शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन जिल्हा असून सिंधुदुर्गातून स्थलांतराचे प्रमाण अधिक 

By अनंत खं.जाधव | Updated: January 12, 2024 15:51 IST

रविंद्र चव्हाण, सावंतवाडीत रोजगार मेळावा.

अनंत जाधव, सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे. मात्र या ठिकाणी स्थलांतराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. ते कमी करण्याचे काम रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून विशाल परब यांनी केले.  त्यांनी असेच काम करावे या जिल्ह्यातून रोजगार देणारे हात निर्माण व्हावेत अशी अपेक्षा  राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी शुक्रवारी येथे केले. 

 विशाल परब यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेले “जॉब फेअर” रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार राजन तेली, राज्य उपाध्यक्ष विशाल परब, लखमराजे भोसले, माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, अतुल काळसेकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, जावेद खतीब, अजय गोंदावळे, प्रथमेश तेली, आनंद नेवगी, दिलीप भालेकर, बंटी पुरोहित, रणजित देसाई, प्रकाश मोर्ये, मोहन सावंत, दादा साईल, रवी मडगावकर, प्रायास भोसले, तेजस माने, प्रशांत पाटील भाई सावंत, संदीप मेस्त्री, युवा हबचे दिपक पवार, किरण रहाणे आदी उपस्थित आहेत.

मंत्री चव्हाण म्हणाले, या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला रोजगार मेळावा ही कौतुकास्पद बाब आहे. अनेक जण आश्वासन देतात परंतु  परब यांनी केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष अनेक उमेदवारांना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे याचा फायदा युवा पिढीला होणार आहे. 

भाजपच्या माध्यमातून वेळोवेळी अशा प्रकारचे समाजाभिमुख उपक्रम विविध राबविण्यात आले. यापुढेही ते राबविण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेले सहकार्य निश्चितच केले जाईल, मात्र या ठिकाणी आलेल्या उमेदवारांनी फक्त नोकऱ्या न शोधता आपण नोकरी देणारे बनवा. त्यासाठी आवश्यक असलेले सर्व सहकार्य भाजपच्या माध्यमातून निश्चितच केले, जाईल असे ही मंत्री चव्हाण यांनी सांगितले.

उद्योजक विशाल परब म्हणाले,रोजगार मेळाव्यात आलेला प्रत्येक उमेदवार खुश होईल व आनंदाने घरी जाईल या दृष्टीने या ठिकाणी नोकऱ्या देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी गेले अनेक दिवस अथक परिश्रम केले. आजची गर्दी पाहून त्या कामाचे चीज झाल्याचे दिसले, असे  परब यांनी सांगितले.

पक्षाने कोणतीही जबाबदारी टाकल्यास आपण निश्चितच ती पूर्ण करू या ठिकाणी भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून युवकांना न्याय देण्याचा आपला प्रयत्न राहील असेही ते म्हणाले.यावेळी माजी आमदार राजन तेली यांनीही आपले विचार मांडले.या रोजगार मेळाव्यात मोठ्याप्रमाणात तरूण तरूणी सहभागी झाल्या होत्या तसेच विविध क्षेत्रातील दिडशे कंपन्यांचे अधिकारी कार्यक्रम स्थळी उपस्थित होते.

टॅग्स :Sawantwadiसावंतवाडी