शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोरांना कारणे दाखवा नोटीस

By admin | Updated: April 30, 2015 00:26 IST

सतीश सावंत : जिल्हा बँक निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सर्व जागा जिंकेल

कणकवली : काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने आघाडी करून जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी संकल्प सिद्धी पॅनेल तयार केले आहे. या निवडणुकीत बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या प्रदीप ढोलम, सुभाष मडव, बाबल आल्मेडा व सुगंधा साटम, आशिष परब या पाच जणांना काँग्रेस पक्षाच्यावतीने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे, असे सांगतानाच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा विचार मानणाऱ्या मतदारांनी या पाच जणांना मतदान करू नये, असे आवाहन काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी केले.येथील काँग्रेस संपर्क कार्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सावंत पुढे म्हणाले, ५ मे रोजी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. संकल्पसिद्धी पॅनेलची एक जागा बिनविरोध झाली आहे. काँग्रेस नेते नारायण राणे, आमदार नीतेश राणे, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उर्वरित १८ जागांवरही काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येतील. विरोधक काँग्रेस पक्ष कमकुवत झाल्यानेच त्यांनी राष्ट्रवादीशी आघाडी केली अशी टीका करीत आहेत. मात्र, शिवसेना-भाजपासह सहा गट एकत्र येवूनही त्यांना या निवडणुकीसाठी १९ उमेदवार मिळू शकले नाहीत. त्यामुळे नेमके अध:पतन कोणाचे झाले आहे हे दिसून येते. उमेदवारी अर्ज भरण्याची ज्यांना माहिती नाही ते जिल्हा बँक काय चालविणार? असा प्रश्न निर्माण होतो, अशी टीकाही सावंत यांनी यावेळी केली.राजन तेली यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपामध्ये नेमके काय चालले आहे ते प्रथम पहावे आणि त्यानंतरच वक्तव्य करावे. जिल्हाध्यक्ष या नात्याने यापूर्वीही अनेक पदाधिकाऱ्यांवर पक्षांतर्गत कारवाई करून राजीनामे घेण्याची हिंमत मी दाखविली आहे. त्यामुळे तेली यांनी त्याविषयी वक्तव्य करू नये.ते पुढे म्हणाले, केंद्रामध्ये सत्ता येवून एक वर्षाचा कालावधी उलटला आहे. तर राज्यातील सत्तेला सहा महिन्यांचा कालावधी होऊनही जनतेचे प्रश्न सुटू शकलेले नाहीत. लोकसभा तसेच विधानसभेच्या निवडणुकीत मते मागताना अनेक आश्वासने शिवसेना-भाजपाच्या नेत्यांनी दिली होती. ती पूर्ण होऊ शकलेली नाहीत. वाळू व्यावसायिकांवर भाजपा-शिवसेनेमुळेच कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. होड्यांचे सील तोडणार असे सांगण्याची वेळ आमदारांवर आली आहे. मात्र, या समस्येला तेच कारणीभूत आहेत. (वार्ताहर)वाळू व्यावसायिकांच्या समस्येला केसरकर, नाईक कारणीभूतवाळू व्यावसायिकांच्या समस्या सोडविणार तसेच इको सेन्सिटीव्हचे भूत उतरविणार असल्याचे सांगत शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी निवडणुकीत मते मागितली. मात्र केंद्रात तसेच राज्यात सत्ता येवूनही त्यांना हे शक्य झालेले नाही. वाळू व्यावसायिकांच्या समस्यांसाठी पालकमंत्री दीपक केसरकर व आमदार वैभव नाईकच कारणीभूत आहेत. सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागल्यास काँग्रेस पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सावंत यांनी यावेळी दिला. पालकमंत्र्यांचा प्रशासनावर वचक नाहीजिल्ह्याच्या राजकारणात पालकमंत्री दीपक केसरकर यांचा कोणताही प्रभाव दिसून येत नाही. पालकमंत्र्यांना पोलीस संरक्षण उपलब्ध होत नसेल तसेच पोलीस त्यांचे ऐकत नसतील तर प्रशासनावर त्यांचा वचक नसल्याचेच स्पष्ट होत आहे. दीपक केसरकर अगतिक झाले असून त्यांचा प्रशासनावर अंकुश नसल्याने जनतेचे प्रश्न ते सोडवू शकत नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेऊन कॅबिनेट दर्जाचा पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी द्यावा, अशी आमची मागणी असल्याचे सावंत यांनी यावेळी सांगितले.. फौजदारी गुन्हा दाखल करणार३१ मे रोजी निवडणूकमालवण, कणकवली, वेंगुर्ले, कुडाळ, देवगड या पाच खरेदी-विक्री संघांची निवडणूक ३१ मे रोजी होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ५ मे पर्यंत आहे. काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करू इच्छिणाऱ्यांनी २ मे पर्यंत तालुकाध्यक्षांकडे आपले अर्ज दाखल करावेत असे आवाहन सावंत यांनी यावेळी केले.हिंमत दाखविण्यास सक्षमबबन राणे व महेश सारंग हे आमच्या पक्षात आहेत. त्यांची कामगिरी पाहून त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत दाखविण्यासाठी मी सक्षम आहे. त्यामुळे राजन तेली यांनी त्याबाबतचा सल्ला देण्याची गरज नाही.