शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

सोहिरोबांचे साहित्य आत्मानुभवातून साकारलेले

By admin | Updated: March 24, 2015 00:17 IST

गोविंदराव काळे : बांदा येथे संत सोहिरोबानाथ जन्मत्रिशताब्दी समारोप सोहळा

बांदा : संत तुकोबांची निस्पृहता, संत एकनाथांची निर्वेरता व संत ज्ञानोबा माऊलींचा अमृतानुभव या तिन्हींचा संगम संत सोहिरोबानाथांमध्ये पाहण्यास मिळतो. आपल्याला कितीही ज्ञान मिळाले तरी हरी म्हणजे परमात्म्याविना ते व्यर्थ आहे. याच हरीच्या भजनावीणा काळ घालवू नको रे, असा संदेश नाथांनी दिला आहे. अनुभव म्हणजे प्रचिती आल्याशिवाय मान डोलावू नको, असा उपदेश करणाऱ्या संत सोहिरोबानाथांचे साहित्य हे प्रत्यक्ष आत्म अनुभवातून साकारलेले लेखन आहे, असे प्रतिपादन पर्वरी- गोवा येथील व्याख्याते गोविंदराव काळे यांनी बांदा येथे केले.संत सोहिरोबानाथ आंबिये यांच्या जन्मत्रिशताब्दी समारोप सोहळ्यानिमित्त बांदा येथे २१ ते २८ मार्च या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात रविवारी आयोजित केलेल्या आध्यात्मिक व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, आज विज्ञान तसेच इंग्रजी शिक्षण हे आवश्यक व उपयुक्त असले तरीही संस्कार, सद्विवेक आणि संतांचे उपदेश हे कधीच विसरता कामा नये. परमार्थ आपल्याला जीवन जगण्यास शिकवितो. जीवनाच्या कल्याणासाठी संतांना शरण जाणे आवश्यक आहे. संत परंपरा भोगाचा नव्हे, तर मुक्तीचा मार्ग दाखविते. संत एखाद्या नावाड्याप्रमाणे स्वत: भवसागरात तरतात व इतरांनांही तारतात.या समारोप सोहळ्याचे उद्घाटन काळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने संपन्न झाले. याप्रसंगी उपसरपंच बाळा आकेरकर, व्यापारी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद पावसकर, सचिव सचिन नाटेकर, संत सोहिरोबानाथ जन्मत्रिशताब्दी समितीचे अध्यक्ष सावळाराम सावंत, उपाध्यक्ष गिरीष महाजन, सचिव प्रकाश मिशाळ, अ‍ॅड. रामनाथ आंबिये, प्रसाद आंबिये, विवेक आंबिये, दिवाकर नाटेकर, गुरुनाथ सावंत, आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस. आर. सावंत यांनी केले, तर सूत्रसंचालन आशुतोष भांगले यांनी करून आभार मानले. या व्याख्यानासाठी संतप्रेमी श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)