शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
6
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
7
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
8
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
9
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
10
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
11
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
12
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
13
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
14
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
15
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
16
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
17
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
18
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
19
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
20
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
Daily Top 2Weekly Top 5

कशेडी घाटातील रुंदीकरणाला गती

By admin | Updated: December 29, 2014 23:55 IST

मुंबई-गोवा महामार्ग : ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप, वर्षभर रखडलेले काम प्रगतीपथावर

रत्नागिरी : खेड तालुक्याच्या कशेडी घाटामधील मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचे काम सन २०१३पासून सुरू आहे. हे काम प्रगतीपथावर असून, आठ गावांतील शेतकऱ्यांना मालकी जमिनींच्या उत्खननाच्या मोबदल्यापासून वंचित ठेवले जात असल्याने नाराजीचे सूर उमटत आहेत. सुरूवातीच्या काळात रेंगाळलेले हे काम तब्बल एक वर्षानंतर सुरू झाले असून, आता रस्ता रुंदीकरण व गटारांच्या काँक्रीटीकरणाने वेग घेतला आहे.कशेडी घाटातील धोकादायक वळणे काढण्यासाठी जेसीबी व पोकलेनसारख्या यंत्रणेचा वापर करून माती व दगडाची वाहतूक अन्यत्र करण्यात येत आहे. या कामाची कोट्यवधी रूपयांची निविदा काढण्यात आली आहे. मात्र, महसूल विभागाला गौण खनिज उत्खननापोटी मिळणारी रॉयल्टी संबंधित ठेकेदाराने अदा केलेली नाही.सुपरवायझर असलेले शाखा अभियंता येरूणकर यांनी हे काम राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित जमिनीवरच सुरू असल्याचे सांगून रस्त्याच्या मध्यरेषेपासून १५ मीटर दुतर्फा जमीन ही राष्ट्रीय महामार्ग होण्यावेळीच शेतकऱ्यांना मोबदला देऊन अधिग्रहीत करण्यात आल्याची माहिती दिली.या वादानंतर तब्बल एका वर्षाच्या विश्रांतीनंतर तेच काम पुन्हा सुरू झाले आहे. माती उत्खननानंतर रुंद झालेल्या डोंगर बाजूच्या साईडपट्टीवर डबर फोडून रूंदीकरणाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. याच बाजूला काँक्रीटच्या गटाराचे बांधकाम सुरू झाले आहे. मात्र, तीव्र वळणांचा घाटरस्ता सरळ करण्याचा प्रयत्न अपेक्षित असताना तीव्र वळणाचा धोका कायम ठेवूनच रुंदीकरण होत असल्याने कशेडी घाट चढणाऱ्या वाहनांना घाट उतरणारी वाहने अचानक समोर आल्याने दरीकडे जाण्यापेक्षा रस्त्यावर राहण्याच्या प्रयत्नात अपघाताला सामोरे जाणे भाग पडत आहे. केवळ चार ते सहा इंचाचा डबराचा थर देऊन त्यावर निकृष्ट दर्जाची खडी अंथरून कमी दाबाचा रोडरोलर फिरविण्यात येत आहे. अवजड वाहने या नवीन रस्त्यावरून गेल्यास धोका संभवतो. यासंदर्भात, यापूर्वीही असे अपघात कशेडी घाटात झाल्याच्या घटनांकडे महामार्ग बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. कशेडी घाटात सुरू असलेले रुंदीकरणाचे काम केवळ मंजूर निधी परत जाऊ नये, या हेतूने ठेकेदाराकडून घीसाडघाईत पूर्ण करून घेतले जात असल्याने या कामाच्या ठिकाणी शाखा अभियंता दर्जाचा एकही अधिकारी गुणवत्ता व दर्जा नियंत्रणासाठी उपलब्ध नाही. उत्खननातील माती भरावासाठी वापरण्याच्या कामाप्रमाणे घाटातील डोंगरातील दगडांचा साईडपट्टीत दाबून रस्ता रुंदीकरणासाठी वापर केला जात आहे. यामुळे महसूल विभागाला चुना लावण्याप्रमाणेच बांधकाम विभागालाही चुना लावण्याचे काम यामुळे झाले आहे. कशेडी घाटातील रस्त्यांची तीव्र वळणे नियंत्रित करण्याऐवजी वळणांचा धोका कायम ठेऊन केवळ रस्ता रुंदीकरण केले जात आहे. या धोक्याची तीव्रता वाढवण्यासाठी तीव्र वळणांवर डोंगर बाजूने गटारांचे काँक्रीटीकरण केले जात आहे. या वळणांवर वाहने नियंत्रित न झाल्यास काँक्रीटच्या गटारांतून टायर अडकून वाहने रूतण्याचा व कलंडण्याचा धोका वाढणार आहे. (शहर वार्ताहर)अधिक जमिनीवर उत्खननउत्खननामध्ये धामणदिवी, भोगाव खुर्द, भोगाव बुद्रुक, काळपवाडी दत्तवाडी, पार्टेवाडी, येलंगवाडी, भरणेवाडी आदी आठ गावे व वाड्यांतील खातेदार शेतकऱ्यांच्या डोंगरजमिनींचा समावेश आहे. या शेतकऱ्यांना पूर्वसूचना न देता संपादित जमिनींपेक्षा अधिक जमिनींवर उत्खनन करून वळणे काढण्याचे काम सुरू असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे होते.कशेडी घाटातील धोकादायक वळणे काढण्यासाठी जेसीबी व पोकलेनसारख्या यंत्रणेचा वापर.कामाची कोट्यवधी रूपयांची निविदा.तब्बल एका वर्षाच्या विश्रांतीनंतर तेच काम पुन्हा सुरू.माती उत्खननानंतर रुंद झालेल्या डोंगर बाजूच्या साईडपट्टीवर डबर फोडून रूंदीकरणाचे प्रयत्न सुरू.महसूल विभागाप्रमाणेच बांधकाम विभागालाही चुना लावण्याचे काम.