शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

सैन्यभरतीसाठी विशेष क्रीडांगणे आवश्यक : खजुरिया

By admin | Updated: February 12, 2015 00:40 IST

प्रस्ताव देणार : निकष, गुणवत्तेच्या आधारावरच भरती

रत्नागिरी : सैन्यदलात भरतीसाठी हजारोंच्या संख्येने येणाऱ्या तरुणांची निवास व प्रसाधनगृहांची योग्य व्यवस्था होण्यासाठी राज्यात चार ठिकाणी खास क्रीडांगणे उभारावीत, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यांच्या सूचनेनुसार लवकरच तसा प्रस्ताव राज्य शासनाला दिला जाईल, अशी माहिती महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्यांच्या सैन्यभरती विभागाचे उपसंचालक ब्रिगेडिअर एम. एस. खजुरिया यांनी येथे पत्रकारपरिषदेत दिली. रत्नागिरीसह सिंंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील युवकांसाठी रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे सुरू असलेल्या सैन्यभरती प्रक्रियेला चांगला प्रतिसाद लाभत आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित आहे. गेल्या तीन दिवसांत येथे भरती प्रक्रियेत दहा हजारांवर युवकांनी सहभाग नोंदविला. रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने सैन्यभरती आयोजनासाठी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानून ब्रिगेडियर खजुरिया म्हणाले, रत्नागिरीत दहा वर्षांनंतर ही भरती प्रक्रिया होत असून, ही प्रक्रिया १८ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. २४० पोलीस बंदोबस्तासाठी तैनात आहेत. या भरतीत जे तरुण सहभागी होतात, त्यातील ७० टक्के अपात्र ठरतात. २५ ते ३० टक्केच तरुण सैन्यभरतीत पात्र ठरतात.सैन्यात भरतीला पात्र ठरण्यासाठी अनेक अटी आहेत. त्याबाबत तीन महिने आधी माहिती दिली जाते. तसेच वेबसाईटवरही याची माहिती दिली जाते. मात्र, काही नोंदणीकृत व नोंदणी नसलेल्या अकादमी या पात्रतेबाबतच्या अटी माहिती असतानाही पात्रता अटीत न बसणाऱ्या तरुणांना सरावासाठी प्रवेश देतात, त्यांच्याकडून शुल्क घेतात. अशा अटी पूर्ण न करणाऱ्या तरुणांची निवड होत नाही. त्यामुळे अशी फसवणूक होऊ नये, असे खजुरिया म्हणाले. ही सैन्यभरती सैनिक जनरल ड्युटी, सैनिक टेक्निकल, सैनिक क्लर्क, स्टोअर किपर, सैनिक नर्सिंग असिस्टंट व सैनिक ट्रेड्समन या ट्रेडकरिता होत आहे. सैन्यभरतीमध्ये जास्तीत जास्त युवकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही ब्रिगेडिअर एम. एस. खजुरिया यांनी केले आहे. (प्रतिनिधी)‘मिडलमॅन’ला थारा नाही : खजुरियासैन्यात निवड होण्यासाठी गुणवत्ता हा एकमेव निकष असल्याने या प्रक्रियेत मिडलमॅनला अजिबात थारा नाही. पारदर्शकरित्या ही निवड प्रक्रिया होत असून, पाच टप्प्यांमध्ये बायोमेट्रिक चाचण्या होतात. मेरीटवरच ही निवड होत असल्याने कोणाच्याही भूलथापांना बळी पडून आपल्या पालकांच्या श्रमाची कमाई फसवणूक करणाऱ्यांच्या तोंडात घालू नये. सैन्यभरतीत अशा कोणत्याही प्रकाराला थारा दिला जात नाही. कुणी व्यक्ती आमिष दाखवत असेल तर थेट पोलिसात तक्रार करावी, असे आवाहनही ब्रिगेडियर खजुरिया यांना केले आहे.