शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

हळव्या भाताचा हळुवार दिलासा

By admin | Updated: September 5, 2015 23:54 IST

पाऊस नाही तरीही... : भात पसवण्यास प्रारंभ, शेतकऱ्यांना आशेचा किरण

रत्नागिरी : ऊन्हामुळे हळवे भात पसविण्यास प्रारंभ झाला आहे. जिल्ह्याचे मुख्य पीक प्रामुख्याने ७० हजार ३३४ हेक्टर क्षेत्रावर भातपीक लावण्यात येते. हळवे, निमगरवे, गरवे प्रकारचे भात लावण्यात येते. निमगरवे, गरव्या प्रकारचे भात तयार होण्यास अजून विलंब असला तरी हळवे भात पसवण्यास प्रारंभ झाला आहे. सुरूवातीला पाऊस चांगला झाल्यामुळे पेरण्या लवकर पूर्ण झाल्या होत्या. मात्र, नंतर पावसाची हजेरी टप्याटप्याने झाल्यामुळे भात लागवड प्रक्रिया रेंगाळली. जुलै अखेरीपर्यंत भात लागवड सुरू होती. शेतकऱ्यांनी पंपाच्या, पाटाच्या पाण्यावर भात लागवड पूर्ण केली होती. मात्र भाताच्या खाचरात पाणी नसल्यामुळे लागवड झालेल्या भाताला फुटवे कमी फुटले. पाण्याअभावी भातपीक तयार होण्याची प्रक्रिया उशिराने सुरू झाली. काही ठिकाणी तर भातावर करपा रोग पडला, शिवाय वाढ खुंटली. त्याचप्रमाणे खोडकिडा, निळे भुंगेरे, काटेरी भुंगेरेचा प्रादुर्भाव वाढला. वेळोवेळी किटकनाशकांची फवारणी करून रोग नियंत्रणात आणण्यात आले. हळव्या जातीचे भात पसविणे सुरू झाले आहे. त्यामुळे अधूनमधून पावसाची सर आवश्यक आहे. निमगरव्या व गरव्या जातीच्या भातासाठी देखील पाऊस आवश्यक आहे. गेले चार दिवस पुन्हा एकदा पावसाने उसंत घेतली आहे. साधारणत: सप्टेंबरपर्यंत पाऊस लागतो. त्यानंतर पाऊस निरोप घेत असल्यामुळे भात पिकाची उत्पादकता घटण्याचा धोका आहे. पावसाअभावी २५ ते ३५ टक्केनी भात उत्पादकता घटणार असल्याचे कृषी विभागाने जाहीर केले आहे. भात खाचरे कोरडी असल्यामुळे भात वाढीवर त्याचा परिणाम झाला आहे. भाताबरोबर नागली तसेच इतर तृणधान्य, कडधान्य, वेलवर्गिय भाज्या यांच्यासाठी पावसाची आवश्यकता आहे. कडक ऊन्हामुळे रोपे वाळू लागली आहेत. भात पसविताना जास्त पावसाची गरज आहे. गणेशोत्सवात पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळतो. त्यामुळे पसविलेल्या भाताला जास्त पावसाचा धोका संभवू शकतो. प्रमाणापेक्षा पाऊस जास्त झाल्यास नुकसानही संभावते. (प्रतिनिधी)