शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

काँग्रेस पुन्हा भक्कम होण्याची लक्षणे

By admin | Updated: November 25, 2015 00:31 IST

सतीश सावंत : नगराध्यक्ष निवडणुकीनंतर वैभववाडीत पायी मिरवणूक

वैभववाडी : शिवसेना आणि भाजपच्या भांडणात विकास होणार नाही हे लक्षात आल्याने त्यांच्यातील काही सुज्ञ लोकांनी वैभववाडी आणि दोडामार्गची सत्ता काँग्रेसच्या हातात दिली आहे. त्याबद्दल त्यांना आम्ही धन्यवाद देतो. काँग्रेस जिल्ह्यात पुन्हा भक्कम होण्याची ही लक्षणे आहेत. त्यामुळे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेच्या अपेक्षेप्रमाणे दोन्ही शहरे आदर्शवत बनविली जातील, असे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. तसेच वैभववाडी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर काँग्रेसने संपूर्ण बाजारपेठत फटाक्यांची आतषबाजी करुन पायी विजयी मिरवणूक काढली. नगराध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमिवर सावंत वैभववाडीत आले होते. नगराध्यक्षपदी रवींद्र रावराणे यांची निवड जाहीर होताच सावंत यांनी पुष्पहार घालून रावराणेंचे अभिनंदन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वैभववाडी आणि दोडामार्गात काँग्रेसचे नगराध्यक्ष विराजमान झाले आहेत. त्यामुळे कार्यकर्ते आनंदात आहेत. वैभववाडीतील ग्रामविकास आघाडीत फूट पडली. अन्यथा आघाडीचे चौघेही आज एकत्र दिसले असते. भाजप आणि शिवसेना राज्यात सत्तेत एकत्र असूनही त्यांच्यातील भांडणे विकोपाला गेली आहेत. त्यामुळे त्यांच्या भांडणात विकासावर परिणाम होत आहे. युतीतील भांडणाचा दोन्ही शहरांच्या विकासावर परिणाम होऊ नये म्हणून वैभववाडी आणि दोडामार्गची सत्ता काँग्रेसच्या हाती यावी अशी जनतेचीच इच्छा होती. अगदी त्या प्रमाणेच घडले आहे. सावंत पुढे म्हणाले, आमदार नीतेश राणे आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे वैभववाडीत काँग्रेसचे रवींद्र रावराणे नगराध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. तर युतीकडे दहा नगरसेवक असूनही दोडामार्गात ते आपला नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष बसवू शकले नाहीत. ही काँग्रेस पुन्हा भक्कम होण्याची लक्षणे आहेत. त्यामुळे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे यांच्या साथीने ही दोन्ही शहरे आदर्शवत बनविली जातील. कालावधीचा फॉर्म्युला वरीष्ठ नेतेच ठरवतील असेही सावंत यांनी स्पष्ट केले. वैभववाडीतील दोन्ही पदांच्या निवडीनंतर रावराणे व चव्हाण यांना पुष्पहार घालून तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सावंत यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी तालुकाध्यक्ष भालचंद्र साठे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप रावराणे, माजी सभापती अरविंद रावराणे, नासीर काझी, बाळा हरयाण, बंड्या मांजरेकर, अंबाजी हुंबे, शुभांगी पवार, विश्राम राणे, काँग्रेसचे सर्व नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)राणेंमुळेच मी नगराध्यक्ष : रावराणे वाभवे-वैभववाडी नगराच्या विकासासाठी मतदारांनी मला बिनविरोध निवडून दिले. त्याबद्दल धन्यवाद देतो. मी काँग्रेस पक्षाचाच कार्यकर्ता असून काँग्रेस नेते नारायण राणे आणि आमदार नीतेश राणे यांच्यामुळेच पहिल्या नगराध्यक्ष पदाचा मान मला मिळाला. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा विकास करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे नगराध्यक्ष रवींद्र रावराणे यांनी स्पष्ट केले.