शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

फराळाला फोडणी महागाईची

By admin | Updated: November 10, 2015 23:35 IST

महागाईचा फटका : साखर, तेलाचे दर स्थिर; गृहिणींचे बजेट कोलमडले

रत्नागिरी : ऐन दीपावलीच्या दिवसात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वधारल्याने सर्वसामान्य जनतेला महागाईचा फटका बसला आहे. साखर, तेलाचे दर मात्र स्थिर राहिले असले तरी अन्य वस्तूंच्या दरात झालेल्या वाढीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.गणेशोत्सवानंतर महिनाभरात जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत. १५० ते १८० रूपये किलो दराने तूरडाळ विकली जात आहे. मूगडाळ १२० ते १३०, तर मसूरडाळ ९० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. मूग ९२ ते ९६ रूपये किलो दराने विकण्यात येत आहेत. चणा ६०, काबुली चणा ६५ ते ७०, चवळी ६० ते ७०, उडीद डाळ १४०, मटकी १०६, मसूर ८८, पोहे २५ ते २८, रवा ३० ते ३२ रूपये किलो दराने विकण्यात येत आहेत. खोबरे २०० ते २५० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. १०६ ते ११० रुपये दराने शेंगदाण्याची विक्री सुरू आहे. बेसन ७८ रूपये, आटा २५ ते २८, गूळ ४० ते ४२, साखर २८ ते ३० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे.कांदा ३० ते ४०, बटाटा १६ ते २०, लसूण १०० ते १२० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. दीपावलीच्या सणाचा आनंद सर्वसामान्यांना घेता यावा, असे अपेक्षित असताना दरवाढीमुळे आनंदावर विरजन पडत आहे. नोकरदार महिलांना सुट्या मिळत नसल्यामुळे तयार फराळास विशेष मागणी असते. दरवाढीमुळे रेडीमेड फराळाच्या किमतीतही दर वाढ झाली आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा सजल्या असल्या तरी सर्वसामान्य ग्राहक खरेदीसाठी बजेट पाहून हात आखडता घेत आहेत. महागाईमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडल्याने बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी तुरळक प्रमाणात गर्दी होती. काही ठराविक दुकानांसमोर ग्राहकांनी गर्दी केली होती. बाजारात मंदी आल्याचे दिसत होते. सुटीच्या दिवशीही ग्राहकांचा थंड प्रतिसाद मिळाला. (प्रतिनिधी)फराळाला कमी प्रतिसादऐन दिवाळीच्या काळात महागाईच्या भडक्याचा त्रास गृहिणींना सहन करावा लागला. महागाईचा आलेख दिवसेंदिवस वाढतच चालल्याने गृहिणींचे आर्थिक गणित कोलमडून गेले आहे. त्यामुळे यावर्षी बाजारात खरेदीसाठी तुरळक गर्दी केली होती. फराळासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंचे दर वाढल्याने गृहिणींनी हात आखडता घेतला आहे. तसेच तयार फराळालादेखील कमी प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. मात्र, बचत गटांनी तयार केलेल्या फराळाला यावेळी अधिक पसंती होती.