शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

वर्षभरात विनापरवाना १० हजार झाडांची कत्तल

By admin | Updated: January 8, 2016 01:02 IST

वनविभाग : प्राण्यांच्या अस्तित्त्वाचा प्रश्नही ऐरणीवर

रत्नागिरी : जिल्ह्यात राजरोसपणे अवैधरित्या जंगलतोड सुरू असून, वर्षभरात विनापरवाना ९७०३ झाडे तोडल्याची नोंद वन विभागाकडे आहे. जंगलतोड करणाऱ्यांकडून वर्षभराच्या कालावधीत सुमारे ४ लाख १४ हजार ६५० रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्ह्यात बेसुमार लाकूडतोड होत असल्याने डोंगर ओसाड होत आहेत. त्याचा गंभीर परिणाम वातावरणावर होत असल्याचे दिसून येत आहे. जंगलतोड होत असल्याने जंगली प्राणी लोकवस्तीकडे येत असल्याचे दिसून येत आहे. खाद्याच्या शोधात बिबटे व अन्य प्राणी लोकवस्तीत शिरत असल्याने त्यांच्या अस्तित्त्वाचाही प्रश्न निर्माण झाला आहे.जिल्ह्यात चालू असलेल्या अवैधरित्या वृक्षतोडीकडे वन विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचे एकूणच स्थितीवरून दिसून येत आहे. वनविभागाच्या आशीर्वादानेच मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याचा आरोप जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती व सर्वसाधारण सभेत करण्यात आला होता. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर यांनी स्वत: वन विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन जंगल भागाचा दौरा करण्याचा निर्णयही घेतला होता. अवैधरित्या सुरु असलेली जंगलतोड रोखण्यासाठी वनविभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी फिरती करण्यात येत असली तरी जंगलतोडीचे प्रमाण कमी झालेले नाही. विभागीय वन अधिकाऱ्यांकडून विनापरवाना वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी रात्रंदिवस फिरते पथकही ठेवण्यात आले आहे. वर्षभराच्या कालावधीत जानेवारी २०१५पासून चिपळूण वन विभागाने विनापरवाना वृक्षतोडप्रकरणी दंडात्मक कारवाई करून ४ लाख १४ हजार इतका दंड वसूल केला आहे.वर्षभराच्या कालावधीत ९७०३ झाडांची विनापरवाना कत्तल करण्यात आली. त्यामध्ये चिपळुणात ३८६१, गुहागर ९५, दापोली ५२५, खेड ६४६, मंडणगड २०१, राजापूर १६२८, लांजा १५५६, संगमेश्वर ५७० आणि रत्नागिरीतील ६२१ झाडांचा समावेश आहे. ही विनापरवाना वृक्षतोड वन विभागाने कागदोपत्री नोंद केली असली तरी प्रत्यक्ष बेसुमार वृक्षतोड होत असल्याचे जिल्ह्यात चित्र दिसून येत आहे. विनापरवाना वृक्षतोड करणाऱ्या २८१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. (शहर वार्ताहर)वृक्षतोड अधिनियम : तालुकावार कारवाईअवैध जंगलतोड करताना आढळून आलेल्यांवर महाराष्ट्र वृक्षतोड (विनियमन) अधिनियम १९६४ सुधारणा १९८९ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या अधिनियमाप्रमाणे सन २०१५ या वर्षभरात २८१ विनापरवाना वृक्षतोड प्रकरणे आहेत. तालुकावसूल दंड चिपळूण९१५००गुहागर ६२५०दापोली५५८००खेड५५२००मंडणगड१२३००राजापूर५६०५०लांजा६१२००संगमेश्वर४२९५०रत्नागिरी३३४००एकूण४१४६५०तालुकाप्रकरणेचिपळूण३९गुहागर३दापोली२९खेड१४मंडणगड९३राजापूर३०लांजा३१संगमेश्वर२२रत्नागिरी२०निसर्गप्रेमींची खंतरत्नागिरी जिल्ह्यात वृक्षाखालील क्षेत्र झपाट्याने कमी होत असल्याने निसर्गप्रेमींकडून खंत व्यक्त करण्यात येत आहे.