शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
3
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
4
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
5
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
6
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
7
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
8
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
9
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
10
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
11
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
12
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
13
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
14
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
15
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
16
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
17
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
18
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
20
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेची अवस्था सर्कशीतील वाघासारखी

By admin | Updated: May 13, 2016 23:41 IST

सचिन सावंत यांची टीका : संदीप सावंत यांचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील

सावंतवाडी : खासदार किरीट सोमय्यांनी शिवसेनेच्या नेत्यांवरच आरोप करून खळबळ माजवली. मात्र, शिवसेना अद्याप गप्प आहे. शिवसेनेत त्यावर प्रतिक्रियाही उमटत नसून शिवसेनेची अवस्था आता सर्कशीतील वाघासारखी झाली आहे, अशी जोरदार टीका महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांच्याबद्दल पक्षश्रेष्ठीच योग्य तो निर्णय घेतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब, सरचिटणीस मंदार नार्वेकर, शहरअध्यक्ष सुधीर आडिवरेकर, संतोष जोईल, गुरू वारंग आदी उपस्थित होते. सचिन सावंत म्हणाले, खासदार किरिट सोमय्यांनी शिवसेनेच्या नेत्यांवरच तसेच पीए व मेहूणे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. पण शिवसेनेने त्यावर पलटवार केला नाही. शिवसनेने सत्य काय ते जनतेसमोर सांगितले पाहिजे. पण ते सांगितलेले नाही. कोकणाने शिवसेनेला भरभरून दिले. पण शिवसेनेने कोकणला काय दिले? आजही अनेक ठिकाणी विकास कामे ठप्प आहेत. सिंधुदुर्गला एक मंत्री पद दिले. पण त्याचा कोणताही फायदा कोकणला मिळत नाही. राज्याचे अर्थराज्यमंत्री असून, त्यांना फोटोसेशन पुरते दाखवले जाते. नंतर त्यांचा पत्ताच नसतो, असा आरोपही यावेळी सावंत यांनी केला आहे.राज्यात विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी होईल, असे सांगत असतानाच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे कायमस्वरूपी मित्र आहोत, असे कोणी समजू नये, असा खुलासाही त्यांनी यावेळी केला. विधानसभेत दोन्ही पक्षांचे बळ लक्षात घेता युती शासनाच्या चुकीच्या गोष्टींना विरोध करण्यासाठीच आम्ही एकत्र आलो असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राज्यात भाजप सरकार भ्रष्टाचारात गुंतले आहे. त्यांच्याकडे ठोस कार्यक्रम राहिला नसल्याचे आरोपही सावंत यांनी यावेळी केला.चिपळणूचे तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांना झालेल्या मारहाणीबाबत काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीच योग्य तो निर्णय घेतील, हा विषय वरिष्ठ पातळीवरचा आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. काँग्रेस नारायण राणेंना विधान परिषदेची उमेदवारी देईल का? असे विचारले असता तो निर्णय दिल्लीमध्ये होत असतो. त्यांच्याशी स्थानिक नेतृत्वाचा कोणताही प्रश्न नसतो. राणेंना उमेदवारी दिल्यास काँग्रेसचा आवाज विधान परिषदेत आणखी बुलुंद होईल. तसेच राणेंना कोणत्याही कुबड्यांची आवश्यकता लागणार नाही. ते काँग्रेसचे सामर्थ्यवान नेते आहेत. पक्षश्रेष्ठी त्यांच्या कार्याची निश्चितच दखल घेतील असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)