शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गला देशात श्रीमंत बनविणार

By admin | Updated: October 13, 2016 21:25 IST

दीपक केसरकर : मळगावात ग्रामसचिवालयाचे भूमिपूजन; विकासासाठी एकजूट आवश्यक

तळवडे : जिल्ह्यातील तरुणांना नोकरीच्या संधी निर्माण करण्याच्यादृष्टीने विकासात्मक प्रकल्प राबविण्यासाठी येत्या काळात प्रत्यक्ष कृतिदर्शक पावले उचलण्यात ेयेणार आहेत. या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा देशातील सर्वांत श्रीमंत जिल्हा बनविण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन राज्याचे गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मळगाव येथे मळगाव सचिवालयाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.मळगाव (ता. सावंतवाडी) येथे ग्रामसचिवालयाच्या इमारतीचे भूमिपूजन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, पंचायत समिती सदस्य वर्षा हरमलकर, मळगावचे सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, सावंतवाडी उपनगराध्यक्ष राजेंद्र पोकळे, वेंगुर्ले पंचायत समितीच्या सभापती सुचिता वजराटकर, नियोजन समितीचे सदस्य प्रकाश परब, गटविकास अधिकारी मोहन भोई, उपसरपंच देवयानी राऊळ, गजानन सातार्डेकर, विजय हरमलकर, दिलीप सोनुर्लेकर, गटनेते अशोक दळवी, आनंद देवळी, वेत्येचे सरपंच सुनील गावडे, तळवडे मतदारसंघाचे विभागप्रमुख विनोद काजरेकर, उपविभागप्रमुख महेश शिरोडकर, तळवडेचे शाखाप्रमुख प्रशांत बुगडे, विजय राऊळ, मळगाव ग्रा.पं.सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, गाव विकास घडवायचा असेल, तर ग्रामस्थांची एकजूट महत्त्वाची आहे. त्याची प्रचिती मळगावात येते. सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा आहे. मळगावमध्ये रेल्वे टर्मिनस निर्माण झाले. त्यामुळे भावी काळात याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येणार असून, पर्यटनाच्या माध्यमातून या भागाचा विकास होणार आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास भावी काळात होणार आहे. जिल्ह्यातील एकही कुटुंब दारिद्र्यरेषेखाली राहणार नाही, यासाठी मी प्रयत्नशील आहे. यावेळी विविध मान्यवरांनी आपल्या मनोेगतांतून मळगावच्या विकासकामांसंबंधी व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच ग्रामस्थांच्यावतीने केसरकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी) पालकमंत्र्यांमुळे विकासात अग्रेसरमळगावचे सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर म्हणाले, मळगाव ग्रामसचिवालयासाठी एका तपाचा कालावधी जावा लागला. सुमारे १२ वर्षानंतर हे सचिवालय निर्माण होत आहे. शिवसेनेची सत्ता आल्यानंतर १२ महिन्यांतच हे काम पूर्ण होत आहे. पालकमंत्र्यांचे मळगावकडे विशेष लक्ष असल्याने या गावात विविध उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबविले जात आहेत. रेल्वे टर्मिनस असो किंवा अन्य सुविधा, विकासकामांत गाव कायमच अग्रेसर राहिले आहे. ही बाब गावासाठी गौरवास्पद आहे. गावाच्या विकासाला सर्व ग्रामपंचायत सदस्य, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांचा मोलाचा हातभार आहे, असे पेडणेकर म्हणाले.