शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

सिंधुदुर्ग राज्यात अव्वल बनविणार

By admin | Updated: August 21, 2016 22:50 IST

रवींद्र चव्हाण : शहरातील प्रभाग चार कार्यालयाचे उद्घाटन; भाजप टीमचे केले विशेष कौतुक

मालवण : पालिकांचे बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मालवण शहरातील प्रभाग चार येथे भाजपच्या प्रभाग कार्यालयाचे उद्घाटन बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. पालिका निवडणुकीच्या विजयाचे हे कार्यालय पहिले पाऊल आहे. शहरातील विकासासाठी शतप्रतिशत भाजप होणे आवश्यक आहे. राज्याला भाजपच्या रूपाने गतिमान सरकार लाभल्याने मालवणसह सिंधुदुर्ग राज्यात एक नंबरचा जिल्हा बनविणार, अशी ग्वाही चव्हाण यांनी उद्घाटनप्रसंगी दिली. दरम्यान, प्रभाग चारचे अध्यक्ष गणेश कुशे तसेच तालुक्यातील भाजपच्या टीमचे चव्हाण यांनी कौतुक करताना पालिकेवर भाजपाचा झेंडा निश्चितच फडकेल, असा विश्वास व्यक्त केला. भाजपच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक केली जात आहे. मालवण येथील पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवून अपेक्षित विकास भाजपच्या माध्यमातून साकारला जाईल, असेही मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, शहर अध्यक्ष बबलू राऊत, विलास हडकर, महेश मांजरेकर, भाऊ सामंत, आप्पा लुडबे, गोपी पालव, जयदेव कदम, आबा कोंडुसकर, विजू केनवडेकर, विनोद भोगावकर, पूर्वा ठाकूर, पूजा सरकारे, गजानन ठाकूर, बबन परुळेकर तसेच विलास सामंत, दादा कांदळकर, महेश जावकर, भाई कासवकर, आदी तसेच मेढा भागातील नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी) एक हजार नागरिकांना विमा सुरक्षा भाजप प्रभाग चारच्यावतीने शहरातील एक हजार नागरिकांना दोन लाख रुपये किमतीचा मोफत अपघाती विमा सुरक्षा देण्यात आला आहे. याबाबतही मंत्री चव्हाण यांनी गणेश कुशे यांचे कौतुक केले. यावेळी त्यांच्या हस्ते विमा सुरक्षा पत्र वितरीत करण्यात आले. शासनाच्या विविध योजनांची माहिती देताना त्याचे थेट लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविले जाणार आहेत, अशी माहिती प्रभाग अध्यक्ष गणेश कुशे यांनी दिली. यावेळी कुशे यांच्या हस्ते मंत्री चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.