शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
2
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
3
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
4
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
5
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
6
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
7
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
8
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!
9
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
10
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
11
जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीला पुन्हा होणार होते 'ट्विन्स', पण एकाचा झाला मृत्यू; भावुक पोस्ट
12
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
13
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
14
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
15
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
16
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!
17
हरितालिका तृतीया २०२५: व्रत पूजेचे सगळे साहित्य घेतले ना, काही राहिले तर नाही? पाहा, यादी
18
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
19
Priya Bapat: "छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
20
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?

ाच्छिमारांशी बोलण्यास

By admin | Updated: October 13, 2016 23:58 IST

चार वेळा बोलावून चर्चा नाही : वेंगुर्लेतील मच्छिमारांची टीका

सावंतवाडी : पर्ससीन व मिनी पर्ससीननेट यांच्यातील वादाला पालकमंत्री दीपक केसरकर जबाबदार आहेत. निवडणुकीपूर्वी मच्छिमारांचे प्रश्न सोडविणार म्हणणाऱ्या केसरकर यांना निवडणुकीनंतर मात्र आमच्याशी बोलण्यास वेळ नाही. चार वेळा भेटीला बोलावून बैठकीचे कारण देत निघून गेले, अशी जोरदार टीका वेंगुर्लेतील मच्छिमार बांधवांनी केली आहे. गुरूवारी मच्छिमारांच्या प्रश्नासाठी बंदर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची मच्छिमारांनी भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी दादा केळुस्कर, बाबा नाईक, वसंत तांडेल, बाबी रेडकर, दाजी खोबरेकर, अशोक खराडे, गोट्या परब आदी उपस्थित होते. मच्छिमारांच्या प्रश्नाला पूर्णपणे पालकमंत्री दीपक केसरकर हे जबाबदार आहेत. त्यांनी मनात आणले असते तर पर्ससीन व मिनी पर्ससीननेटमधील वाद मिटविला असता. ज्यावेळी हा वाद झाला तेव्हा पालकमंत्री केसरकर यांची भूमिका महत्त्वाची होती. जिल्हा पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना सोबत घेऊन आमची बैठक घेणे तेव्हा गरजेचे होते. पण ती बैठक कशासाठी घेतली नाही याचा उलगड आतापर्यंत झाला नाही, असे मच्छिमार नेते वसंत तांडेल यांनी सांगितले. यावेळी दादा केळुस्कर म्हणाले, पालकमंत्री केसरकर यांनी निवडणुकीपूर्वी जी आश्वासने दिली होती ती त्यांनी पाळली नाहीत. आम्हांला चार वेळा मच्छिमारप्रश्नी भेटण्यासाठी बोलविले होते. पण त्यांनी वेळ दिली नाही. एकदा तर कुडाळ येथील रेल्वे स्टेशनवर रात्रीच्या वेळी बोलविले होते. पण आम्हांला तेथेच ठेवून ओरोस येथून रेल्वेने मुंबईला गेले दुसऱ्यावेळी तर फळ संशोधन केंद्रावर बोलविले आणि गाडीत बसूनच निवेदन स्वीकारले. त्यावेळी बोलण्यासही दिले नाही. मग आम्ही अपेक्षा तरी काय ठेवायची, असा सवाल मच्छिमारांनी केला. बाबा नाईक म्हणाले, पालकमंत्री केसरकर यांचे आम्ही निवडणुकीत काम केले. रात्रीचा दिवस करून निवडून आणले पण त्यांनी आमचा अपेक्षाभंग केला असून पर्यटनाच्या नावाखाली मासेमारी संपविण्याचा डाव पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आखला आहे, असे सांगत फिशरमन व्हिलेज तसेच अन्य प्रकल्पांबाबत त्यावेळी विश्वासात घेतले नसल्याचा आरोपही बाबा नाईक यांनी यावेळी केला. आम्ही त्यावेळी आराखड्याला विरोध केला होता. आताही मंत्री केसरकर हे ‘मच्छिमार नसला तरी चालेल पण पर्यटन वाचले पाहिजे’ असे सांगत आहेत. त्यामुळे त्यांना मच्छिमारांची आवश्यकता नसल्याची टीकाही यावेळी मच्छिमारांनी केली. ते पुढे म्हणाले की, आम्ही अनेकांना आमच्या प्रश्नांबाबत भेटलो सर्वांनी आमची बाजू ऐकून घेतली. मात्र एकमेव पालकमंत्री केसरकर यांनी आमची बाजू ऐकून न घेताच आम्हांला चार वेळा बोलावून घेऊनही तसेच पाठवून दिले. आम्ही पालकमंत्र्याच्या विरोधात नाही. पण त्यांनी आम्हांला जी वागणूक दिली ती आम्ही कधीही विसरू शकत नाही, असेही यावेळी बाबा नाईक यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले. (प्रतिनिधी)