शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
6
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
7
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
8
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
9
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
10
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
11
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
12
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
13
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
16
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
19
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
20
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप

दोडामार्गात टंचाईची समस्या नगण्य

By admin | Updated: April 27, 2016 00:56 IST

तिलारी धरण ठरतेय वरदान : विहिरीतील जलसाठाही वाढतोय, तालुकावासीयांसाठी गोड बातमी

वैभव साळकर-- दोडामार्ग --एकिकडे राज्यभरात दुष्काळामुळे पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली असताना दोडामार्ग तालुक्यातील जनता तिलारीधरणाच्या मुबलक पाणी साठ्यामुळे पाणी टंचाईच्या समस्येपासून दूर आहे. गोवा आणि महाराष्ट्र राज्याच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या या प्रकल्पामुळे गेल्या पाच वर्षांपासून तालुक्यात पाणी टंचाईची समस्या नगण्य बनली आहे. विहिरींंच्या पाण्याची पातळी व भूगर्भातील जलसाठ्याचे प्रमाण तिलारीच्या कालव्यातून प्रवाहीत होणाऱ्या पाण्यामुळे वाढल्याने तालुकावासीयांसाठी तिलारी धरण वरदान ठरले आहे.सध्या संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळामुळे होरपळत आहे. चालू वर्षी पाऊस कमी प्रमाणात झाल्याने मराठवाडा, विदर्भ आदी भागातील लोकांवर पाणी- पाणी करण्याची वेळ आली आहे. त्या तुलनेत कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याची आणि पर्यायाने दोडामार्ग तालुक्याची परिस्थिती समाधानकारक आहे. तालुक्यात साकारलेले तिलारी धरण पाणी टंचाईवर मात करण्यासाठी एक रामबाण उपाय ठरले आहे. साधारणत: पाच वर्षांपूर्वी तालुक्याची परिस्थिती पाण्याच्या बाबतीत फारच चिंताजनक होती. भेकुर्ली, तळकट, पिकुळे, बोडदे, उसप, कुंब्रल आदी भागास पाणीटंचाईला दरवर्षी सामोरे जावे लागले. त्यामुळे पाणीटंचाईचे दुखणे दरवर्षी मार्चनंतर सुरू व्हायचे. परंतु तिलारी धरणाचे कालवे प्रवाहीत झाले आणि तेव्हापासून पाणीटंचाईची ही समस्या खूपच कमी झाली. गेल्या पाच वर्षात तिलारीच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे पाणी टंचाईची समस्या दूर होण्यास मदत झाली आहे.तिलारी प्रकल्प एक प्रकारे तालुकावासीयांसाठी वरदान ठरला आहे. १६ टीएमसी एवढा पाणीसाठा दरवर्षी धरणात केला जातो आणि त्यानंतर हे पाणी डावा आणि उजवा अशा दोन्ही कालव्यांद्वारे गोव्यात सोडले जाते. त्यापैकी डावा कालवा हा कोनाळकट्टा, साटेली भेडशी, कुडासे, आंबेली, कसई- दोडामार्ग येथून गोव्यात जातो. तर उजवा कालवा घोटगेवाडी, घोटगे, परमे, कुडासे, सासोली मार्गे गोव्यातील पेडणे तालुक्यात प्रवेश करतो. साहजिकच हे दोन्ही कालवे तालुक्यातील निम्मी गावे व्यापतात. साधारणत: आॅक्टोबर अखेरनंतर दोन्ही कालव्यातून गोव्याला पाणी सोडले जाते. ते पुढे जूनपर्यंत तरी कायम असते. परिणामत: पाण्याचा प्रवाह चालूच असल्याने कालव्यालगतच्या विहिरी, नाले, ओढे, ओहोळ आदींना पाणी असते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच गुरांसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्नही सुटतो.टंचाई आराखडा नावापुरतातिलारी धरणामुळे तालुक्यात पाणीटंचाईचे टेन्शन नसले, तरी काही ठिकाणी मात्र त्याला अपवाद आहे. मांगेली- देऊळवाडी, तळेखोल-वाटुळवाडी, तेरवण- मेढे या ठिकाणी मात्र भूगर्भातील पाणीसाठा कमी झाल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. दरवर्षी प्रशासन टंचाई आराखडा बनविते. मात्र, त्याची अंमलबजावणी उशिराने होत असल्याने त्याचा नाहक त्रास तेथील लोकांना सहन करावा लागतो. प्रशासनाची डोकेदुखी कमीएकंदरीत तिलारीच्या कालव्यामुळे पाणीटंचाईवर मात करणे सहज सुलभ बनले असल्याने प्रशासनाची डोकेदुखीही कमी झाली आहे.