शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

गुहागरात शिवसेना-भाजपला सुरूंग

By admin | Updated: September 10, 2016 00:40 IST

भास्कर जाधवांकडून स्वागत : वरवेली, परचुरी, धोपावे, तळघरचे शिवसैनिक राष्ट्रवादीत

गुहागर : गुहागर मतदारसंघात आमदार भास्कर जाधव यांचे नेतृत्व सर्वमान्य होताना दिसत असून, अन्य पक्षांमधील कार्यकर्ते हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर येत असल्याचे दिसत आहे. गुहागर तालुक्यातील वरवेली, परचुरी, धोपावे तर खेड तालुक्यातील तळघर येथील शेकडो शिवसेना-भाजप समर्थक व कार्यकर्त्यांनी आमदार जाधव यांच्या उपस्थितीत राट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. विविध विकासकामांची उद्घाटने व भूमिपूजनांच्या निमित्ताने जाधव हे गुहागर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी वरवेली - रांजाणेवाडी, परचुरी - डाफळेवाडी, धोपावे - पाटीलवाडी आणि तळघर - उगवतवाडीमधील ग्रामस्थांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे. ठिकठिकाणी झालेले हे पक्षप्रवेश केवळ एकट्या-दुकट्याचे किंंवा दिखावा नसून, प्रवेशापूर्वीच येथील ग्रामस्थ हे आमदार जाधव यांच्या स्वागताला एकवटलेले पाहावयास मिळाले. या चारही गावांमध्ये जाधव यांना मिरवणुकीने कार्यक्रमस्थळी आणण्यात आले. त्यानंतर जाधव यांच्या हस्ते पाटपन्हाळे -वाकी-पिंंपळवट-तेलगडेवाडी रस्ता, वरवेलीतील गावडे-अवेरेवाडी रस्ता, परचुरी डाफळेवाडीतील शाळा इमारत बांधकाम कामांची भूमिपुजने तर धोपावे येथे ६० लाख निधीतून बांधण्यात आलेल्या पुलाचे उद्घाटन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमांमध्ये बोलताना जाधव यांनी शिवसेना-भाजपवर सडकून टीका केली. एकदा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर रामदास कदम हे मागील पाच वर्षात या मतदारसंघात फिरकलेले नाहीत. विकासकामांच तर नावच नाही. तरीदेखील निवडणुकीत विजय भोसलेंना गुहागर तालुक्याने ९ हजार ६०० मतं दिली. निवडणूक होऊन आता दोन वर्ष झाली आहेत. कुठे आहेत भोसले, असा सवाल करताना जाधव यांनी चारवेळा निवडून आलेल्या विनय नातूंनी पराभूत झाल्यानंतर फिरकूनही पाहिलं नाही. मात्र, पाच वर्षांनी पुन्हा निवडणुकीला ते उभे राहिले. ही निवडणूक होऊन आता दोन वर्ष झाली आहेत. या दोन वर्षात कधी आले का ते, अशी विचारणा जाधव यांनी यावेळी केली. जाधव म्हणाले की, भाजप-शिवसेनेचं सरकार आल्यानंतर जाती-धर्मात लढे सुरू झाले आहेत. रोज पोलिसांना मारहाण होतेयं, हे सर्व चित्र पाहिल्यानंतर लोकांना भ्रमनिरास झाल्याचे वाटू लागले आहे. त्यामुळेच सत्ताधारी पक्षाकडे जाण्याऐवजी लोकं विरोधी पक्षाकडे जात आहेत, असे जाधव यांनी धोपावे येथील कार्यक्रमात सांगितले. शिवसेनेचे तीन-तीन मंत्री असूनदेखील शासनाचा अधिक निधी आणून विकास करण्याऐवजी जिल्हा नियोजनच्या निधीवर ते तुटून पडतात, हे जिल्ह्याचं दुर्दैव असल्याचे ते म्हणाले. धोपावेचा पाणीप्रश्न मार्गी लावला असून, येथील रस्त्याची अडचणही लवकरच दूर करू, असे आश्वासन त्यांनी दिले.यावेळी तालुकाध्यक्ष विनायक मुळ्ये, महिला आघाडी तालुकाध्यक्ष नेत्रा ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर आरेकर, पंचायत समिती सभापती विलास वाघे, उपसभापती सुनील जाधव, सुरेश सावंत, प्रभाकर शिर्के, मंगेश कदम, अजय खातू, इम्रान घारे, नवनीत ठाकूर, प्रशांत विचारे, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)विरोधी पक्षात हलचल : कुडली, पाभरे, शिवणेतील शिवसैनिकही दाखलराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर मतदार संघात पक्षप्रवेशाचा धुमधडाका लावला आहे. शिवसेना - भाजप कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत घेऊन त्यांनी चांगलाच दणका दिला आहे.सत्ता आल्यानंतरही आपला विकास होऊ शकत नाही, हे शिवसैनिकांना कळून चुकलं आहे, असे सांगताना ‘जेवढी वर्ष शिवसेनेसाठी दिलीत तेवढे महिनेसुध्दा विकासाची कामं मार्गी लावण्याकरता मला देऊ नका’, असा शब्द यावेळी दिला. कुडली, पाभरे, शिवणे आदी ठिकाणचे शिवसैनिकदेखील गेल्या काही महिन्यांत राष्ट्रवादीत सामील झाल्याची उदाहरणे त्यांनी दिली. भास्कर जाधव यांच्यामुळे गुहागर मतदारसंघात विरोधी पक्षांमध्ये हलचल निर्माण झाली आहे.