शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

दुधाळ जनावरे योजनेला अल्प प्रतिसाद

By admin | Updated: October 17, 2014 22:51 IST

पशुसंवर्धन समिती सभा : १८ लाखांचा निधी जिल्हा बँकेकडे पडून

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद सेसमधून २० टक्के अनुदानावर पुरवठा करण्यात येणाऱ्या दुधाळ जनावरे पुरवणे योजनेला लाभार्थ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने या योजनेचा तब्बल १८ लाख ८० हजार रूपये निधी जिल्हा बँकेकडे पडून असल्याची बाब शुक्रवारच्या पशुसंवर्धन समिती सभेत उघड झाली.जिल्हा परिषद पशुसंवर्धन व दुग्ध विकास समितीची तहकूब सभा जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सदस्य सोनाली घाडीगावकर, खातेप्रमुख, अधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषद सेसमधून २० टक्के अनुदानावर दुधाळ जनावरे पुरविण्याची योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत १३६ लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले. ९४ प्रस्तावांना मंजुरी देऊन त्यांना लाभ देण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्हा बँकेकडे अनुदानाचा निधी वर्ग करण्यात आला. मात्र, लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर होऊनही लाभार्थ्यांकडूनच या योजनेसाठी इच्छुक नसल्याने प्रस्ताव येत नसल्याने प्रतिसाद मिळत नाही. जिल्हा बँकेकडे ९४ लाभार्थ्यांसाठीचे १८ लाख ८० हजार रूपये निधी पडून असल्याची माहिती पशुसंवर्धन समिती सभेत उघड झाली. तर उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी या योजना यशस्वी करण्यासाठी योजनांमध्ये काही सुधारणा करणे आवश्यक आहेत. तसेच लाभार्थ्यांना योजनांबाबतचे फायदे समजून सांगणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करीत संबंधित जिल्हा परिषद सदस्यांना कळवून संबंधित लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेण्याच्या सूचना दिल्या. सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चांगली संधी आहे. मात्र, या योजनेवर जास्त भर दिला पाहिजे. ग्रामीण भागात ही योजना पोहोचली पाहिजे. सक्षमपणे योजना राबविण्यास आणि बिनचूक नियोजन केल्यास जिल्ह्यात कुक्कुटपालन योजना यशस्वी होऊ शकेल. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर व्यावसायिकदृष्ट्या कुक्कुटपालन केले पाहिजे. एक-दोन तालुक्यातच ही योजना मोठ्या प्रमाणात राबवली पाहिजे. तरच त्यासाठी लागणारा औषध पुरवठा, खाद्य पुरवठा आणि उत्पादीत पक्ष्यांचे मार्केटींग करणे सोयीचे होऊ शकेल. ही योजना यशस्वीपणे राबविण्याबाबत सभेत चर्चा करण्यात आली. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांमध्ये निरूत्साहजिल्हा परिषदेच्या सेस फंडातून २0 टक्के अनुदानावर दुधाळ जनावरांबाबतची योजना राबविण्यात येते. त्यासाठी जिल्हाभरातून प्रस्ताव मागविण्यात येतात. या योजनेसाठी जिल्हा बँकेमार्फत अनुदानाबाबतचा निधी देण्यात येतो.मात्र, ही योजना राबविण्यासाठी लाभार्थी इच्छुक नसल्याने लाखो रूपयांचा निधी पडून आहे.