार्थी नाराज असून, पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या एस.टी.नंतर सात वाजता कणकवली-रत्नागिरी एस.टी. आहे आणि त्यानंतर निमआराम एस.टी. असल्याने पासही चालत नाही. त्यामुळे नाहक भुर्दंड भरत विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतोच, शिवाय शाळा, महाविद्यालयात उशिरा पोहोचले जातात. याबाबत विद्यार्थी नाराज असून एस. टी. महामंडळाकडून योग्य दखल घेण्यात यावी, अशी मागणी आहे.याबाबत विद्यार्थ्यांशी संपर्क साधला असता असे समजले की, अनेकवेळा या बसला महिला वाहक असते. त्यामुळे एस.टी. बसस्टॉप सोडून पुढे का थांबवली अथवा काही विचारले जात नाही. मात्र, तसे कोणी विचारलेच तर उलट उत्तराशिवाय काहीच मिळत नाही. यामुळे सकाळची देवगड-रत्नागिरी बस नाही मिळाली तर मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होतेच, तर अनेकवेळा विद्यार्थी पास असूनही आर्थिक भुर्दंड भरावा लागतो. ग्रामीण भागातून विद्यार्थी शिक्षणासाठी प्रवास करतात. अशा मुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे. (वार्ताहर)प्रशासनाने दखल घ्यावीदेवगड-रत्नागिरी या सकाळच्या बसला नेहमी महिला वाहक असते. त्यामुळे एस.टी. बस स्टॉप सोडून पुढे का थांबवली अथवा काही विचारले जात नाही. मात्र, तसे कोणी विचारलेच तर उलट उत्तराशिवाय काहीच मिळत नाही. यामुळे सकाळची देवगड-रत्नागिरी बस नाही मिळाली तर मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत एस. टी. प्रशासनाने दखल घ्यावी. या मार्गावरील विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.