शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गला देशात श्रीमंत बनविणार

By admin | Updated: October 13, 2016 21:25 IST

दीपक केसरकर : मळगावात ग्रामसचिवालयाचे भूमिपूजन; विकासासाठी एकजूट आवश्यक

तळवडे : जिल्ह्यातील तरुणांना नोकरीच्या संधी निर्माण करण्याच्यादृष्टीने विकासात्मक प्रकल्प राबविण्यासाठी येत्या काळात प्रत्यक्ष कृतिदर्शक पावले उचलण्यात ेयेणार आहेत. या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा देशातील सर्वांत श्रीमंत जिल्हा बनविण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन राज्याचे गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मळगाव येथे मळगाव सचिवालयाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.मळगाव (ता. सावंतवाडी) येथे ग्रामसचिवालयाच्या इमारतीचे भूमिपूजन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, पंचायत समिती सदस्य वर्षा हरमलकर, मळगावचे सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, सावंतवाडी उपनगराध्यक्ष राजेंद्र पोकळे, वेंगुर्ले पंचायत समितीच्या सभापती सुचिता वजराटकर, नियोजन समितीचे सदस्य प्रकाश परब, गटविकास अधिकारी मोहन भोई, उपसरपंच देवयानी राऊळ, गजानन सातार्डेकर, विजय हरमलकर, दिलीप सोनुर्लेकर, गटनेते अशोक दळवी, आनंद देवळी, वेत्येचे सरपंच सुनील गावडे, तळवडे मतदारसंघाचे विभागप्रमुख विनोद काजरेकर, उपविभागप्रमुख महेश शिरोडकर, तळवडेचे शाखाप्रमुख प्रशांत बुगडे, विजय राऊळ, मळगाव ग्रा.पं.सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, गाव विकास घडवायचा असेल, तर ग्रामस्थांची एकजूट महत्त्वाची आहे. त्याची प्रचिती मळगावात येते. सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा आहे. मळगावमध्ये रेल्वे टर्मिनस निर्माण झाले. त्यामुळे भावी काळात याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येणार असून, पर्यटनाच्या माध्यमातून या भागाचा विकास होणार आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास भावी काळात होणार आहे. जिल्ह्यातील एकही कुटुंब दारिद्र्यरेषेखाली राहणार नाही, यासाठी मी प्रयत्नशील आहे. यावेळी विविध मान्यवरांनी आपल्या मनोेगतांतून मळगावच्या विकासकामांसंबंधी व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच ग्रामस्थांच्यावतीने केसरकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी) पालकमंत्र्यांमुळे विकासात अग्रेसरमळगावचे सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर म्हणाले, मळगाव ग्रामसचिवालयासाठी एका तपाचा कालावधी जावा लागला. सुमारे १२ वर्षानंतर हे सचिवालय निर्माण होत आहे. शिवसेनेची सत्ता आल्यानंतर १२ महिन्यांतच हे काम पूर्ण होत आहे. पालकमंत्र्यांचे मळगावकडे विशेष लक्ष असल्याने या गावात विविध उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबविले जात आहेत. रेल्वे टर्मिनस असो किंवा अन्य सुविधा, विकासकामांत गाव कायमच अग्रेसर राहिले आहे. ही बाब गावासाठी गौरवास्पद आहे. गावाच्या विकासाला सर्व ग्रामपंचायत सदस्य, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांचा मोलाचा हातभार आहे, असे पेडणेकर म्हणाले.