शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

लवकरच वाळू उत्खननाचे परवाने

By admin | Updated: May 29, 2015 23:46 IST

विनायक राऊत : जांभ्या दगडाची बंदी उठविण्यात यश

मालवण : जिल्ह्यातील स्थानिक काँग्रेस नेत्यांचे दुर्लक्ष व निष्क्रियतेमुळे जिल्ह्यात वाळू व गौण खनिज बंदीचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, कोकणात भगवा फडकला. देशासह राज्यात शिवसेना- भाजपची सत्ता आली त्या माध्यमातून हा प्रश्न निकाली काढताना जांभ्या दगडासह वाळू उत्खननावरील बंदी उठविण्यात यश आले आहे. लवकरच शासन धोरणानुसार वाळू उत्खननाचे परवाने दिले जातील. जिल्हा प्रशासनाला त्वरित कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिली.कुंभारमाठ येथील शिवसेना आयोजित सामूहिक विवाह सोहळ््यानिमित्त खासदार राऊत बोलत होते. यावेळी युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. हर्षद गावडे, संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, बबन शिंदे, उपतालुकाप्रमुख हरी खोबरेकर, किरण वाळके, नंदू गवंडी, मंदार गावडे, सतीश प्रभू, सन्मेश परब, सेजल परब, तपस्वी मयेकर, गुरव, आदी उपस्थित होते.राऊत म्हणाले, शिवसेनेच्या माध्यमातून गेले काही महिने हा प्रश्न सुटण्यासाठी केला जात असलेला पाठपुरावा व वरिष्ठ स्तरावर शिवसेना- भाजप मंत्रिमंडळाकडून विशेष महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या पाठपुराव्यामुळे न्यायालयासह हरित लवादाकडे असलेला प्रश्न यामुळे कोकण विभागातील वाळू बंदी उठविण्यात आली. मेरिटाईम बोर्डाचे तांत्रिक मार्गदर्शन घेण्यात आले. याबरोबरच महसूल विभाग, हातपाटी, पारंपरिक व डुबी या खाडीपात्रातील वाळू उत्खननास परवानगी देताना पूर्वीप्रमाणे उत्खनन होणार आहे. जिल्ह्यात शिल्लक राहिलेला कालावधी वाळू उत्खननास मिळावा याबाबतही कार्यवाही सुरू असून, जिल्हाधिकाऱ्यांना त्या प्रकारचे आदेश देण्यात आले आहेत.खनिकर्म विभागामार्फत वाळू लिलाव झाल्यानंतर खाडीपात्रानजीक रस्त्यावरून होणाऱ्या वाळू डंपर वाहतुकीमुळे खाडीकिनारी असलेले रस्ते नादुरुस्त बनतात. त्यामुळे शासनाने याची दखल घेऊन वाळू लिलावातून मिळणारी काही रक्कम ग्रामपंचायतींना रस्ते दुरुस्तीसाठी मिळणार आहे, असेही राऊत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)काँगे्रसचे आंदोलन म्हणजे पुतणामावशीचे बेगडी प्रेमजिल्हाभरात काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या शासकीय भात गोडावून आंदोलनाची विनायक राऊत यांनी खिल्ली उडविली. शेतकऱ्यांना चांगला भाव देऊन त्यांच्या भाताची खरेदी करण्यासाठी शासनस्तरावर निर्णय घेण्यात आला आहे. गोडावून खाली नसतील तर खासगी ठिकाणी भात खरेदीसाठी जागा निश्चित केली आहे. खरेदी-विक्री संघांना त्यासाठी हुंडी देऊन तसा करार करून भात खरेदी केली जाईल, असे असताना काँग्रेसचे आंदोलन म्हणजे पुतणामावशीचे बेगडी प्रेम आहे, अशी टीका केली.