शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

दोडामार्गात टंचाईची समस्या नगण्य

By admin | Updated: April 27, 2016 00:56 IST

तिलारी धरण ठरतेय वरदान : विहिरीतील जलसाठाही वाढतोय, तालुकावासीयांसाठी गोड बातमी

वैभव साळकर-- दोडामार्ग --एकिकडे राज्यभरात दुष्काळामुळे पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली असताना दोडामार्ग तालुक्यातील जनता तिलारीधरणाच्या मुबलक पाणी साठ्यामुळे पाणी टंचाईच्या समस्येपासून दूर आहे. गोवा आणि महाराष्ट्र राज्याच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या या प्रकल्पामुळे गेल्या पाच वर्षांपासून तालुक्यात पाणी टंचाईची समस्या नगण्य बनली आहे. विहिरींंच्या पाण्याची पातळी व भूगर्भातील जलसाठ्याचे प्रमाण तिलारीच्या कालव्यातून प्रवाहीत होणाऱ्या पाण्यामुळे वाढल्याने तालुकावासीयांसाठी तिलारी धरण वरदान ठरले आहे.सध्या संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळामुळे होरपळत आहे. चालू वर्षी पाऊस कमी प्रमाणात झाल्याने मराठवाडा, विदर्भ आदी भागातील लोकांवर पाणी- पाणी करण्याची वेळ आली आहे. त्या तुलनेत कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याची आणि पर्यायाने दोडामार्ग तालुक्याची परिस्थिती समाधानकारक आहे. तालुक्यात साकारलेले तिलारी धरण पाणी टंचाईवर मात करण्यासाठी एक रामबाण उपाय ठरले आहे. साधारणत: पाच वर्षांपूर्वी तालुक्याची परिस्थिती पाण्याच्या बाबतीत फारच चिंताजनक होती. भेकुर्ली, तळकट, पिकुळे, बोडदे, उसप, कुंब्रल आदी भागास पाणीटंचाईला दरवर्षी सामोरे जावे लागले. त्यामुळे पाणीटंचाईचे दुखणे दरवर्षी मार्चनंतर सुरू व्हायचे. परंतु तिलारी धरणाचे कालवे प्रवाहीत झाले आणि तेव्हापासून पाणीटंचाईची ही समस्या खूपच कमी झाली. गेल्या पाच वर्षात तिलारीच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे पाणी टंचाईची समस्या दूर होण्यास मदत झाली आहे.तिलारी प्रकल्प एक प्रकारे तालुकावासीयांसाठी वरदान ठरला आहे. १६ टीएमसी एवढा पाणीसाठा दरवर्षी धरणात केला जातो आणि त्यानंतर हे पाणी डावा आणि उजवा अशा दोन्ही कालव्यांद्वारे गोव्यात सोडले जाते. त्यापैकी डावा कालवा हा कोनाळकट्टा, साटेली भेडशी, कुडासे, आंबेली, कसई- दोडामार्ग येथून गोव्यात जातो. तर उजवा कालवा घोटगेवाडी, घोटगे, परमे, कुडासे, सासोली मार्गे गोव्यातील पेडणे तालुक्यात प्रवेश करतो. साहजिकच हे दोन्ही कालवे तालुक्यातील निम्मी गावे व्यापतात. साधारणत: आॅक्टोबर अखेरनंतर दोन्ही कालव्यातून गोव्याला पाणी सोडले जाते. ते पुढे जूनपर्यंत तरी कायम असते. परिणामत: पाण्याचा प्रवाह चालूच असल्याने कालव्यालगतच्या विहिरी, नाले, ओढे, ओहोळ आदींना पाणी असते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच गुरांसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्नही सुटतो.टंचाई आराखडा नावापुरतातिलारी धरणामुळे तालुक्यात पाणीटंचाईचे टेन्शन नसले, तरी काही ठिकाणी मात्र त्याला अपवाद आहे. मांगेली- देऊळवाडी, तळेखोल-वाटुळवाडी, तेरवण- मेढे या ठिकाणी मात्र भूगर्भातील पाणीसाठा कमी झाल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. दरवर्षी प्रशासन टंचाई आराखडा बनविते. मात्र, त्याची अंमलबजावणी उशिराने होत असल्याने त्याचा नाहक त्रास तेथील लोकांना सहन करावा लागतो. प्रशासनाची डोकेदुखी कमीएकंदरीत तिलारीच्या कालव्यामुळे पाणीटंचाईवर मात करणे सहज सुलभ बनले असल्याने प्रशासनाची डोकेदुखीही कमी झाली आहे.