शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
2
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
3
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
4
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
5
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
6
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
7
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
8
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
9
जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
10
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
11
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
12
गोलंदाजांचा कहर...एकही फलंदाज टिकेना! फक्त एक फिफ्टी अन् २ दिवसांत पडल्या २४ विकेट्स!
13
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
14
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
15
Viral Video: कॅनडात ‘शंकर भगवान की जय’चा नारा; भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल
16
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
17
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
18
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
19
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
20
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?

ाच्छिमारांशी बोलण्यास

By admin | Updated: October 13, 2016 23:58 IST

चार वेळा बोलावून चर्चा नाही : वेंगुर्लेतील मच्छिमारांची टीका

सावंतवाडी : पर्ससीन व मिनी पर्ससीननेट यांच्यातील वादाला पालकमंत्री दीपक केसरकर जबाबदार आहेत. निवडणुकीपूर्वी मच्छिमारांचे प्रश्न सोडविणार म्हणणाऱ्या केसरकर यांना निवडणुकीनंतर मात्र आमच्याशी बोलण्यास वेळ नाही. चार वेळा भेटीला बोलावून बैठकीचे कारण देत निघून गेले, अशी जोरदार टीका वेंगुर्लेतील मच्छिमार बांधवांनी केली आहे. गुरूवारी मच्छिमारांच्या प्रश्नासाठी बंदर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची मच्छिमारांनी भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी दादा केळुस्कर, बाबा नाईक, वसंत तांडेल, बाबी रेडकर, दाजी खोबरेकर, अशोक खराडे, गोट्या परब आदी उपस्थित होते. मच्छिमारांच्या प्रश्नाला पूर्णपणे पालकमंत्री दीपक केसरकर हे जबाबदार आहेत. त्यांनी मनात आणले असते तर पर्ससीन व मिनी पर्ससीननेटमधील वाद मिटविला असता. ज्यावेळी हा वाद झाला तेव्हा पालकमंत्री केसरकर यांची भूमिका महत्त्वाची होती. जिल्हा पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना सोबत घेऊन आमची बैठक घेणे तेव्हा गरजेचे होते. पण ती बैठक कशासाठी घेतली नाही याचा उलगड आतापर्यंत झाला नाही, असे मच्छिमार नेते वसंत तांडेल यांनी सांगितले. यावेळी दादा केळुस्कर म्हणाले, पालकमंत्री केसरकर यांनी निवडणुकीपूर्वी जी आश्वासने दिली होती ती त्यांनी पाळली नाहीत. आम्हांला चार वेळा मच्छिमारप्रश्नी भेटण्यासाठी बोलविले होते. पण त्यांनी वेळ दिली नाही. एकदा तर कुडाळ येथील रेल्वे स्टेशनवर रात्रीच्या वेळी बोलविले होते. पण आम्हांला तेथेच ठेवून ओरोस येथून रेल्वेने मुंबईला गेले दुसऱ्यावेळी तर फळ संशोधन केंद्रावर बोलविले आणि गाडीत बसूनच निवेदन स्वीकारले. त्यावेळी बोलण्यासही दिले नाही. मग आम्ही अपेक्षा तरी काय ठेवायची, असा सवाल मच्छिमारांनी केला. बाबा नाईक म्हणाले, पालकमंत्री केसरकर यांचे आम्ही निवडणुकीत काम केले. रात्रीचा दिवस करून निवडून आणले पण त्यांनी आमचा अपेक्षाभंग केला असून पर्यटनाच्या नावाखाली मासेमारी संपविण्याचा डाव पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आखला आहे, असे सांगत फिशरमन व्हिलेज तसेच अन्य प्रकल्पांबाबत त्यावेळी विश्वासात घेतले नसल्याचा आरोपही बाबा नाईक यांनी यावेळी केला. आम्ही त्यावेळी आराखड्याला विरोध केला होता. आताही मंत्री केसरकर हे ‘मच्छिमार नसला तरी चालेल पण पर्यटन वाचले पाहिजे’ असे सांगत आहेत. त्यामुळे त्यांना मच्छिमारांची आवश्यकता नसल्याची टीकाही यावेळी मच्छिमारांनी केली. ते पुढे म्हणाले की, आम्ही अनेकांना आमच्या प्रश्नांबाबत भेटलो सर्वांनी आमची बाजू ऐकून घेतली. मात्र एकमेव पालकमंत्री केसरकर यांनी आमची बाजू ऐकून न घेताच आम्हांला चार वेळा बोलावून घेऊनही तसेच पाठवून दिले. आम्ही पालकमंत्र्याच्या विरोधात नाही. पण त्यांनी आम्हांला जी वागणूक दिली ती आम्ही कधीही विसरू शकत नाही, असेही यावेळी बाबा नाईक यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले. (प्रतिनिधी)