शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

ाच्छिमारांशी बोलण्यास

By admin | Updated: October 13, 2016 23:58 IST

चार वेळा बोलावून चर्चा नाही : वेंगुर्लेतील मच्छिमारांची टीका

सावंतवाडी : पर्ससीन व मिनी पर्ससीननेट यांच्यातील वादाला पालकमंत्री दीपक केसरकर जबाबदार आहेत. निवडणुकीपूर्वी मच्छिमारांचे प्रश्न सोडविणार म्हणणाऱ्या केसरकर यांना निवडणुकीनंतर मात्र आमच्याशी बोलण्यास वेळ नाही. चार वेळा भेटीला बोलावून बैठकीचे कारण देत निघून गेले, अशी जोरदार टीका वेंगुर्लेतील मच्छिमार बांधवांनी केली आहे. गुरूवारी मच्छिमारांच्या प्रश्नासाठी बंदर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची मच्छिमारांनी भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी दादा केळुस्कर, बाबा नाईक, वसंत तांडेल, बाबी रेडकर, दाजी खोबरेकर, अशोक खराडे, गोट्या परब आदी उपस्थित होते. मच्छिमारांच्या प्रश्नाला पूर्णपणे पालकमंत्री दीपक केसरकर हे जबाबदार आहेत. त्यांनी मनात आणले असते तर पर्ससीन व मिनी पर्ससीननेटमधील वाद मिटविला असता. ज्यावेळी हा वाद झाला तेव्हा पालकमंत्री केसरकर यांची भूमिका महत्त्वाची होती. जिल्हा पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना सोबत घेऊन आमची बैठक घेणे तेव्हा गरजेचे होते. पण ती बैठक कशासाठी घेतली नाही याचा उलगड आतापर्यंत झाला नाही, असे मच्छिमार नेते वसंत तांडेल यांनी सांगितले. यावेळी दादा केळुस्कर म्हणाले, पालकमंत्री केसरकर यांनी निवडणुकीपूर्वी जी आश्वासने दिली होती ती त्यांनी पाळली नाहीत. आम्हांला चार वेळा मच्छिमारप्रश्नी भेटण्यासाठी बोलविले होते. पण त्यांनी वेळ दिली नाही. एकदा तर कुडाळ येथील रेल्वे स्टेशनवर रात्रीच्या वेळी बोलविले होते. पण आम्हांला तेथेच ठेवून ओरोस येथून रेल्वेने मुंबईला गेले दुसऱ्यावेळी तर फळ संशोधन केंद्रावर बोलविले आणि गाडीत बसूनच निवेदन स्वीकारले. त्यावेळी बोलण्यासही दिले नाही. मग आम्ही अपेक्षा तरी काय ठेवायची, असा सवाल मच्छिमारांनी केला. बाबा नाईक म्हणाले, पालकमंत्री केसरकर यांचे आम्ही निवडणुकीत काम केले. रात्रीचा दिवस करून निवडून आणले पण त्यांनी आमचा अपेक्षाभंग केला असून पर्यटनाच्या नावाखाली मासेमारी संपविण्याचा डाव पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आखला आहे, असे सांगत फिशरमन व्हिलेज तसेच अन्य प्रकल्पांबाबत त्यावेळी विश्वासात घेतले नसल्याचा आरोपही बाबा नाईक यांनी यावेळी केला. आम्ही त्यावेळी आराखड्याला विरोध केला होता. आताही मंत्री केसरकर हे ‘मच्छिमार नसला तरी चालेल पण पर्यटन वाचले पाहिजे’ असे सांगत आहेत. त्यामुळे त्यांना मच्छिमारांची आवश्यकता नसल्याची टीकाही यावेळी मच्छिमारांनी केली. ते पुढे म्हणाले की, आम्ही अनेकांना आमच्या प्रश्नांबाबत भेटलो सर्वांनी आमची बाजू ऐकून घेतली. मात्र एकमेव पालकमंत्री केसरकर यांनी आमची बाजू ऐकून न घेताच आम्हांला चार वेळा बोलावून घेऊनही तसेच पाठवून दिले. आम्ही पालकमंत्र्याच्या विरोधात नाही. पण त्यांनी आम्हांला जी वागणूक दिली ती आम्ही कधीही विसरू शकत नाही, असेही यावेळी बाबा नाईक यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले. (प्रतिनिधी)