शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

हळव्या भाताचा हळुवार दिलासा

By admin | Updated: September 5, 2015 23:54 IST

पाऊस नाही तरीही... : भात पसवण्यास प्रारंभ, शेतकऱ्यांना आशेचा किरण

रत्नागिरी : ऊन्हामुळे हळवे भात पसविण्यास प्रारंभ झाला आहे. जिल्ह्याचे मुख्य पीक प्रामुख्याने ७० हजार ३३४ हेक्टर क्षेत्रावर भातपीक लावण्यात येते. हळवे, निमगरवे, गरवे प्रकारचे भात लावण्यात येते. निमगरवे, गरव्या प्रकारचे भात तयार होण्यास अजून विलंब असला तरी हळवे भात पसवण्यास प्रारंभ झाला आहे. सुरूवातीला पाऊस चांगला झाल्यामुळे पेरण्या लवकर पूर्ण झाल्या होत्या. मात्र, नंतर पावसाची हजेरी टप्याटप्याने झाल्यामुळे भात लागवड प्रक्रिया रेंगाळली. जुलै अखेरीपर्यंत भात लागवड सुरू होती. शेतकऱ्यांनी पंपाच्या, पाटाच्या पाण्यावर भात लागवड पूर्ण केली होती. मात्र भाताच्या खाचरात पाणी नसल्यामुळे लागवड झालेल्या भाताला फुटवे कमी फुटले. पाण्याअभावी भातपीक तयार होण्याची प्रक्रिया उशिराने सुरू झाली. काही ठिकाणी तर भातावर करपा रोग पडला, शिवाय वाढ खुंटली. त्याचप्रमाणे खोडकिडा, निळे भुंगेरे, काटेरी भुंगेरेचा प्रादुर्भाव वाढला. वेळोवेळी किटकनाशकांची फवारणी करून रोग नियंत्रणात आणण्यात आले. हळव्या जातीचे भात पसविणे सुरू झाले आहे. त्यामुळे अधूनमधून पावसाची सर आवश्यक आहे. निमगरव्या व गरव्या जातीच्या भातासाठी देखील पाऊस आवश्यक आहे. गेले चार दिवस पुन्हा एकदा पावसाने उसंत घेतली आहे. साधारणत: सप्टेंबरपर्यंत पाऊस लागतो. त्यानंतर पाऊस निरोप घेत असल्यामुळे भात पिकाची उत्पादकता घटण्याचा धोका आहे. पावसाअभावी २५ ते ३५ टक्केनी भात उत्पादकता घटणार असल्याचे कृषी विभागाने जाहीर केले आहे. भात खाचरे कोरडी असल्यामुळे भात वाढीवर त्याचा परिणाम झाला आहे. भाताबरोबर नागली तसेच इतर तृणधान्य, कडधान्य, वेलवर्गिय भाज्या यांच्यासाठी पावसाची आवश्यकता आहे. कडक ऊन्हामुळे रोपे वाळू लागली आहेत. भात पसविताना जास्त पावसाची गरज आहे. गणेशोत्सवात पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळतो. त्यामुळे पसविलेल्या भाताला जास्त पावसाचा धोका संभवू शकतो. प्रमाणापेक्षा पाऊस जास्त झाल्यास नुकसानही संभावते. (प्रतिनिधी)