शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

सोहिरोबांचे साहित्य आत्मानुभवातून साकारलेले

By admin | Updated: March 24, 2015 00:17 IST

गोविंदराव काळे : बांदा येथे संत सोहिरोबानाथ जन्मत्रिशताब्दी समारोप सोहळा

बांदा : संत तुकोबांची निस्पृहता, संत एकनाथांची निर्वेरता व संत ज्ञानोबा माऊलींचा अमृतानुभव या तिन्हींचा संगम संत सोहिरोबानाथांमध्ये पाहण्यास मिळतो. आपल्याला कितीही ज्ञान मिळाले तरी हरी म्हणजे परमात्म्याविना ते व्यर्थ आहे. याच हरीच्या भजनावीणा काळ घालवू नको रे, असा संदेश नाथांनी दिला आहे. अनुभव म्हणजे प्रचिती आल्याशिवाय मान डोलावू नको, असा उपदेश करणाऱ्या संत सोहिरोबानाथांचे साहित्य हे प्रत्यक्ष आत्म अनुभवातून साकारलेले लेखन आहे, असे प्रतिपादन पर्वरी- गोवा येथील व्याख्याते गोविंदराव काळे यांनी बांदा येथे केले.संत सोहिरोबानाथ आंबिये यांच्या जन्मत्रिशताब्दी समारोप सोहळ्यानिमित्त बांदा येथे २१ ते २८ मार्च या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात रविवारी आयोजित केलेल्या आध्यात्मिक व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, आज विज्ञान तसेच इंग्रजी शिक्षण हे आवश्यक व उपयुक्त असले तरीही संस्कार, सद्विवेक आणि संतांचे उपदेश हे कधीच विसरता कामा नये. परमार्थ आपल्याला जीवन जगण्यास शिकवितो. जीवनाच्या कल्याणासाठी संतांना शरण जाणे आवश्यक आहे. संत परंपरा भोगाचा नव्हे, तर मुक्तीचा मार्ग दाखविते. संत एखाद्या नावाड्याप्रमाणे स्वत: भवसागरात तरतात व इतरांनांही तारतात.या समारोप सोहळ्याचे उद्घाटन काळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने संपन्न झाले. याप्रसंगी उपसरपंच बाळा आकेरकर, व्यापारी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद पावसकर, सचिव सचिन नाटेकर, संत सोहिरोबानाथ जन्मत्रिशताब्दी समितीचे अध्यक्ष सावळाराम सावंत, उपाध्यक्ष गिरीष महाजन, सचिव प्रकाश मिशाळ, अ‍ॅड. रामनाथ आंबिये, प्रसाद आंबिये, विवेक आंबिये, दिवाकर नाटेकर, गुरुनाथ सावंत, आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस. आर. सावंत यांनी केले, तर सूत्रसंचालन आशुतोष भांगले यांनी करून आभार मानले. या व्याख्यानासाठी संतप्रेमी श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)