शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

वांद्रेतील निकालाने शिवसेनेचा जल्लोष

By admin | Updated: April 15, 2015 23:55 IST

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात ही लढत असल्याने या लढतीच्या निकालाची सर्वांना मोठी उत्सुकता होती

कणकवली : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या वांद्रे पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांना विजय मिळाला. प्रतिष्ठेची लढत असलेल्या कॉँग्रेसच्या नारायण राणे यांचा दणदणीत पराभव झाला. यामुळे सिंधुदुर्गात शिवसैनिकांनी ठिकठिकाणी जल्लोष केला. कॉँग्रेसच्या गोटात मात्र सन्नाटा पसरला होता. शिवसेनेचे आमदार बाळा सावंत यांच्या निधनानंतर वांद्रेतील जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत कुडाळमध्ये पराभूत झालेले नारायण राणे यांनी पुन्हा आपली ताकद अजमावून पाहण्यासाठी उडी घेतली होती. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात ही लढत असल्याने या लढतीच्या निकालाची सर्वांना मोठी उत्सुकता होती. निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना आणि राणेसमर्थक दोन्ही बाजूंकडील कार्यकर्ते मुंबईत पोहोचले होते. बुधवारी पहिल्या फेरीपासून शिवसेनेच्या तृप्ती सावंत आघाडीवर राहिल्याने शिवसैनिकांत उत्साह संचारला होता. प्रत्येक फेरीनंतर सावंत आणि राणे यांच्यातील मतांचा फरक वाढत गेल्याने शिवसैनिकांनी काही फेऱ्यानंतर फटाके फोडण्यास सुरूवात केली. मुख्य चौकात आतषबाजी करून भगवे झेंडे लावून दुचाकींची रॅली काढण्यात आली. शिवसेना शाखेकडे घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, युवा सेना जिल्हाप्रमुख अ‍ॅड. हर्षद गावडे, नगरसेवक सुशांत नाईक, युवा सेना तालुकाप्रमुख राजू राठोड, अनिल हळदिवे, रूपेश आमडोसकर, व्ही. डब्ल्यू. सावंत, अजित काणेकर, राजन म्हाडगुत आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)