शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

कवितेमुळे आत्मिक समाधान

By admin | Updated: September 18, 2015 23:23 IST

मनोहर प्रभू : मालवण येथील भंडारी हायस्कूलमध्ये कार्यक्रम

मालवण : कविता ही स्वानंद देणारी असावी. कवितेमुळे माणसाला आत्मिक समाधान प्राप्त होते. काव्य हे शिकवायचे नसते, तर ते स्वत: अनुभवायचे असते. श्रावणगीते, पावसाची गाणी ही गायल्यानंतर किंवा वाचल्यानंतर आपण एका भावविश्वात न्हाऊन निघतो. भंडारी हायस्कूलने आयोजित केलेला हा एक स्तुत्य उपक्रम आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त शिक्षक मनोहर प्रभू यांनी येथे बोलताना केले.मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात प्रभू बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मालवणचे साहित्यिक आणि भंडारी एज्युकेशन सोसायटीचे लोकल कमिटीचे सेक्रेटरी रवींद्र वराडकर, मुख्याध्यापिका समिता मुणगेकर, पर्यवेक्षिका गौरी शिंदे, आदी उपस्थित होते.सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे सहायक शिक्षिका हेमश्री मांजरेकर यांनी स्वागत केले. यावेळी रवींद्र वराडकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका समिता मुणगेकर यांनी मराठी काव्याची महती सांगतानाच विद्यार्थ्यांनी निसर्गाकडे दुर्लक्ष करू नये, असे मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमात प्रशालेच्या दत्ताराम सारंग, लीना धुरी, स्नेहल मोंडकर, तन्वी पराडकर, साक्षी केळुसकर, लीशा कडू, अमृता वायंगणकर, श्वेता चव्हाण, मंथन बांदेकर, तन्वी आंबेरकर, करीना खराडे, स्नेहल पाटकर, निशिता चव्हाण, अमृता माळगे, विशाखा गावकर, गौरी मेस्त्री, साक्षी राऊळ, दिव्या चव्हाण, गायत्री पडते, मृण्मयी वर्देकर, सुकन्या देऊलकर, चिन्मय गवंडे, हेमा केरकर, गायत्री कोयंडे, पायल आढाव, शामल आंबेरकर, पल्लवी कोळगे, करुणा माडये, मिताली गोवेकर, सोहम कांबळी, प्रथमेश सामंत, दिव्या मालवणकर, प्रवरा कांबळी यांनी सहभाग घेत विविध श्रावणगीते सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वजा सामंत हिने केले.निसर्गाचे मुलांशी असलेले नाते हरवतेय...यावेळी मनोहर प्रभू म्हणाले, पूर्वी पाठ्यपुस्तकामध्ये तालबद्ध कवितांचा समावेश असायचा. आज गद्यात्मक काव्य प्रकार सुरू झाला आहे. तालबद्ध काव्यामुळे मुलांना कविता समजतेच. शिवाय आत्मिक समाधानही प्राप्त होते. आजच्या काळातील गद्यात्मक कवितांमुळे हे सारे मागे पडले आह, असे असताना जुन्या नव्या पावसाळी गीतांवर आधारित प्रशालेने आयोजित केलेला हा कार्यक्रम एक स्तुत्य उपक्रम आहे, असे सांगून निसर्गाचे मुलांशी असलेले नाते आधुनिक तंत्रज्ञानाने हरवत चालले आह,े असेही ते म्हणाले.