शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

कुडाळातील आंबेडकरनगरला पुराचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 23:53 IST

कुडाळातील आंबेडकरनगरला पुराचा वेढा

लोकमत न्यूज नेटवर्कसिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम राहिल्याने बहुतांशी भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. मंगळवारी रात्री भंगसाळ नदीला आलेल्या पुरामुळे रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कुडाळ शहरातील डॉ. आंबेडकर नगरातील सात ते आठ घरांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने येथील नागरिकांना रातोरात सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले. बुधवारी सायंकाळपर्यंत पूरस्थिती ‘जैसे थे’ होती.मालवण तालुक्यातील मसुरे खोतजुवा येथे कालावल नदीपात्रात सानिया साईप्रसाद खोत (वय ३५), नीलिमा नीलेश खोत (३५) आणि दीप्ती खोत (३६) या तीन महिला, दशरथ खोत (४५), नंदादीपक खोत (४0) हे दोन पुरुष व आर्यन खोत (९) हा मुलगा असे सहाजण खोतजुवा येथून मसुरे येथे नेहमीप्रमाणे शेतीच्या कामासाठी जात असताना पुरामुळे नदीपात्रात गेले. यावेळी किनारपट्टीवरील ग्रामस्थांनी अन्य होडींचा आधार घेत सर्वांना वाचविले. ही घटना बुधवारी दुपारी तीन वाजता घडली.नदीनाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने पुराचे पाणी शेतात, बाजारपेठेत शिरले होते. पुराचे पाणी पुलांवरून वाहू लागल्याने तेथील वाहतूक विस्कळीत झाली होती. जिल्ह्यात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या असून, लाखभर रुपयांचे नुकसान झाले आहे. मंगळवारपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस काही केल्या थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. बुधवारीसुद्धा दिवसभर आपली संततधार त्याने कायम ठेवली होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. दोडामार्ग तालुक्यातील कुडासे गावचे पूल पाण्याखाली गेले होते. केर, घोटगेवाडी, परमे यांना जोडणाऱ्या पुलावर अर्ध्या फुटापेक्षा कमी पाणी असूनही पुलाला रेलिंग नसल्याने व पाण्याचा वेग जास्त असल्याने येथील वाहतूक बंद होती.