शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

हळव्या भाताचा हळुवार दिलासा

By admin | Updated: September 5, 2015 23:54 IST

पाऊस नाही तरीही... : भात पसवण्यास प्रारंभ, शेतकऱ्यांना आशेचा किरण

रत्नागिरी : ऊन्हामुळे हळवे भात पसविण्यास प्रारंभ झाला आहे. जिल्ह्याचे मुख्य पीक प्रामुख्याने ७० हजार ३३४ हेक्टर क्षेत्रावर भातपीक लावण्यात येते. हळवे, निमगरवे, गरवे प्रकारचे भात लावण्यात येते. निमगरवे, गरव्या प्रकारचे भात तयार होण्यास अजून विलंब असला तरी हळवे भात पसवण्यास प्रारंभ झाला आहे. सुरूवातीला पाऊस चांगला झाल्यामुळे पेरण्या लवकर पूर्ण झाल्या होत्या. मात्र, नंतर पावसाची हजेरी टप्याटप्याने झाल्यामुळे भात लागवड प्रक्रिया रेंगाळली. जुलै अखेरीपर्यंत भात लागवड सुरू होती. शेतकऱ्यांनी पंपाच्या, पाटाच्या पाण्यावर भात लागवड पूर्ण केली होती. मात्र भाताच्या खाचरात पाणी नसल्यामुळे लागवड झालेल्या भाताला फुटवे कमी फुटले. पाण्याअभावी भातपीक तयार होण्याची प्रक्रिया उशिराने सुरू झाली. काही ठिकाणी तर भातावर करपा रोग पडला, शिवाय वाढ खुंटली. त्याचप्रमाणे खोडकिडा, निळे भुंगेरे, काटेरी भुंगेरेचा प्रादुर्भाव वाढला. वेळोवेळी किटकनाशकांची फवारणी करून रोग नियंत्रणात आणण्यात आले. हळव्या जातीचे भात पसविणे सुरू झाले आहे. त्यामुळे अधूनमधून पावसाची सर आवश्यक आहे. निमगरव्या व गरव्या जातीच्या भातासाठी देखील पाऊस आवश्यक आहे. गेले चार दिवस पुन्हा एकदा पावसाने उसंत घेतली आहे. साधारणत: सप्टेंबरपर्यंत पाऊस लागतो. त्यानंतर पाऊस निरोप घेत असल्यामुळे भात पिकाची उत्पादकता घटण्याचा धोका आहे. पावसाअभावी २५ ते ३५ टक्केनी भात उत्पादकता घटणार असल्याचे कृषी विभागाने जाहीर केले आहे. भात खाचरे कोरडी असल्यामुळे भात वाढीवर त्याचा परिणाम झाला आहे. भाताबरोबर नागली तसेच इतर तृणधान्य, कडधान्य, वेलवर्गिय भाज्या यांच्यासाठी पावसाची आवश्यकता आहे. कडक ऊन्हामुळे रोपे वाळू लागली आहेत. भात पसविताना जास्त पावसाची गरज आहे. गणेशोत्सवात पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळतो. त्यामुळे पसविलेल्या भाताला जास्त पावसाचा धोका संभवू शकतो. प्रमाणापेक्षा पाऊस जास्त झाल्यास नुकसानही संभावते. (प्रतिनिधी)